शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’ कायदा हा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2015 00:13 IST

रघुनाथदादा पाटील : कवलापुरात शेतकरी मेळावा

बुधगाव : कोणाच्याही संमतीने उसाच्या ‘एफआरपी’चा कायदा कारखानदारांनाही मोडता येत नाही आणि मुख्यमंत्र्यांनाही. तो आमचा हक्क आहे. मुख्यमंत्र्यांनीच कायदा मोडण्याचे वक्तव्य करणे, हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी कवलापूर (ता. मिरज) येथे ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात केले.उसाची एफआरपी किंमत एकरकमी मिळावी आणि अंतिम भाव ३ हजार ५०० रुपये मिळावा, या मागण्या मेळाव्यात करण्यात आल्या. रघुनाथदादा म्हणाले की, राज्य सरकारने कळविलेल्या ऊस उत्पादन खर्चापेक्षा केंद्राने जादा खर्च मान्य केला आहे. मात्र स्वामीनाथन् समितीच्या शिफारसीनुसार ऊस दर देण्यास केंद्र सरकारही अद्याप तयार झालेले नाही. स्वाभिमानी संघटनेच्या नावावर काहींची शेतकऱ्यांशी बेईमानी सुरु आहे. एक टन उसाच्या उत्पादनापासून राज्य आणि केंद्र सरकारला सुमारे ४ हजार रुपये कर मिळतो. मात्र दुसरीकडे शेतकरी देशोधडीला लागला आहे.शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. कांदा, डाळींसह सर्वच शेतीमालाला योग्य हमीभाव दिल्यास अशी वेळ येणार नाही.राजारामबापू कारखान्याच्या अखत्यारीतील ‘वाटेगाव, सर्वोदय’ला वेगळा दर आणि ‘जत’ला वेगळा दर, असे चालणार नाही. जत कारखान्याला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र यावे. कायद्यानेच त्यांना जाब विचारुया.क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव नांदरिवले म्हणाले की, कारखानदारांचा शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग थांबविण्यासाठी शेतकऱ्यांंनी एकत्र येऊनच त्यांना झुकवावे लागेल. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक माने यांनी स्वागत केले. आभार अरुण सावंत यांनी मानले. यावेळी अशोक पाटील, किसनराव बोधले-पाटील, प्रकाश हाक्के यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)हमीभाव देण्याची गरजसरकार बाहेरून ४७ रुपये किलोने कांदा, १४७ रुपये किलो दराने तुरडाळ आयात करते. मात्र इथल्या शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. कांदा, डाळींसह सर्वच शेतीमालाला योग्य हमीभाव दिल्यास अशी वेळ येणार नाही, असे रघुनाथ पाटील म्हणाले.