शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

शिराळा-वाळव्यास दुष्काळाच्या सवलती द्या

By admin | Updated: November 6, 2015 23:54 IST

रणधीर नाईक : अंत्री बुद्रुकमधून शिराळा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसह पदयात्रा

कोकरूड : शिराळा व वाळवा तालुक्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप हंगाम वाया गेला असून, या गावांना दुष्काळाच्या सवलती मिळाव्यात. येथील शेतकऱ्यांवर विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे आत्महत्येची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने वस्तुनिष्ठ अहवाल पाठवावा. आम्ही शासनविरोधी नाही. मात्र गरज पडल्यास शासनाविरोधात तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनी शुक्रवारी दिला. अंत्री बुद्रुक ते शिराळा तहसील कार्यालय अशी साडेसात ते आठ किलोमीटरची पदयात्रा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. कार्यालयापुढे यावेळी पदयात्रेसाठी जमलेल्या हजारो शेतकऱ्यांसमोर नाईक बोलत होते. सकाळी दहा वाजता पदयात्रेस प्रारंभ झाला, तर दुपारी एक वाजता तहसील कार्यालयासमोर विसर्जन झाले. यावेळी सुखदेव पाटील, अ‍ॅड. बाबालाल मुजावर, विजय पाटील साखराळकर, प्रकाश पाटील, विजय कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. नाईक म्हणाले, यावर्षी शिराळा तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे. प्रारंभी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाला नजरपाहणी अहवाल अत्यंत निष्काळजीपणे पाठवला आहे. त्यामुळे शासनाच्या निकषात शिराळा, वाळवा तालुका बसला नाही. शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठार, मेणी, येळापूर विभाग, काळुंद्रे व पणुंब्रे खोरा, शिंदेवाडी, संपूर्ण उत्तर विभाग व वाळवा तालुक्याच्या महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजूची काही गावे पूर्णत: अवर्षणग्रस्त आहेत. महसूल विभागाने प्रत्यक्ष जागेवर न जाता कार्यालयात बसून चुकीचा नजर पाहणी अहवाल शासनाला पाठविण्याचे पाप केल्याने, शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड रोष आहे. शासनाने यावर्षी प्रथमच इंग्रज राजवटीच्या काळातील दुष्काळाचे निकष बदलून ५० टक्केऐवजी ६७ टक्के पिके आलेल्या गावात दुष्काळ जाहीर करावा, असा नवा निकष आणला आहे. त्यामुळे या निकषात शिराळा व वाळवा तालुक्यातील सर्व अवर्षणग्रस्त गावांना दुष्काळी सवलतींचा लाभ होणार आहे. नाईक म्हणाले, महसूल विभागाने यापूर्वी केलेली चूक पुन्हा करू नये. नाही तर शेतकरी तुम्हाला त्रास दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशारा दिला. दुष्काळात असणाऱ्या सर्व सवलतीसह सोयी-सुविधा मिळाव्यात व जलयुक्त शिवार योजनेत दुष्काळी गावाचा समावेश व्हावा, अशा मागणीचे निवेदन शिराळा तहसीलदारांना पहिल्यांदा आमच्याकडून देण्यात आले आहे. त्याचबरोबर अवर्षणग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या सलग पंधरा दिवस बैठका घेतल्या व दुष्काळाबाबत त्यांच्यामध्ये जागृती केल्यामुळेच पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी संचालक आनंदराव पाटील, प्रकाश पाटील, उत्तम निकम, महेश पाटील, सुकुमार पाटील, संभाजी पाटील, दिनकर पाटील, पांडुरंग पाटील, एम. सी. पाटील, शंकर पाटील, संपत पाटील, दीपक खराडे, विश्वास पाटील, महादेव जाधव, सुनील पाटील, जयवंत पाटील उपस्थित होते. (वार्ताहर) शेतकरी हवालदिल : प्रशासनाला जागे करणार नाईक म्हणाले, ही पदयात्रा शासनाविरोधात नाही, मात्र सुस्तावलेल्या भ्रष्ट प्रशासनाला जाग आणण्यासाठी ही पदयात्रा आहे. महसूल विभागात काम करणारी शेतकऱ्यांचीच मुले आहेत. यंदा शेतकरी दुष्काळामुळे प्रचंड हवालदिल झाला आहे. मात्र प्रशासनाने शासनाला चुकीचा अहवाल पाठवला आहे. आता तरी झाकलेले डोळे उघडा आणि पीक कापणीचा, नंतर येणाऱ्या उत्पन्नाचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवा. जर असे झाले नाही, तर प्रथम प्रशासनाविरुद्ध व नंतर शासनाविरुद्ध शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे करू.