शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू संशयास्पदच : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 23:35 IST

माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत यापूर्वीही शंका उपस्थित केली होती. त्यांच्या अत्यसंस्कारावेळी कुणाला जवळ येऊ दिले नव्हते, त्यामुळेच संशय अधिकच बळावत आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, मात्र

ठळक मुद्देसाडेचार वर्षातील देशातील अनेक घटनांबद्दल संशयाचे वातावरण

सांगली : माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत यापूर्वीही शंका उपस्थित केली होती. त्यांच्या अत्यसंस्कारावेळी कुणाला जवळ येऊ दिले नव्हते, त्यामुळेच संशय अधिकच बळावत आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे, मात्र सीबीआयवरही विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत संशय असल्याबाबत हॅकर्सच्या मुद्याला पुष्टी देत शेट्टी म्हणाले, सरकारच्या हस्तक्षेपाबाबत आवाज उठविल्यानंतर न्यायाधीश लोया यांचा मृत्यू झाला. मनोहर पर्रीकर यांच्याकडे संरक्षणमंत्रीपद आल्यानंतर दुर्धर आजार होणे, नोटाबंदीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली आजारी पडले. त्यामुळे मनात अनेक संशय निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी होणार तरी कशी, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

एफआरपीच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. राज्यात सुमारे १८० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यापैकी केवळ अकरा कारखान्यांनी उसाची एकरकमी एफआरपी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील पंधरा दिवसांपासून ऊस आंदोलन चालू केले आहे. अनेक कारखान्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकले. कोणत्याही परिस्थितीत एफआरपीचे पैसे तुकडे स्वीकारणार नाही. राज्यातील साखर कारखान्यांकडून पाच हजार ५०० कोटी रुपये थकीत आहेत. उत्तर प्रदेशात अकरा हजार कोटींवर एफआरपीची रक्कम थकली आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी देण्याची जबाबदारी होती, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी उपाययोजना न करता शेतकºयांची थट्टा केली जात असल्याचे दिसून येते. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस उत्पादक शेतकºयांना ९९ टक्के एफआरपी दिली असल्याची घोषणा केली. प्रत्यक्षात २०१५-१६ या वर्षात साखरेला चांगला भाव मिळाला होता. त्यावेळी ९९ टक्के एफआरपीची रक्कम उत्पादकांना प्राप्त झाली आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये ऊस उत्पादक शेतकºयांना किती पैसे मिळाले? याचे उत्तर मोदींनी दिले पाहिजे, त्यामुळे एकरकमी एफआरपीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही.त्यामुळे येत्या २८ जानेवारीला साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून एकरकमी एफआरपीचा जाब विचारला जाईल.साखर आयुक्त कार्यालयापासून हटणार नाही!शेट्टी म्हणाले की, मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबरचे काही सहकारी मंत्री ऊस उत्पादकांना पैसे देऊ नका, असे साखर कारखानदारांना सांगतात. साखर कारखान्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून साखर कारखान्यांना मदत केली जात नाही, जे उसाला दर देण्यास तयार आहेत, त्यांचीही अडवणूक होत आहे. राज्यातील कारखान्यांकडे पाच हजार ५०० कोटींची एफआरपीची रक्कम थकीत आहे. शेतकºयांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली असतानाही सरकार त्यावर कोणताही निर्णय घेत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना निर्णायक लढा घेऊन पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार असून, एफआरपीबाबत ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही.एफआरपीच्या फरकाची साखर द्याकारखान्यांना एफआरपीसाठी जेवढे पैसे कमी पडतात, त्या रकमेची साखर द्यावी, असा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. राज्यातील शेतकºयांचे सरासरी उत्पादन ६० टनांपर्यंत आहे. शेतकºयांना टनाला आठ ते दहा किलो साखर मिळणार आहे. कारखान्यांनी दिलेली साखर शेतकरी विकतील. आम्हाला मिळालेल्या साखरेची विक्री करताना त्याच्यावर जीएसटी भरला जाणार नाही. त्यामुळे साखर देण्याची मागणी साखर आयुक्तांकडे करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली