शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

‘एफआरपी’ कायदा हा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2015 00:13 IST

रघुनाथदादा पाटील : कवलापुरात शेतकरी मेळावा

बुधगाव : कोणाच्याही संमतीने उसाच्या ‘एफआरपी’चा कायदा कारखानदारांनाही मोडता येत नाही आणि मुख्यमंत्र्यांनाही. तो आमचा हक्क आहे. मुख्यमंत्र्यांनीच कायदा मोडण्याचे वक्तव्य करणे, हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी कवलापूर (ता. मिरज) येथे ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात केले.उसाची एफआरपी किंमत एकरकमी मिळावी आणि अंतिम भाव ३ हजार ५०० रुपये मिळावा, या मागण्या मेळाव्यात करण्यात आल्या. रघुनाथदादा म्हणाले की, राज्य सरकारने कळविलेल्या ऊस उत्पादन खर्चापेक्षा केंद्राने जादा खर्च मान्य केला आहे. मात्र स्वामीनाथन् समितीच्या शिफारसीनुसार ऊस दर देण्यास केंद्र सरकारही अद्याप तयार झालेले नाही. स्वाभिमानी संघटनेच्या नावावर काहींची शेतकऱ्यांशी बेईमानी सुरु आहे. एक टन उसाच्या उत्पादनापासून राज्य आणि केंद्र सरकारला सुमारे ४ हजार रुपये कर मिळतो. मात्र दुसरीकडे शेतकरी देशोधडीला लागला आहे.शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. कांदा, डाळींसह सर्वच शेतीमालाला योग्य हमीभाव दिल्यास अशी वेळ येणार नाही.राजारामबापू कारखान्याच्या अखत्यारीतील ‘वाटेगाव, सर्वोदय’ला वेगळा दर आणि ‘जत’ला वेगळा दर, असे चालणार नाही. जत कारखान्याला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र यावे. कायद्यानेच त्यांना जाब विचारुया.क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव नांदरिवले म्हणाले की, कारखानदारांचा शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग थांबविण्यासाठी शेतकऱ्यांंनी एकत्र येऊनच त्यांना झुकवावे लागेल. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक माने यांनी स्वागत केले. आभार अरुण सावंत यांनी मानले. यावेळी अशोक पाटील, किसनराव बोधले-पाटील, प्रकाश हाक्के यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)हमीभाव देण्याची गरजसरकार बाहेरून ४७ रुपये किलोने कांदा, १४७ रुपये किलो दराने तुरडाळ आयात करते. मात्र इथल्या शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. कांदा, डाळींसह सर्वच शेतीमालाला योग्य हमीभाव दिल्यास अशी वेळ येणार नाही, असे रघुनाथ पाटील म्हणाले.