शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

आटपाडीचे शासकीय वसतिगृह अखेर टॅँकरमुक्त

By admin | Updated: December 9, 2014 23:26 IST

चार वर्षांनंतर पाण्याची सोय : ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा सुरळीत, विद्यार्थ्यांमध्ये समाधान::लोकमतचा दणका

अविनाश बाड :आटपाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात आज मंगळवारी तब्बल चार वर्षांनंतर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. आठवड्यातून येणाऱ्या टॅँकरवर विद्यार्थी अवलंबून राहिल्याने कायमच्या पाणीटंचाईने वैतागून गेले होते. आता पुजारवाडी (आटपाडी) ग्रामपंचायतीने मुख्य जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे आता पाण्याअभावी बंद पडलेली सौरऊर्जा यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.माणगंगा साखर कारखान्याजवळ कौठुळी फाट्यावर समाज कल्याण विभागाने मुलांसाठी आणि मुलींसाठी तब्बल साडेसात कोटी रुपये खर्चून वसतिगृह बांधले आहे. आटपाडीपासून सुमारे ३ कि. मी. अंतरावर असलेल्या या वसतिगृहात पाण्याची कसलीही सोय नसल्याने पाण्याअभावी विद्यार्थ्यांचे हाल सुरू होते. आठवड्यातून एकदा पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर मागविला जायचा. टॅँकरचालक जिथून शक्य असेल तेथून आणि उपलब्ध होईल तसले पाणी आणून ओतायचा. उघड्यावर ठेवलेल्या टाकीत टॅँकरचे पाणी सोडल्यावर पिण्यासाठी, अंघोळीसाठी पाणी वापरताना, पुरविताना विद्यार्थ्यांची कसरत सुरू होती. ‘लोकमत’ने यावर प्रकाशझोत टाकला. मुलांनीही पाण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त दीपक घाटे यांनी भेट दिली आणि वसतिगृहातील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. पाणीटंचाई संपुष्टात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गरम पाणीही मिळणार!मुलांना अंघोळीसाठी गरम पाणी देण्यात यावे, यासाठी वसतिगृहाच्या छतावर मोठी सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली आहे. ४ वर्षे पाण्याअभावी ही यंत्रणा बंद आहे. आता वरच्या टाकीत पाणी सोडून ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे चार वर्षांनंतर वसतिगृहाच्या स्नानगृहातील ‘शॉवर’ला गरमा-गरम पाणी येणार आहे.