शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सरकारकडून कर्मचाऱ्यांना दुजाभावाची वागणूक : बलराज मगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:27 IST

सांगली : कर्मचाºयांच्या प्रश्नांवर सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद कर्मचारी युनियनची बैठक; आंदोलन छेडण्याचा इशारा

सांगली : कर्मचाºयांच्या प्रश्नांवर सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. आजवर कर्मचाºयांच्या मागणीसाठी सरकारला विनंती केली. मात्र, आता विनंती न करता तीव्र आंदोलन करणार आहे. राज्य सरकारकडून जिल्हा परिषद कर्मचाºयांना दुजाभावाची वागणूक मिळत असून न्याय न मिळाल्यास बेमुदत संपाची हाक देण्यात येईल, असा इशारा राज्य जिल्हा परिषद युनियनचे प्रदेशाध्यक्ष बलराज मगर यांनी गुरूवारी येथे दिला. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्यावतीने आयोजित कर्मचाºयांच्या बैठकीत मगर बोलत होते.मगर पुढे म्हणाले की, शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. कर्मचाºयांच्या मागण्य मान्य न करता आंदोलन चिरडून टाकण्यावर सरकारचा भर आहे. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे ४७ संघटनांचे प्रतिनिधीत्व करत असून १९७७-७८ मध्ये ५५ दिवसांचा संप केल्यानंतर वेतनश्रेणीबाबत धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला होता. आताही सरकारचे कर्मचाºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे.यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष सुभाष मरिगुद्दी, आरोग्य संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे, कर्मचारी युनियनचे बजरंग संकपाळ, दादासाहेब पाटील, सचिव दत्तात्रय शिंदे, प्रमोद तारळकर, अभय पोतदार, अशोक पाटील, प्रदीप जगताप, शंकरराव काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते....अन्यथा लाँग मार्चसरकारकडून कर्मचाºयांवर वारंवार अन्याय होत असल्याने सरकारवर दबाव आणण्यासाठी सर्वसमावेशक आंदोलन आवश्यक आहे. सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन योजना आदी मागण्यांसाठी लवकरच लाँग मार्च काढावा लागणार आहे. सरकारविरोधातील लढाईसाठी कर्मचाºयांनी तयार राहावे, असे आवाहन मगर यांनी केले.सांगलीत गुरुवारी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बलराज मगर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अशोक पाटील, शंकरराव काळे, दादासाहेब पाटील, अरूण खरमाटे, सुभाष मरिगुद्दी आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक