शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
5
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
6
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
7
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
8
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
9
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
10
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
11
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
12
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
13
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
14
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
15
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
16
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
17
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
18
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
19
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
20
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे

गडकरींनी हडपकेलेला कारखाना परत करुन प्रायश्चित करावे : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:55 IST

साखर कारखाना काढून आपण पाप केले, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना वाटत असेल तर, त्यांनी हडप केलेला कारखाना पुन्हा कमी किमतीत संबंधितांना परत करून पापाचे प्रायश्चित्त करावे,

सांगली : साखर कारखाना काढून आपण पाप केले, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना वाटत असेल तर, त्यांनी हडप केलेला कारखाना पुन्हा कमी किमतीत संबंधितांना परत करून पापाचे प्रायश्चित्त करावे, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

शेट्टी म्हणाले की, साखर उद्योगासाठी यापुढे पॅकेज देणार नाही म्हणणाºया गडकरींनी कारखाने व साखर उद्योगातून मिळालेल्या कराचे काय केले, हे जनतेला सांगावे. मागील जन्मी पाप केले म्हणून कारखाना काढला, असेही त्यांनी वक्तव्य केले. एकप्रकारे ते कारखानदारांचीच बाजू मांडत आहेत. भाजप नेत्यांकडील साखर कारखान्यांची संख्या वाढत असल्याने बहुधा अशी मते व्यक्त होत आहेत. साखर उत्पादन वाढल्यामुळे दराचा प्रश्न निर्माण झाल्याची दिशाभूल करणारी माहिती गडकरी देत आहेत. वास्तविक केंद्रानेच गतवेळी पाकिस्तानसह अन्य देशांमधून साखर आयात केल्यामुळे यंदा साखरेच्या दराचा प्रश्न निर्माण केला आहे.एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकºयांना दर देण्यासाठी राज्याची तिजोरी रिकामी करून म्हणून घोषणा करतात आणि त्यांच्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री गडकरी मात्र साखर उद्योगाला पॅकेज मिळणार नाही म्हणून ठामपणे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांना साखर उद्योगातील काही कळत नाही, असे गडकरींना वाटत आहे का? कारखाने ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असे ते म्हणत असले तरी, सोन्याची अंडी कारखानदार आणि सरकारच्याच पदरात पडली आहेत. शेतकरी मात्र संघर्ष करीत आहेत. कारखाने इतकेच अडचणीत असतील तर, मग कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव का दाखल होत आहेत, याचे उत्तर सरकारने द्यावे. सरकारचा हा दुटप्पीपणा आहे. एकरकमी एफआरपीच्या मुद्द्यावरही आम्ही ठाम आहोत. त्यामुळे येत्या १ जानेवारी रोजी कोल्हापुरात साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार आहोत.कोण गुडघे टेकणार ते कळेल!कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टींना गुडघे टेकायला लावू, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. त्याविषयी शेट्टी म्हणाले की, घोडेमैदान लांब नाही. कोण गुडघे टेकणार आणि कोण माती खाणार हे त्यांनाही लवकरच कळेल, असा इशारा शेट्टींना यावेळी दिला.रस्ते ‘बीओटी’तूनच होणारदोन्ही शासनाकडून वारंवार महामार्गासाठी निधीची घोषणा होत आहे. कोट्यवधी रुपयांची तरतूद केल्याचे ते सांगत आहेत, पण या कामांमागे ‘बीओटी’ दडले आहे. सरकार निधीतून रस्ते करणार की खासगीकरणातून, हे स्पष्ट करावे. टोल लावून हे सरकार रिकामे होईल. पुढीलवेळी लोकांचा संताप सहन करायला ते नसतील, असे शेट्टी म्हणाले.आघाडीसाठी अटीसंपूर्ण कर्जमाफी, दीडपट हमीभाव अशा दोन गोष्टींचा जाहीरनाम्यात समावेश केला तरच आम्ही आघाडीत सहभागी होऊ, असे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगलीNitin Gadkariनितीन गडकरी