शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

अन्यायाविरोधात मंत्रालयात जाणार

By admin | Updated: April 12, 2017 22:52 IST

सुगम-दुर्गम : खटाव तालुक्यातील दुर्गम शाळांचा फेरविचार करा; शिक्षक संघाची मागणी

पुसेगाव : विविध निकषांचा विचार करून सुगम व दुर्गम प्राथमिक शाळा निश्चित करताना तसेच त्या शाळांचा दर्जा ठरवताना खटाव तालुक्यावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून अन्याय झाला आहे. दि. १६ मार्च २०१७ रोजी या तालुक्यातील सुमारे ८० शाळा दुर्गम (अवघड क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आल्या असतानाही केवळ ९ शाळांना अवघड क्षेत्र मानण्यात आले आहे. त्यामुळे या ९ शाळांव्यतिरिक्त अत्यंत दुर्गम शाळांत काम करणाऱ्या शिक्षकांवर बदलीबाबत अन्याय होणार आहे. प्रशासनाने याचा पुर्नविचार न केल्यास या तालुक्यातील पंचायत समितीचे पदाधिकारी तसेच प्राथमिक शिक्षक संघ व समितीचे पदाधिकारी या अन्यायाविरोधात मंत्रालयात धाव घेणार आहेत.गावात वाहन जात नाही ते गाव दुर्गम व ज्या गावात वाहन जाते ते गाव सुगम या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील गावे सोमवारी निश्चित करण्यात आली. त्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अंतिम मंजुरी ही दिली. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार ७१६ शाळांपैकी ५२८ शाळांचा समावेश अवघड क्षेत्र (दुर्गम) तर २ हजार १८८ शाळांचा सुगम क्षेत्रात झाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी अध्यादेश काढला असून, सुगम व दुर्गम या दोन वर्गातच बदल्या कराव्यात, असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे सुगम भागात १० वर्षे काम केलेल्यांना दुर्गममध्ये तर ३ वर्षे काम केलेल्यांना सुगम भागात बदली पात्र धरले जाणार आहे. जरी संबंधित गावे निवडण्याचे सर्वाधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असले तरी सुगम, दुर्गम गावांची माहिती प्राथमिक स्तरावर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी येथील शिक्षकांना किंवा संघ व समितीच्या पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता ८० शाळा दुर्गम अवस्थेत असतानाही केवळ ९ शाळांची माहिती जिल्हा परिषदेकडे दिली आहे.वास्तविक, खटाव तालुका हा डोंगरी भागात येतो. शासनाच्या विविध सवलतींसाठी हा तालुका अत्यंत दुष्काळी व दुर्गम असताना शिक्षणाच्याबाबतीतच या भागावर का अन्याय? शासनाने लावलेले दुर्गम भागाचे निकष पूर्ण करतील, अशा कित्येक शाळा या तालुक्यात आजही सुरू आहेत. प्रतिकूल परिस्थितीत दुर्गम असणाऱ्या या शाळा आज शासनाच्या या फतव्यामुळे सुगम म्हणून घोषित करण्यात येत आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात या सुगम समजल्या जाणाऱ्या या दुर्गम शाळा केवळ विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद पडतील. असा संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा दुर्गम भागात काम करण्याऱ्या शिक्षकाला सुगम भागातील शिक्षक समजून त्याला बदली केल्याने पुन्हा एकदा दुर्गम भागातच कामाला जावे लागणार आहे. त्यामुळे खटाव तालुक्याच्या बाबतीत दुर्गम असणाऱ्या शाळांचा फेर विचार व्हावा, अशी मागणी शिक्षक, पालक व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)