शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कर्मवीरांच्या जन्मगावी स्मारकासाठी निधी द्या, राज्याच्या प्रधान सचिवांकडे मागणी : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 21:30 IST

ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) गावचे सुपुत्र, थोर शिक्षणमहर्षी व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गावामध्ये राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे

ऐतवडे बुद्रुक (सांगली) : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) गावचे सुपुत्र, थोर शिक्षणमहर्षी व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गावामध्ये राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने गावाच्या विकासासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी राज्याच्या प्रधान सचिवांकडे केली आहे, अशी माहिती उपसरपंच सौरभ पाटील यांनी दिली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांची ऐतवडे बुद्रुक ही मातृभूमी आहे. कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक खेडोपाड्यात शिक्षणाची ज्ञानगंगा पसरविली. कर्मवीर भाऊराव पाटील यांची अनेक ठिकाणी स्मारके आहेत. तसेच रयत शिक्षण संस्था व विविध माध्यमातून अनेक गावांचा विकासही साधला आहे.मात्र कर्मवीरांची मातृभूमी असणारे ऐतवडे बुद्रुक हे गाव मात्र कर्मवीरांचे स्मारक व विकासात्मक दृष्टीने मागासच राहिले आहे. त्यामुळे या दुर्लक्षित गावात कर्मवीरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरघोस निधी मिळावा, अशी मागणी नागपूर अधिवेशनात माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांनी राज्याच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.

सध्या येथील बाजारपेठेत कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अर्धपुतळा आहे. तत्कालीन सरपंच बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून लोकवर्गणीतून तो उभारला होता. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री पतंगराव कदम यांनी दिलेल्या निधीतून पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. परंतु कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यास साजेसे असे स्मारक व्हावे, त्यामध्ये अण्णांचा पूर्णाकृती पुतळा, सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, प्रशस्त सभागृह, शिल्पसृष्टी व इतर सोयी व्हाव्यात, अशी मागणी होत आहे.अण्णांचे गाव म्हणून ऐतवडे बुद्रुकची राज्यभर ओळख व गावची सुधारणा व्हावी यासाठी शासनाने भरीव निधी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ व उपसरपंच सौरभ पाटील यांनी केली आहे.

स्मारक रखडलेऐतवडे बुद्रुक येथे कर्मवीरांच्या वारसांच्या नावाने सुमारे दोन गुंठे जागा आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून येथे स्मारक होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु प्रशस्त जागेअभावी तो प्रस्ताव मागे राहिला आहे. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्मारक व्हावे व गावच्या विकासासाठी भरीव निधी मिळावा यासाठी आजपर्यंत राज्यातील४० आमदारांना पत्रे पाठवली आहेत. तसेच सर्व आमदार व मंत्री यांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच गावातील सर्वपक्षीय नेत्यांना घेऊन संबंधित मंत्री व मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.- सौरभ पाटील,उपसरपंच, ऐतवडे बुद्रुक.