शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

सामूहिक बलात्कार करून मुलीचा खून

By admin | Updated: January 6, 2017 23:50 IST

माळवाडीतील घटना : भिलवडी, अंकलखोपमध्ये छापे; चार संशयित ताब्यात; कृष्णाकाठची गावे आज बंद

सांगली/भिलवडी : माळवाडी (ता. पलूस) येथील चौदावर्षीय शाळकरी मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला. शुक्रवारी सकाळी साडेआठला ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण व भिलवडी पोलिसांनी भिलवडी, माळवाडी, अंकलखोप येथे छापे टाकून सायंकाळपर्यंत चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या नावांबाबत पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे. आज, शनिवारी या घटनेच्या निषेधार्थ कृष्णाकाठच्या गावात बंद पुकारण्यात येणार असून, भिलवडीतून मूक मोर्चाही काढला जाणार आहे.पीडित मृत मुलगी आई व बहिणीसोबत माळवाडीतील चव्हाण प्लॉट परिसरात राहत होती. दहा वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. ती जवळच भिलवडी येथील सेकंडरी स्कूलमध्ये आठवीत शिकत होती. तिची आई सूतगिरणीत नोकरीस आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. गुरुवारी रात्री तिचा आईशी कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादातून ती साडेआठ वाजता घरातून बाहेर पडली होती. रात्रीचे दहा वाजले तरी ती घरी आली नव्हती. त्यामुळे आईने परिसरात जाऊन तिचा शोध घेतला. तिच्या मैत्रिणींकडेही चौकशी केली, तथापि तिला कोणीच पाहिले नसल्याचे सांगण्यात आले. आई रात्रभर तिची प्रतीक्षा करत बसली होती, पण ती घरी परतलीच नाही. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता भिलवडी-तासगाव रस्त्यावरील धान्य गोदामाजवळ या मुलीचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी याची माहिती भिलवडी पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. माळवाडीतील बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय, उपअधीक्षक वैशाली शिंदे, उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील, गुंडाविरोधी पथकाचे निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. मृतदेहाजवळ संशयास्पद काहीच सापडले नाही. तिचा बलात्कार करून खून केल्याचा अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी बांधला. तशा महत्त्वाच्या खुणा पंचनामा करताना आढळून आल्या. परंतु शवविच्छेदन केल्यानंतरच खरे कारण पुढे येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मृतदेह विच्छेदन तपासणीसाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत न्यायवैद्यक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विच्छेदन तपासणी सुरू होती. (प्रतिनिधी/वार्ताहर)गावे बंद; आज मोर्चाया घटनेच्या निषेधार्थ भिलवडी, माळवाडी, अंकलखोप आदी कृष्णाकाठच्या गावांत शनिवारी बंद पुकारण्यात आला आहे. भिलवडीत सकाळी नऊ वाजता मूक निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पोलिसांनी सखोल तपास करावा : पतंगराव कदममाळवाडीत शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया आ. पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. या घटनेचा निषेध करून ते म्हणाले की, जिल्हा पोलिस प्रमुखांशी दूरध्वनीवर संपर्क साधून घटनेची माहिती घेतली आहे. या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन तपास करावा, संशयितांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.