शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सांगली जिल्ह्यात २४ तासाला होतेय एका मुलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:39 IST

सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ३१ अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाले. यामध्ये मुलींची संख्या ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ३१ अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाले. यामध्ये मुलींची संख्या अधिक असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. त्यात २६ मुली व पाच मुलांचा समावेश आहे. आकडेवारी पाहिली तर २४ तासाला एका मुलीचे अपहरण होत असल्याचे दिसून येते. मुलींच्या शोधासाठी पालकांची धावाधाव सुरू आहे. सांगली, मिरजेतील बस व रेल्वे स्थानकावर दररोज मुला-मुलींचा शोध घेतला जात आहे.अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलीस दप्तरी ‘बेपत्ता’ अशीच नोंद होत असे. काही वर्षापूर्वी यामध्ये बदल करण्यात आला. बेपत्ता अल्पवयीन मुला-मुलींचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, यासाठी गृहविभागाने त्यांची अपहरण झाल्याची नोंद करावी, तसेच २४ तासातील तपासाचा अहवाल द्यावा, असा आदेश काढला. तेव्हापासून बेपत्ता झालेल्या मुला-मुलींचे अपहरण झाल्याची नोंद केली जाते. जिल्ह्यात सातत्याने मुले-मुली गायब होतात. मात्र गेल्या महिन्याभरात तब्बल ३१ मुले-मुली गायब झाली आहेत. यामध्ये २६ मुलींचा समावेश असल्याने पालकांच्यादृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. पालकांनी संबंधित पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केल्या आहेत. पोलीस तपास सुरू आहे. परंतु अजून एकाही मुलीचा शोध घेण्यात यश आलेले नाही. जिल्ह्यात २५ पोलीस ठाणी आहेत. या प्रत्येक पोलीस ठाण्यात महिन्याभरात मुलींचे अपहरण झाल्याची नोंद झाली आहे. १२ ते १६ वयोगटातील या मुली आहेत. गेल्या आठवड्यात वडर कॉलनीतील १२ वर्षाची मुलगी घराबाहेर उभी होती. ती अचानक गायब झाली. ही मुलगी मोबाईलही वापरत नाही. त्यामुळे तिचा शोध घेण्याचे आव्हान आहे. अपहृत अन्य मुलींकडे मोबाईल आहेत; पण ते बंद आहेत. तांत्रिक पद्धतीने पोलीस तपास करीत आहेत. पोलीस ठाण्यात दैनंदिन काम खूप असते. सध्या लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांना २४ तास कामात अडकून रहावे लागत आहे. यातून या मुला-मुलींचा शोध घेण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. पालकही शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुली सापडत नसल्याने त्यांची धावाधाव सुरू आहे.फूस लावून पळविलेअपहृत मुलींच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये, त्यांच्या मुलींना फूस लावून पळविल्याची नोंद आहे. काही प्रकरणात तर लग्नाच्या आमिषाने पळविले, अशी नोंद आहे. बहुतांश प्रकरणात संशयितांची नावे निष्पन्न झालेली नाहीत. काही संशयितांची नावे पुढे आली आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक पोलिसांनी याचा तपास केला नाही, तर ही प्रकरणे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाकडे सोपविली जातात.