शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

दूध उत्पादकांना चार महिन्यांसाठी अनुदान द्या, स्वतंत्र भारत पक्षाची मागणी 

By अशोक डोंबाळे | Updated: February 3, 2024 18:41 IST

शासनाकडून केवळ महिन्यासाठीच अनुदानाची घोषणा

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडून केवळ एक महिन्यासाठीच अनुदानाची घोषणा केली आहे. प्रत्येक्षात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत दुधाचा पुरवठा जास्त होतो. त्यामुळेच दुधाचे दर कमी होत आहेत. म्हणून शासनाने चार महिन्यांसाठी प्रति लिटर ५ रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज आहे, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी शासनाकडे केली आहे.स्वतंत्र भारत पक्षातर्फे शासनाकडे पाठविलेल्या निवेदनात म्हटले की, ५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी अनुदान योजना राबवण्यात येत आहे. सदर योजनेचा कालावधी ११ जानेवारी २०२४ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीकरिता राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. वास्तविक थंडीच्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये दुधाचा पुरवठा जास्त असल्याने दुधाचे दर कमी होतात. मात्र, शासनाने एकाच महिन्यासाठी गायीच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. वास्तविक ते चार महिने शासनाने अनुदान दिले पाहिजे. तसेच अनुदान देतानाही काही त्रुटी आहेत. शासन निर्णयामध्ये म्हटले की, दूध संघांनी किमान २७ रुपये प्रति लिटर दर दूध उत्पादकांना दिला पाहिजे, असे बंधनकारक केले आहे. याचा दूध संघांनी सोयीचा अर्थ काढून पूर्वी दूध उत्पादकांना ३२ रुपये प्रति लिटर दर मिळत होता. त्यामध्ये कपात करुन दूध संघांकडून शेतकऱ्यांना प्रति लिटर २७ रुपये दराने बिले दिली जात आहेत. शासनामार्फत देण्यात येणाऱ्या अनुदानाचा शेतकऱ्यांना कोणताच फायदा होणार नाही. तरी पूर्वीचा जो दर २७ रुपयांपेक्षा जास्त देण्यात येत होता, त्याप्रमाणेच द्यावा, अशी मागणीही केली आहे. दूध संघचालक देत असलेल्या दरावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांना मिळाले पाहिजे, अशी मागणी केली आहे, असेही सुनील फराटे म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीmilkदूधGovernmentसरकार