शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

महापालिकेकडील ‘एनए’चा मार्ग मोकळा

By admin | Updated: September 11, 2014 00:07 IST

आयुक्तांची माहिती : जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनात प्राथमिक चर्चा पूर्ण

सांगली : विकास आराखड्यातील क्षेत्रात बिनशेतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता राहणार नाही, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने १६ जुलै रोजी घेतला होता. त्यानुसार आता ही प्रक्रिया महापालिकेच्या अखत्यारित पार पाडण्याबाबतचे अडथळे दूर झाले आहेत. शासनाचे यासंदर्भात स्पष्ट आदेश प्राप्त झाले असून, याबाबतची प्राथमिक चर्चा जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह व महापालिका आयुक्त अजिज कारचे यांच्यात झाली आहे. येत्या आठवड्याभरात याबाबतची कार्यवाही सुरू होईल, असे सांगण्यात आले. अकृषिक परवाने मिळवून देण्यासाठी दलालांची मोठी टोळी यामुळे अस्तित्वात आली. सामान्य नागरिकांना या कार्यालयांमार्फत चांगली वागणूक मिळत नसल्याने अकृषिक परवान्यांसाठी थेट या कार्यालयात जाऊन प्रयत्न करणाऱ्यांची संख्या घटली आहे. नगरपालिका, महापालिकेच्या विकास आराखड्यावर आता अकृषिक परवाने दिले जाणार असल्याने किमान या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शासनाने यासंदर्भात दिलेल्या आदेशानंतरही काही काळ याबाबतची कार्यवाही झाली नव्हती. आता सप्टेंबर महिन्यात नव्याने या प्रक्रियेला मुहूर्त मिळणार आहे. महापालिकेने त्याची तयारी सुरू केली आहे.जिल्हा प्रशासनाने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार २००९ ते २०१४ या कालावधित अकृषिकचे ६४ आदेश काढले आहेत. प्राप्त होणारे अर्ज आणि निकालात निघणाऱ्या अर्जांचे प्रमाणही कमी आहे. दाखल अर्जांपैकी केवळ १० टक्क्यांहून कमी अर्जांबाबत आदेश काढण्यात येत आहेत. शासनाने अकृषिक परवान्यांबाबत वारंवार वेगवेगळे आदेश काढल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. ही प्रक्रिया अधिक क्लिष्ट, वेळखाऊ व खर्चिक करून टाकण्यात आली. सांगली जिल्ह्यातील कोणत्याही भागातील अकृषिक परवाना काढायचा झाला, तर जमीनधारकास ससेहोलपट होते. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आता खंडित होणार आहे. (प्रतिनिधी)