शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची सहकारावर वक्रदृष्टी

By admin | Updated: May 17, 2017 23:21 IST

सरकारची सहकारावर वक्रदृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : राज्यात काँग्रेस सरकारच्या काळात सहकाराचे मोठे जाळे निर्माण झाले. आता भाजप सरकारच्या काळात सहकार चळवळ अडचणीत आली आहे. केंद्र सरकार व पंतप्रधानांचा सहकारी बँकांवर विश्वास नाही. सहकारी संस्थांबाबत सरकारची वक्रदृष्टी आहे. ज्या सहकारी संस्थांमध्ये गैरप्रकार आहेत, त्यांना जरूर बेड्या ठोका, परंतु संपूर्ण सहकार चळवळीस वेठीस धरू नका, असा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला दिला.चिंचणी (ता. कडेगाव) येथील हनुमान सर्व सेवा सहकारी सोसायटीचा शताब्दी महोत्सव, नूतन इमारतीचे उद्घाटन व आमदार मोहनराव कदम यांचा सत्कार, अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, आमदार जयकुमार गोरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, डॉ. जितेश कदम उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, साडेबारा लाख कोटी रुपये उत्पन्न असलेले उत्तर प्रदेशसारखे राज्य एकाच महिन्यात ३६ हजार कोटी रुपये कृषिकर्ज माफीचा निर्णय घेऊ शकते. मग देशात सर्वात प्रगत असणारे आणि साडेअठरा लाख कोटी रुपये उत्पन्न असणारे महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांची कर्जमाफी का करू शकत नाही? काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्यावतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात संघर्षयात्रा काढण्यात आली. आता कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार संवेदनाशून्य झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी ३० हजार ५०० कोटी रुपयांची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीबाबत टाळाटाळ करीत आहेत. या सरकारच्या विरोधात संघर्ष अटळ आहे. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही.डॉ. पतंगराव कदम म्हणाले, आघाडी शासनाच्या काळात आम्ही मार्गी लावलेल्या विकास कामांचे श्रेय भाजपचे नेते लाटत आहेत. अवैध धंदे जोमात सुरु आहेत. शासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. दारूबंदीला माझा पाठिंबा आहे. चिंचणी येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला आहे. या परिसराच्या सुशोभिकरणासाठी ट्रस्टमधून सर्व ती मदत करणार आहे.आ. मोहनराव कदम म्हणाले, चिंचणी सोसायटीच्या सचिवपदी मी १९६२ ते १९७२ दरम्यान १० वर्षे काम केले आहे. या गावाने मला खूप प्रेम दिले, त्यामुळे मी या गावातच स्थायिक झालो. विश्वजित कदम म्हणाले, काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात सहकारी संस्था सक्षम झाल्या. आर्थिकदृष्टया अडचणीत असलेल्या संस्थांना राज्य आणि केंद्र सरकारने अर्थसहाय्य दिले. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय काँग्रेसनेच घेतला. ज्येष्ठ नेते भाऊसाहेब यादव, सोनहिरा कारखान्याचे उपाध्यक्ष पी. सी. जाधव, संचालक बापूसाहेब पाटील, निवृत्ती जगदाळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, सहायक निबंधक अनुराधा पंडितराव, सरपंच कैलास माने, सोसायटीचे अध्यक्ष राजकुमार पाटील, उपाध्यक्ष दौलतगिरी गोसावी, सचिव बाळासाहेब मोरे उपस्थित होते. श्रीरंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रल्हाद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.मोहनरावांवेळी राष्ट्रवादीची मदतआमचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने सातारा-सांगली विधान परिषदेचे जागा सोडण्यास नकार दिला. यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. संख्याबळ राष्ट्रवादीपेक्षा कमी होते, परंतु जिंकण्याच्या निर्धाराने लढलो. मोहनराव आणि पतंगराव कदम यांचे सांगली, सातारा जिल्ह्यात सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. राष्ट्रवादीने क्रॉस मतदान करून सहकार्य केले आणि कदम यांनी विजय मिळविला, असेही चव्हाण म्हणाले.विधान परिषद निवडणुकीत माझा सख्खा भाऊ मोहनराव कदम यांच्याविरोधात उभा होता. या निवडणुकीच्या प्रचारात मी सातत्याने विश्वजित कदम यांच्याबरोबर होतो. विश्वजित यांनी मोहनराव कदम यांना आमदार करण्याचा निर्धारच केला होता. त्यांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम अविस्मरणीय आहेत, असे आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.