शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शासनाने व्यापाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला

By admin | Updated: November 21, 2014 00:28 IST

अतुल शहा : एलबीटीप्रश्नी राज्यभर आंदोलन छेडणार, दोन्ही संघटना एकत्र येणार

सांगली : विनापर्याय एलबीटी हटविण्याचे वचन भाजपने विधानसभा निवडणुकीत दिले होते. त्यांच्या जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख आहे. असे असताना आता जीएसटी येईपर्यंत एलबीटी कायम ठेवण्याचा त्यांचा निर्णय म्हणजे राज्यातील व्यापाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे, असे मत महाराष्ट्र व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, विनापर्याय जकात हटविण्याची मागणी केल्यानंतर एलबीटी आणण्यात आला आहे. आता एलबीटी रद्द करण्यासाठी व्यापारी संघर्ष करीत असताना भाजपनेच सरकार आल्यानंतर हा कर विनापर्याय रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात आता सरकार आल्यानंतरही भाजपकडून या आश्वासनाचे पालन होताना दिसत नाही. त्यातच आता जीएसटी (गुडस् आणि सर्व्हिस टॅक्स) येईपर्यंत एलबीटी (स्थानिक संस्था कर) चालू राहील, असे भाजपचे नेते सांगत आहेत. ही व्यापाऱ्यांची थेट फसवणूक आहे. अन्य मोठ्या राज्यांनीही विनापर्याय जकात हटविली आहे. काही ठिकाणी व्हॅटवर सरचार्ज आहे. त्याठिकाणच्या महापालिकांना कोणतीही अडचण येत नाही. महाराष्ट्रातच या गोष्टीचा बाऊ का केला जात आहे? जकात, एलबीटीच्या माध्यमातून महापालिकांना मिळणाऱ्या उत्पन्नाला काही पर्याय यापूर्वीच सूचविण्यात आले आहेत. स्टॅम्पड्युटीत १ टक्का वाढ केल्यास त्यातून सुमारे ८ हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न शासनाला मिळू शकते. सध्या व्यवसाय कर मृत स्वरुपात आहे. जेवढे लोक हा कर भरत आहेत तेवढा स्वीकारला जातो. या कराच्या संकलनाची जबाबदारी महापालिकेकडे सोपविली तर, या कराच्या माध्यमातून जवळपास ४ हजार कोटी रुपये राज्यभरातून गोळा होऊ शकतात. त्यामुळे या दोन पर्यायातून अंदाजे १२ हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे विनापर्याय एलबीटी हटविल्याने काहीही फरक पडणार नाही, असे ते म्हणाले. आंदोलनप्रश्नी व्यापाऱ्यांच्या दोन्ही संघटना एकत्रीत येण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मोदींचा अपमानएलबीटी म्हणजे ‘लूट बाटने की टेक्निक’ असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीतील भाषणात केला होता. तरीही राज्यातील भाजप सरकार हा कर ठेवणार असेल तर, तो मोदी यांचा अपमान होईल, असे मत शहा यांनी व्यक्त केले. असे आहे आंदोलनराज्यातील सर्व स्थानिक आमदारांच्या घरासमोर शंखध्वनीसर्वत्र एलबीटीच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहनराज्यातील सर्व महापालिकांसमोर धरणे आंदोलनएलबीटीवर बहिष्कार टाकून सविनय कायदेभंग आंदोलन