शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

राजकीय तंटामुक्तीसाठी हवेत दोन उपसरपंच, सांगलीतील आरळ्याच्या सामाजिक कार्यकर्त्या मुल्ला यांची मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: July 15, 2023 12:12 IST

सदस्यांची फोडाफोडी व काहीवेळा पळवापळवी होते यामध्ये आर्थिक गैरव्यवहार होतो. गावपातळीवर मोठा तणाव निर्माण होऊन वाद विकोपाला जातो

सांगली : महाराष्ट्रात सरकारने दोन उपमुख्यमंत्री निवडले असून, गावातही दोन उपसरपंच निवडायचे आहेत. कारण गाव पातळीवर राजकीय गट-तट आहेत. वाद मिटवण्यासाठी दोन उपसरपंच निवडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आरळा (ता. शिराळा) येथील सामाजिक कार्यकर्त्या हसिना रमजान मुल्ला यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हा परिषदेला पाठवले आहे.निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील प्रत्येक गावा-गावात अनेक गट असतात, त्यातून अनेकजण ग्रामपंचायत सदस्य म्हणून वेगवेगळ्या पॅनलमधून निवडून आले आहेत. सदस्य झाल्यानंतर प्रत्येकालाच सरपंच किंवा उपसरपंच पद मिळण्याची अपेक्षा असते. सरपंचपद राखीव असेल तर सर्वसाधारण गटाला संधी मिळत नाही. त्यातून अनेकजण नाराज होतात, सदस्यांची फोडाफोडी व काहीवेळा पळवापळवी होते यामध्ये आर्थिक गैरव्यवहार होतो. गावपातळीवर मोठा तणाव निर्माण होऊन वाद विकोपाला जातो.दोन गटात भांडणे होतात व त्याचा दुष्परिणाम गावच्या विकासावर होतो. राजकीय वातावरण दूषित होते. त्यामुळे शासनाने दोन उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे दोन उपसरपंच निवडण्याची तरतूद करण्याची गरज आहे. अनेक ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षांच्या कालावधीत उपसरपंच होण्याची संधी मिळेल व सर्वांना मर्जीप्रमाणे ग्रामविकासात योगदान देता येईल.जिल्हा परिषदेने निवेदन पाठविले शासनाकडेआरळ्याच्या सामाजिक कार्यकर्त्या हसिना मुल्ला यांनी दिलेल्या निवेदनाची जिल्हा परिषदेत चांगलीच चर्चा रंगली होती. प्रशासनानेही निवेदन तत्काळ शासनाकडे पाठविले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायत