शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

चांदोलीतील अधिवास सोडून गवे वारणावती वसाहतीत मुक्कामाला; गव्यांचे कळप नागरी भागात

By संतोष भिसे | Updated: May 19, 2024 15:47 IST

फिरायला जाणाऱ्या नागरिकांना भीतीने फुटला घाम

संतोष भिसे, आनंदा सुतार, लोकमत न्यूज नेटवर्क, वारणावती: मणदूर (ता. शिराळा) परिसरात गव्यांच्या कळपाने ग्रामस्थांची झोप उडवली आहे. सध्या परिसरात खरीप हंगामातील शेती कामांची लगबग सुरु झाली आहे. शेतकरी रानामाळात काम करण्यात व्यस्त आहेत. गव्यांचे कळप मानवी वस्तीत शिरकाव करत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गव्यांचा मानवी वस्तीतील वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वारणावती वसाहतीत निर्मनुष्य झालेल्या पडक्या खोल्या व बाजूलाच असणाऱ्या ऊसाच्या फडात गव्यांनी तळ ठोकल्याचे बऱ्याच महिन्यांपासून गावकऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. काही ग्रामस्थांनी  कळपाला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत घालवण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु ते अयशस्वी ठरले. शनिवारी (दि.१८) सकाळी राम पाटील, शरद पाटील, अशोक सोनार, आनंदा बागडे, एन. के. कांबळे हे ग्रामस्थ फिरायला गेले असता एकाच वेळी अंदाजे १५ ते १६ सोळा गव्यांचा कळप नदीकडील बाजूने जुन्या आश्रमशाळेजवळून डोंगराच्या दिशेने जाताना दिसला. यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या ग्रामस्थांत घबराट निर्माण झाली आहे.

गव्यांनी परिसरातील ऊसासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्याचबरोबर गव्यांचा मुक्तसंचार ग्रामस्थांच्या जीवावरही बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

गवे किती आणि कोठे थांबले आहेत?

वारणावती वसाहतीमध्ये सध्या वापराविना बंद अवस्थेत पडून असलेल्या रिकाम्या खोल्या आणि बाजुने वाढलेली काटेरी झुडपे तसेच शिवारातील ऊसाची शेती यामध्ये वन्य प्राण्यांनी नवीन अधिवास तयार केला आहे. पाणी पिण्यासाठी जवळच वारणा नदी असल्याने अन्न व पाण्याच्या शोधात गवे व अन्य प्राणी नागरी वसाहतीत येत आहेत. गव्यानी चांदोली राष्ट्रीय उद्यानातील आपला मूळचा अधिवास सोडून मानवी वस्तीकडे मोर्चा वळवला आहे.

टॅग्स :Sangliसांगली