शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गणपती मंदिरात डल्ला मारत चोरट्यांनीच लुटले 'देवाला' : चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 19:45 IST

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील बागेतील गणपती मंदिर फोडून चोरट्यांनी चांदीच्या पूजेच्या साहित्यावर डल्ला मारला. चार हजार सातशे ग्रॅम वजनाची ही भांडी आहेत. त्याची किंमत ७५ हजार रुपये आहे. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे.हरिपूरचे बागेतील गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. ...

ठळक मुद्देचांदीच्या पूजेच्या साहित्यावर डल्ला; ७५ हजारांचा ऐवज लंपासवान हरिपूरच्यादिशेने रामकृष्ण वाटिकेपर्यंत गेले

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील बागेतील गणपती मंदिर फोडून चोरट्यांनी चांदीच्या पूजेच्या साहित्यावर डल्ला मारला. चार हजार सातशे ग्रॅम वजनाची ही भांडी आहेत. त्याची किंमत ७५ हजार रुपये आहे. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आली. घटनेची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे.

हरिपूरचे बागेतील गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. दररोज दर्शनासाठी गर्दी असते. मंदिराचे पुजारी मयुरेश ताम्हणकर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मंदिर बंद करून घरी गेले. मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी व कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. चोरटे थेट गाभाºयात गेले. तिथे लोखंडी कपाट बंद होते, पण त्याला कुलूप घातले नव्हते. त्यामुळे चोरट्यांना ते सहज उघडता आले. यातील चांदीचा किरीट, घंटा, तांब्या, पळी, भांडे, उंदीर, छत्र, अभिषेक पात्र, पंचारती अशी चार हजार सातशे ग्रॅम वजनाची पूजेची भांडी लंपास केली. कपाटात लॉकरमध्ये चिल्लर व रोकड होती. पण चोरट्यांना लॉकर उघडता न आल्याने ते सुरक्षित राहिली. शनिवारी पहाटे पाच वाजता ताम्हणकर मंदिरात पूजा करण्यासाठी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वान हरिपूरच्यादिशेने रामकृष्ण वाटिकेपर्यंत गेले. तिथेच ते बराचवेळ घुटमळले. ठसे तज्ज्ञांना महत्त्वाचे ठसे मिळाले आहेत. त्याआधारे पुढील तपासाला दिशा देण्यात आली आहे. मंदिरात चोरी झाल्याचे वृत्त वाºयासारखे पसरताच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी ताम्हणकर यांची फिर्याद घेऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विष्णू माळी तपास करीत आहेत.दान केलेले साहित्यचोरट्यांनी लंपास केलेले पूजेचे साहित्य भाविकांनी दान केलेले आहे. मध्यरात्री दोन ते तीन या वेळेत चोरी झाली असण्याची शक्यता आहे. चोरटे दोन किंवा तीन असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांना मंदिरातील माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी अगदी सहजपणे चोरी केली. हरिपूर रस्त्यावर कुठे सीसीटीव्ही कॅमेरा आहे का, याची पोलिसांनी तपासणी सुरू ठेवली आहे. सीसीटीव्हीचे फुटेज मिळाल्यास चोरट्यांचा माग काढणे शक्य होणार आहे.