शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

वाईन पार्कची जागा एमआयडीसीला द्या

By admin | Updated: July 27, 2014 23:08 IST

पलूसकरांची मागणी : विकासासाठी तरुणांची धडपड

पलूस : किर्लोस्कर कारखान्यामुळे पलूस व परिसरात उद्योजकतेची गुणवत्ता ठासून भरली आहे. त्यामुळे पलूसची ‘एमआयडीसी’ आज वेगाने प्रगती करीत आहे. अपुऱ्या जागेमुळे या प्रगतीला मर्यादा पडत आहेत. जवळच असणाऱ्या व सध्या बंद असलेल्या ‘कृष्णा वाईन पार्क’मधील प्लॉट पलूसमधील तरुण उद्योजकांना मिळावेत, अशी मागणी येथील तरुणांमधून होत आहे.पलूस औद्योगिक वसाहतीची स्थापना १९७५ मध्ये झाली. संस्थेने शासनाकडून ३५ एकर जागा खरेदी करून विकास केला. कोणत्याही प्रकारचे शासकीय सहकार्य नसताना किर्लोस्करवाडीच्या किर्लोस्कर उद्योग समूहाच्या पाठबळावर भरभराटीस आली आणि अनेक संकटांवर मात करीत आज प्रगतीपथावर आहे.किर्लोस्कर कारखान्यातून निवृत्त झालेल्या गुणवंत कामगारांना आपला स्वतंत्र उद्योग सुरू करता यावा, या हेतूने या कामगारांनी येथे प्लॉट घेतले. या कामगारांना किर्लोस्कर उद्योग समूहाने मार्गदर्शनच नव्हे, तर कामसुध्दा दिले. या संधीचे सोने करीत केवळ किर्लोस्कर कारखान्यावर अवलंबून न राहता या कामगारांनी इतर राज्यातूनसुध्दा कामे मिळवली. अनेक उद्योजकांनी स्वतंत्रपणे उद्योग सुरू करून मोठे यश मिळवले आणि उद्योजकतेमध्ये पलूसचे नाव नकाशावर आणले.शासनानेसुध्दा या औद्योगिक वसाहतीला पुरेशा दाबाने वीज पुरवठा करून सहकार्य केले आहे. पाणी पुरवठा, रस्ते आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. भारनियमन नसल्याने उद्योजक पूर्ण क्षमतेने उत्पादन घेत आहेत. येथील उद्योजक आणि संस्थेचे मार्गदर्शक विठ्ठलराव येसुगडे यांनी त्यांच्या सहकार्याने वसाहतीचा कायापालट केला आहे. आज या वसाहतीमध्ये एकूण १७0 उद्योग आहेत. पैकी १६७ उद्योग पूर्ण क्षमतेने चालू आहेत. कामगारांची संख्या ४ हजार २00 पर्यंत आहे. सध्या या वसाहतीमध्ये इंजिनिअरिंग जॉब वर्क, प्लॅस्टिक-रबर, सिमेंट पाईप, फौंड्री उद्योग, केमिकल उद्योग, फॅब्रिकेशन, कास्ट अलायन्स, शूज व अन्य देशपातळीवरील लौकिक प्राप्त केलेले उद्योग येथे आले आहेत. येथील काही उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. आज ही वसाहत प्रगतीपथावर असली तरी, अनेक परदेशी उच्च तंत्रशिक्षण घेतलेले तरुण पलूस एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध नसल्याने आपले उद्योग उभारू शकत नाहीत. या गुणवंत तरुण उद्योजकांना जागेसाठी पर्याय म्हणून पलूसजवळ सांडगेवाडी येथे बंद असलेल्या कृष्णा वाईन पार्कमधील ५0 टक्के प्लॉट मिळावेत यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असल्याचे विठ्ठलराव येसुगडे यांनी सांगितले. (वार्ताहर)