शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

सांगली जिल्ह्यात २४ तासाला होतेय एका मुलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:39 IST

सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ३१ अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाले. यामध्ये मुलींची संख्या ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ३१ अल्पवयीन मुला-मुलींचे अपहरण झाले. यामध्ये मुलींची संख्या अधिक असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. त्यात २६ मुली व पाच मुलांचा समावेश आहे. आकडेवारी पाहिली तर २४ तासाला एका मुलीचे अपहरण होत असल्याचे दिसून येते. मुलींच्या शोधासाठी पालकांची धावाधाव सुरू आहे. सांगली, मिरजेतील बस व रेल्वे स्थानकावर दररोज मुला-मुलींचा शोध घेतला जात आहे.अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलीस दप्तरी ‘बेपत्ता’ अशीच नोंद होत असे. काही वर्षापूर्वी यामध्ये बदल करण्यात आला. बेपत्ता अल्पवयीन मुला-मुलींचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा, यासाठी गृहविभागाने त्यांची अपहरण झाल्याची नोंद करावी, तसेच २४ तासातील तपासाचा अहवाल द्यावा, असा आदेश काढला. तेव्हापासून बेपत्ता झालेल्या मुला-मुलींचे अपहरण झाल्याची नोंद केली जाते. जिल्ह्यात सातत्याने मुले-मुली गायब होतात. मात्र गेल्या महिन्याभरात तब्बल ३१ मुले-मुली गायब झाली आहेत. यामध्ये २६ मुलींचा समावेश असल्याने पालकांच्यादृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. पालकांनी संबंधित पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केल्या आहेत. पोलीस तपास सुरू आहे. परंतु अजून एकाही मुलीचा शोध घेण्यात यश आलेले नाही. जिल्ह्यात २५ पोलीस ठाणी आहेत. या प्रत्येक पोलीस ठाण्यात महिन्याभरात मुलींचे अपहरण झाल्याची नोंद झाली आहे. १२ ते १६ वयोगटातील या मुली आहेत. गेल्या आठवड्यात वडर कॉलनीतील १२ वर्षाची मुलगी घराबाहेर उभी होती. ती अचानक गायब झाली. ही मुलगी मोबाईलही वापरत नाही. त्यामुळे तिचा शोध घेण्याचे आव्हान आहे. अपहृत अन्य मुलींकडे मोबाईल आहेत; पण ते बंद आहेत. तांत्रिक पद्धतीने पोलीस तपास करीत आहेत. पोलीस ठाण्यात दैनंदिन काम खूप असते. सध्या लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांना २४ तास कामात अडकून रहावे लागत आहे. यातून या मुला-मुलींचा शोध घेण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. पालकही शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुली सापडत नसल्याने त्यांची धावाधाव सुरू आहे.फूस लावून पळविलेअपहृत मुलींच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये, त्यांच्या मुलींना फूस लावून पळविल्याची नोंद आहे. काही प्रकरणात तर लग्नाच्या आमिषाने पळविले, अशी नोंद आहे. बहुतांश प्रकरणात संशयितांची नावे निष्पन्न झालेली नाहीत. काही संशयितांची नावे पुढे आली आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक पोलिसांनी याचा तपास केला नाही, तर ही प्रकरणे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाकडे सोपविली जातात.