शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू संशयास्पदच : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:35 IST

माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत यापूर्वीही शंका उपस्थित केली होती. त्यांच्या अत्यसंस्कारावेळी कुणाला जवळ येऊ दिले नव्हते, त्यामुळेच संशय अधिकच बळावत आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, मात्र

ठळक मुद्देसाडेचार वर्षातील देशातील अनेक घटनांबद्दल संशयाचे वातावरण

सांगली : माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत यापूर्वीही शंका उपस्थित केली होती. त्यांच्या अत्यसंस्कारावेळी कुणाला जवळ येऊ दिले नव्हते, त्यामुळेच संशय अधिकच बळावत आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, मात्र सीबीआयवरही विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत संशय असल्याबाबत हॅकर्सच्या मुद्याला पुष्टी देत शेट्टी म्हणाले, सरकारच्या हस्तक्षेपाबाबत आवाज उठविल्यानंतर न्यायाधीश लोया यांचा मृत्यू झाला. मनोहर पर्रीकर यांच्याकडे संरक्षणमंत्रीपद आल्यानंतर दुर्धर आजार होणे, नोटाबंदीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली आजारी पडले. त्यामुळे मनात अनेक संशय निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी होणार तरी कशी, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

एफआरपीच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. राज्यात सुमारे १८० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यापैकी केवळ अकरा कारखान्यांनी उसाची एकरकमी एफआरपी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील पंधरा दिवसांपासून ऊस आंदोलन चालू केले आहे. अनेक कारखान्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकले. कोणत्याही परिस्थितीत एफआरपीचे पैसे तुकडे स्वीकारणार नाही. राज्यातील साखर कारखान्यांकडून पाच हजार ५०० कोटी रुपये थकीत आहेत. उत्तर प्रदेशात अकरा हजार कोटींवर एफआरपीची रक्कम थकली आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी देण्याची जबाबदारी होती, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी उपाययोजना न करता शेतकºयांची थट्टा केली जात असल्याचे दिसून येते. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस उत्पादक शेतकºयांना ९९ टक्के एफआरपी दिली असल्याची घोषणा केली. प्रत्यक्षात २०१५-१६ या वर्षात साखरेला चांगला भाव मिळाला होता. त्यावेळी ९९ टक्के एफआरपीची रक्कम उत्पादकांना प्राप्त झाली आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये ऊस उत्पादक शेतकºयांना किती पैसे मिळाले? याचे उत्तर मोदींनी दिले पाहिजे, त्यामुळे एकरकमी एफआरपीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही.त्यामुळे येत्या २८ जानेवारीला साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून एकरकमी एफआरपीचा जाब विचारला जाईल.साखर आयुक्त कार्यालयापासून हटणार नाही!शेट्टी म्हणाले की, मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबरचे काही सहकारी मंत्री ऊस उत्पादकांना पैसे देऊ नका, असे साखर कारखानदारांना सांगतात. साखर कारखान्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून साखर कारखान्यांना मदत केली जात नाही, जे उसाला दर देण्यास तयार आहेत, त्यांचीही अडवणूक होत आहे. राज्यातील कारखान्यांकडे पाच हजार ५०० कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे. शेतकºयांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली असतानाही सरकार त्यावर कोणताही निर्णय घेत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना निर्णायक लढा घेऊन पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असून, एफआरपीबाबत ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही.एफआरपीच्या फरकाची साखर द्याकारखान्यांना एफआरपीसाठी जेवढे पैसे कमी पडतात, त्या रकमेची साखर द्यावी, असा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. राज्यातील शेतकºयांचे सरासरी उत्पादन ६० टनांपर्यंत आहे. शेतकºयांना टनाला आठ ते दहा किलो साखर मिळणार आहे. कारखान्यांनी दिलेली साखर शेतकरी विकतील. आम्हाला मिळालेल्या साखरेची विक्री करताना त्याच्यावर जीएसटी भरला जाणार नाही. त्यामुळे साखर देण्याची मागणी साखर आयुक्तांकडे करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली