शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मुकादमाच्या छळातून ऊस तोडणी मजुरांची सुटका करा, राजू शेट्टी यांची मागणी

By अशोक डोंबाळे | Updated: March 31, 2023 14:37 IST

ऊसतोडणी मजुरांना पेन्शन, विमा संरक्षण द्या

सांगली : राज्य शासनाने लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी मजूर महामंडळाचे कामकाज गतिमान करून मुकादमाकडून मजुरांची होणारी पिळवणूक थांबविण्याची गरज आहे. यासाठी महामंडळाने मजुरांची नोंदणी करुन मजुरांचा वाहन मालकांना पुरवठा करण्याची गरज आहे. तसेच ऊस तोडणी मजुरांना शासनाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंतो भांगे यांच्याकडे केली.सचिवांच्या भेटीनंतर राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकारांना माहिती दिली. शेट्टी म्हणाले की, राज्यामध्ये ऊसतोडणी मुकादमाकडून ऊस वाहतूकदार व ऊसतोडणी मजुरांची मोठी पिळवणूक केली जात आहे. गेल्या तीन ते चार हंगामात कारखान्यामार्फत ४४६ कोटी व थेट ऊस वाहतूकदार यांचेमार्फत जवळपास ६०० कोटी असे एकूण एक हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक ऊसतोडणी मुकादमांनी केली आहे.

याकरिता उपाययोजना म्हणून महामंडळाकडे ऊसतोडणी मजुरांची नोंदणी करून ऊस वाहतूकदार व कारखान्यांना मजूर पुरवठा करण्याचे धोरण राज्य सरकारने ठरविले आहे. शासनाकडून महामंडळाचे काम कासव गतीने सुरू असून याकरिता लागणारे अर्थसहाय्याची तरतूद कमी केली आहे. राज्यातील साखर कारखान्याकडून जवळपास ३८ कोटी रूपयांची कपात करून ही रक्कम महामंडळास वर्ग केली आहे.यावेळी स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेचे नेते पृथ्वीराज पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा, प्रवीण शेट्टी, विनोद पाटील यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

महामंडळाकडे केवळ ९५ हजार मजुरांची नोंदणीमहामंडळाकडे सध्या ९५ हजार मजुरांची नोंदणी झाली आहे. महामंडळाने मजुरांच्या नोंदणीचे काम ग्रामसेवकांना दिले आले आहे. यामुळे नोंदी होण्यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. याकरिता महामंडळाने साखर कारखान्याचा हंगाम चालू झाल्यानंतर त्या प्रत्येक कारखान्याच्या कार्यस्थळावर महामंडळाकडून नोंदणी अधिकारी यांची नेमणूक करून मजूर नोंदीचे प्रमाण वाढविण्याची मागणी केली आहे, असेही शेट्टी म्हणाले.

ऊसतोडणी मजुरांना पेन्शन, विमा संरक्षण द्याशासनाने महामंडळामार्फत मजुरांना विमा संरक्षण, आरोग्य विमा, ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना वसतिगृह, जे ऊसतोड मजूर प्रामाणिकपणे १० वर्षे मजुरी करतील त्यांना पेन्शन योजना, महिला ऊसतोड मजुरांना विशेष सहाय यासारखे विविध योजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, अशी मागणीही शेट्टी यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टी