शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

सरकारची सहकारावर वक्रदृष्टी

By admin | Updated: May 17, 2017 23:21 IST

सरकारची सहकारावर वक्रदृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : राज्यात काँग्रेस सरकारच्या काळात सहकाराचे मोठे जाळे निर्माण झाले. आता भाजप सरकारच्या काळात सहकार चळवळ अडचणीत आली आहे. केंद्र सरकार व पंतप्रधानांचा सहकारी बँकांवर विश्वास नाही. सहकारी संस्थांबाबत सरकारची वक्रदृष्टी आहे. ज्या सहकारी संस्थांमध्ये गैरप्रकार आहेत, त्यांना जरूर बेड्या ठोका, परंतु संपूर्ण सहकार चळवळीस वेठीस धरू नका, असा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला दिला.चिंचणी (ता. कडेगाव) येथील हनुमान सर्व सेवा सहकारी सोसायटीचा शताब्दी महोत्सव, नूतन इमारतीचे उद्घाटन व आमदार मोहनराव कदम यांचा सत्कार, अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, आमदार जयकुमार गोरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, डॉ. जितेश कदम उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, साडेबारा लाख कोटी रुपये उत्पन्न असलेले उत्तर प्रदेशसारखे राज्य एकाच महिन्यात ३६ हजार कोटी रुपये कृषिकर्ज माफीचा निर्णय घेऊ शकते. मग देशात सर्वात प्रगत असणारे आणि साडेअठरा लाख कोटी रुपये उत्पन्न असणारे महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांची कर्जमाफी का करू शकत नाही? काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्यावतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात संघर्षयात्रा काढण्यात आली. आता कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार संवेदनाशून्य झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी ३० हजार ५०० कोटी रुपयांची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीबाबत टाळाटाळ करीत आहेत. या सरकारच्या विरोधात संघर्ष अटळ आहे. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही.डॉ. पतंगराव कदम म्हणाले, आघाडी शासनाच्या काळात आम्ही मार्गी लावलेल्या विकास कामांचे श्रेय भाजपचे नेते लाटत आहेत. अवैध धंदे जोमात सुरु आहेत. शासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. दारूबंदीला माझा पाठिंबा आहे. चिंचणी येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला आहे. या परिसराच्या सुशोभिकरणासाठी ट्रस्टमधून सर्व ती मदत करणार आहे.आ. मोहनराव कदम म्हणाले, चिंचणी सोसायटीच्या सचिवपदी मी १९६२ ते १९७२ दरम्यान १० वर्षे काम केले आहे. या गावाने मला खूप प्रेम दिले, त्यामुळे मी या गावातच स्थायिक झालो. विश्वजित कदम म्हणाले, काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात सहकारी संस्था सक्षम झाल्या. आर्थिकदृष्टया अडचणीत असलेल्या संस्थांना राज्य आणि केंद्र सरकारने अर्थसहाय्य दिले. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय काँग्रेसनेच घेतला. ज्येष्ठ नेते भाऊसाहेब यादव, सोनहिरा कारखान्याचे उपाध्यक्ष पी. सी. जाधव, संचालक बापूसाहेब पाटील, निवृत्ती जगदाळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, सहायक निबंधक अनुराधा पंडितराव, सरपंच कैलास माने, सोसायटीचे अध्यक्ष राजकुमार पाटील, उपाध्यक्ष दौलतगिरी गोसावी, सचिव बाळासाहेब मोरे उपस्थित होते. श्रीरंग चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रल्हाद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.मोहनरावांवेळी राष्ट्रवादीची मदतआमचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने सातारा-सांगली विधान परिषदेचे जागा सोडण्यास नकार दिला. यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. संख्याबळ राष्ट्रवादीपेक्षा कमी होते, परंतु जिंकण्याच्या निर्धाराने लढलो. मोहनराव आणि पतंगराव कदम यांचे सांगली, सातारा जिल्ह्यात सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. राष्ट्रवादीने क्रॉस मतदान करून सहकार्य केले आणि कदम यांनी विजय मिळविला, असेही चव्हाण म्हणाले.विधान परिषद निवडणुकीत माझा सख्खा भाऊ मोहनराव कदम यांच्याविरोधात उभा होता. या निवडणुकीच्या प्रचारात मी सातत्याने विश्वजित कदम यांच्याबरोबर होतो. विश्वजित यांनी मोहनराव कदम यांना आमदार करण्याचा निर्धारच केला होता. त्यांनी अहोरात्र घेतलेले परिश्रम अविस्मरणीय आहेत, असे आमदार जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.