शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

पाण्यासाठी शिराळ््यामध्ये मोर्चा

By admin | Updated: March 7, 2017 23:58 IST

कॉँग्रेस, राष्ट्रवादीतर्फे आंदोलन : लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागावर आंदोलनकर्त्यांचा संताप

शिराळा : तालुक्यातील उत्तर भागासह विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या भागाला तातडीने पाणी न मिळाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चास सुरुवात झाली. आंदोलनाचे नेतृत्व माजी आ. मानसिंगराव नाईक, कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले. यावेळी पंचायत समिती सभापती सम्राटसिंह नाईक, विराज नाईक, अशोकराव पाटील सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना मानसिंगराव नाईक म्हणाले की, वाकुर्डे योजनेचे पाणी शेतीपेक्षा औद्योगिक विभागातील कारखानेच जास्त वापरतात. मात्र याचे बिल शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. पाण्यावर पहिला हक्क पिण्यासाठी, नंतर शेती आणि शेवटी औद्योगिक वापरासाठी करायचा असताना, आज तालुक्यातील उत्तर भाग पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत आहे. सर्वस्वी जबाबदार लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभाग आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, जि. प. सदस्या आशा झिमूर, बाबालाल मुजावर, सुनंदा सोनटक्के, हिंदुराव बसरे, नारायण चव्हाण, चंद्रकांत पाटील, बाबासाहेब पाटील, रवींद्र पाटील, संपतराव देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी जि. प. सदस्या अश्विनी नाईक, शुभलक्ष्मी नाईक, राजेंद्र नाईक, विश्वप्रताप नाईक, बाळासाहेब पाटील, पं. स. सदस्य अमर पाटील, माया कांबळे, सुरेश पाटील, डॉ. राजाराम पाटील, पी. वाय. पाटील यांच्यासह महिला, शेतकरी उपस्थित होता. माजी जि. प. सदस्य के. डी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विश्वास पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)पाण्याचा ५0 टक्केपेक्षा जास्त वापर औद्योगिक वापरासाठीच होतोयशेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याअगोदर बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. शेतकरी व औद्योगिक यांना वेगळा न्याय का? असाही सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस आघाडी सरकारने वाकुर्डे योजनेस निधी दिला. त्यामुळे या योजनेचे पाणी मोरणा धरण तसेच मांगलेपर्यंत पोहोचले. मोरणा धरण बांधताना औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी उपलब्धतेचा विचार केला गेला नाही. करमजाई तलावात पाणी आल्याने उत्तर भागास पाणी मिळत आहे. या तलावातून पिण्याच्या पाण्याचे नियोजन न करता सर्व पाणी सोडून दिले. त्यामुळे या पाणी टंचाईस पाटबंधारे विभाग जबाबदार आहे. त्याचबरोबर वाकुर्डेच्या वीज बिलाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसविले आहे. मात्र या पाण्याचा ५0 टक्केपेक्षा जास्त वापर औद्योगिक वापरासाठी होतो. त्यांच्याकडून औद्योगिक दराने पाणीपट्टी वसूल करा, नंतर शेतकऱ्यांची वीज कनेक्शन्स तोडण्याची भाषा करा. शेतकऱ्यांना जपण्याची व सांभाळण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी ठेवावी. शेतकरी वीज बिल भरण्यास तयार आहेत, मात्र प्रथम औद्योगिक संस्थांची वीज बिले भरुन घ्या, असे मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.उग्र आंदोलन करुजि. प. सदस्य सत्यजित देशमुख म्हणाले, हा मोर्चा म्हणजे पहिला इशारा आहे. जर आठ दिवसात पाणी मिळाले नाही, तर उग्र आंदोलन करु. करमजाई तलावातील पाणी जि. प., पं. स. निवडणुकीत विजय मिळावा यासाठी तर सोडले नाही ना? टेंभू, म्हैसाळ या योजनेचे वीज बिल जसे टंचाईग्रस्त म्हणून शासन भरते, त्याप्रमाणे येथील बिलही शासनाने भरावे, अशी मागणी त्यांनी केली.