शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आरवडे, आळतेत मोफत अंत्यविधी

By admin | Updated: December 11, 2015 01:05 IST

ग्रामपंचायतींचा पुढाकार : तासगाव तालुक्यातील सामाजिक बांधिलकीचा उपक्रम -- गुड न्यूज

दत्ता पाटील --तासगाव--माणसाच्या आयुष्याचा खरा प्रवास घरापासून ते स्मशानापर्यंत एवढाच. मात्र स्मशानातील प्रवासासाठी श्रीमंतापासून ते गरिबापर्यंत सर्वांनाच खर्च करावा लागतो. ऐनवेळी करावा लागणारा हा खर्च आणि होणारी गैरसोय टाळण्यासाठी तासगाव तालुक्यातील आरवडे आणि आळते ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला. गेल्या काही वर्षांपासून अंत्यविधीचे साहित्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारा या ग्रामपंचायतींचा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्शवत ठरणारा आहे.गावगाडा म्हटले की, त्यामध्ये अनेक जाती आणि धर्मांच्या लोकांचा समावेश होतो. त्यातच अलीकडे राजकारणाचे बदलत असलेले स्वरुप पाहता, गावा-गावात गटा-तटाच्या अभेद्य भिंती असतात. एक गट सत्तेत, तर दुसरा गट विरोधात असतो. गावपातळीवर अनेकदा राजकीय कुरघोड्याही होताना दिसून येतात. सत्तेत आल्यानंतर काही गावे विकासाचा वसा जोपासतात, तर काही गावात विकासाचे स्वप्नच राहते. केवळ विकास करून नव्हे, तर लोकांच्या वैयक्तिक सुख-दु:खात सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायती आणि तेथील कारभारी विरळच. मात्र लोकांच्या सुखाबरोबरच दु:खाचे सांगाती होण्यासाठी तासगाव तालुक्यातील आरवडे आणि आळते ग्रामपंचायतींनी एक समाजाभिमुख उपक्रम सुरु केला. दोन वर्षापूर्वी आरवडे ग्रामपंचायतीने, तर वर्षभरापूर्वी आळते ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक स्तरातील लोकांची गैरसोय आणि आर्थिक कुचंबणा टाळण्यासाठी, अंत्यविधीचे साहित्य मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत झाले. किंंबहुना या गावांनी कोणतेही मतभेद न ठेवता सर्व गावाने एकत्रितपणे निर्णय घेतला. कोणताही भेदभाव न करता सर्वांना अंत्यविधीच्या साहित्याची मोफत सोय करुन देत आदर्श पाऊलवाट निर्माण केली. या गावांची ही वाटचाल इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी धोरण निश्चित केले. इस्कॉन मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे. याठिकाणी पे अ‍ॅन्ड पार्किंगची सोय करून उत्पन्नवाढ केली. त्यातून गेल्या दोन वर्षांपासून सर्वांना मोफत अंत्यविधीचे साहित्य पुरवले जात आहे. अशाप्रकारचा उपक्रम राबवणारी आमची जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.-युवराज पाटील, माजी पं. स. सदस्य, आरवडेगावात एखाद्या गरीब कुटुंबावर दु:खद प्रसंग ओढावल्यानंतर अंत्यविधीचे साहित्य खरेदीसाठी पैसे नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले. यासाठी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच अंत्यविधीचे साहित्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आला. त्यासाठी लोकसहभागातून ग्रामपंचायतीच्या खात्यावर ठराविक रक्कम एकरकमी ठेवण्यात आली. या रकमेच्या व्याजावर हा खर्च भागवला जात आहे. - मनोज पाटील, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत आळते