शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

पाकिस्तान का नाम मिटा दो : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:57 IST

काश्मीर येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे सावट शुक्रवारी तासगावातील कार्यक्रमात दिसून आले. ‘अब जो नगाडा बज गया है सैतानोें का, नक्शे पर से नाम

ठळक मुद्देदहशतवादी कृत्याचा तीव्र शब्दात निषेध

तासगाव : काश्मीर येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे सावट शुक्रवारी तासगावातील कार्यक्रमात दिसून आले. ‘अब जो नगाडा बज गया है सैतानोें का, नक्शे पर से नाम मिटा दो पाकिस्तान का’, अशा तीव्र शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानविरोधी संपात व्यक्त केला.

काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे सावट शुक्रवारी तासगावातील पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमावरही दिसून आले. सत्कार-समारंभाला फाटा देत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी मनोगत व्यक्त केलेल्या सर्वच मंत्र्यांनी पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाब्दिक हल्ला चढविला. पाकिस्तान भिकारी झालाय. त्यांचा पंतप्रधान जगभर कटोरा घेऊन फिरतोय. दुसरीकडे असे भ्याड हल्ले करतो. शहीद झालेल्या जवानांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही, आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. गनिमीकाव्याने कसा बदला घ्यायचा हे सांगायची गरज नाही. सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही ते करून दाखवलंय.मला उतरवायचा आहे पाकचा माज : आठवलेखास कवितांसाठी प्रसिध्द असलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी, ‘तासगावमध्ये मी आलो आहे आज, कारण मला उतरवायचा आहे पाकिस्तानचा माज...’ अशा काव्यपंक्ती सादर करून पाकिस्तानवर कॉव्यबॉम्बमधून निशाणा साधला.

आठवले यांनी कवितेतूनच थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांवरच हल्ला चढवला. ‘हल्ले केले जातात, का वाटत नाही लाज, नरेंद्र मोदी तोडून टाकणार आहेत इम्रान खानचा माज’; ‘आज मला फोडावा लागेल पाकिस्तानचा डोळा, फिरवावा लागेल पाकिस्तानवर पेटलेला बोळा’, अशा शब्दात पाकिस्तानवर शब्दहल्ला चढवून त्यांनी निषेध व्यक्त केला. भारताबरोबर जिंंकायची पाकिस्तानची ताकद नाही. आम्ही वाघ आहोत, पाकिस्तान उंदरासारखे आहे. निवडणुकीच्यावेळी निवडणुका, पण देशासाठी आम्ही एकसंध असल्याचे आठवले यांनी सांगितले. पाकिस्तानवर काव्यहल्ला करणाऱ्या आठवलेंच्या कवितेला उपस्थितांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवले