शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीला ‘विनासिंचन’चे १५ टीएमसी पाणी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:46 IST

सांगली : कृष्णा खोरे लवादासमोर झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला कमी पाणी आले आहे. येथील वंचित गावांना पाणी देण्यासाठी कृष्णा ...

सांगली : कृष्णा खोरे लवादासमोर झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला कमी पाणी आले आहे. येथील वंचित गावांना पाणी देण्यासाठी कृष्णा खोऱ्यातील पाण्याचे फेरवाटप झाले पाहिजे. त्याबाबत राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तोपर्यंत सिंचन नसलेल्या क्षेत्रातील ३३ टीएमसी आरक्षित पाणी १५ टीएमसीने कमी करुन ते सांगली जिल्ह्यातील वंचित गावांना देण्याचे नियोजन आहे. तसा प्रस्ताव अधिकाऱ्यांना करण्याचे आदेश दिल्याची माहिती कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांनी येथे दिली.येथील पाटबंधारे विभागात शुक्रवारी कृष्णा खोरे महामंडळाच्या कामांबाबत बैठक झाली. त्या बैठकीतील निर्णयांची माहिती बानुगडे-पाटील यांनी दिली.ते म्हणाले की, राज्यातील बहुतांशी सिंचन प्रकल्पांची कामे काँग्रेस-राष्ट्रवादीने पन्नास वर्षात पूर्ण केली नाहीत, युतीच्या कालावधित कृष्णा खोरे महामंडळ स्थापन केल्यामुळेच १९९५ नंतर सिंचन योजनांची कामे पूर्ण केली. येत्या वर्षभरात टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांची शंभर टक्के कामे पूर्ण होतील.पाटबंधारे विभागाकडे अधिकारी, कर्मचाºयांचे पदे रिक्त असल्यामुळे पाणी वाटपासह वसुलीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. लवकरच सिंचन योजनांच्या पाणी वाटपासह पाणीपट्टी वसुलीची यंत्रणाही विकसित करण्यात येणार आहे. शेतकºयांकडून पाणीपट्टीचे पैसे घेतल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांना त्यांना पावती दिली पाहिजे. जे देत नसतील त्यांच्यावर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.यावेळी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता नामदेव करे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख संजय विभुते, माजी नगरसेवक शेखर माने, हरिदास लेंगरे आदी उपस्थित होते.जतच्या ४२ गावांना पाणीजत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांना पाणी देण्याच्यादृष्टीने प्रयत्न चालू आहेत. राज्य सरकारशी चर्चा करुन निश्चित वंचित ४२ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्याचा निर्णयही बैठकीत झाला. मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक घेऊन पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कालवा समितीमध्ये : शेतकºयांचा समावेशटेंभू, ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांचे पाणी शेतकºयांच्या सोयीनुसार मिळत नाही, याबाबत शेतकºयांच्या तक्रारी आहेत. कालवा समितीमध्ये शेतकरी प्रतिनिधींचा समावेश करुन घेणार आहे. यापुढे पाणी वाटपाचे वर्षाचे नियोजनच कालवा समितीच्या बैठकीत केले जाणार आहे. यामुळे शेतकºयांची पिके वाळणार नाहीत, असेही बानुगडे-पाटील म्हणाले.