शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

आरवडे, आळतेत मोफत अंत्यविधी

By admin | Updated: December 11, 2015 01:05 IST

ग्रामपंचायतींचा पुढाकार : तासगाव तालुक्यातील सामाजिक बांधिलकीचा उपक्रम -- गुड न्यूज

दत्ता पाटील --तासगाव--माणसाच्या आयुष्याचा खरा प्रवास घरापासून ते स्मशानापर्यंत एवढाच. मात्र स्मशानातील प्रवासासाठी श्रीमंतापासून ते गरिबापर्यंत सर्वांनाच खर्च करावा लागतो. ऐनवेळी करावा लागणारा हा खर्च आणि होणारी गैरसोय टाळण्यासाठी तासगाव तालुक्यातील आरवडे आणि आळते ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला. गेल्या काही वर्षांपासून अंत्यविधीचे साहित्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारा या ग्रामपंचायतींचा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्शवत ठरणारा आहे.गावगाडा म्हटले की, त्यामध्ये अनेक जाती आणि धर्मांच्या लोकांचा समावेश होतो. त्यातच अलीकडे राजकारणाचे बदलत असलेले स्वरुप पाहता, गावा-गावात गटा-तटाच्या अभेद्य भिंती असतात. एक गट सत्तेत, तर दुसरा गट विरोधात असतो. गावपातळीवर अनेकदा राजकीय कुरघोड्याही होताना दिसून येतात. सत्तेत आल्यानंतर काही गावे विकासाचा वसा जोपासतात, तर काही गावात विकासाचे स्वप्नच राहते. केवळ विकास करून नव्हे, तर लोकांच्या वैयक्तिक सुख-दु:खात सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायती आणि तेथील कारभारी विरळच. मात्र लोकांच्या सुखाबरोबरच दु:खाचे सांगाती होण्यासाठी तासगाव तालुक्यातील आरवडे आणि आळते ग्रामपंचायतींनी एक समाजाभिमुख उपक्रम सुरु केला. दोन वर्षापूर्वी आरवडे ग्रामपंचायतीने, तर वर्षभरापूर्वी आळते ग्रामपंचायतीने गावातील प्रत्येक स्तरातील लोकांची गैरसोय आणि आर्थिक कुचंबणा टाळण्यासाठी, अंत्यविधीचे साहित्य मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत झाले. किंंबहुना या गावांनी कोणतेही मतभेद न ठेवता सर्व गावाने एकत्रितपणे निर्णय घेतला. कोणताही भेदभाव न करता सर्वांना अंत्यविधीच्या साहित्याची मोफत सोय करुन देत आदर्श पाऊलवाट निर्माण केली. या गावांची ही वाटचाल इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी धोरण निश्चित केले. इस्कॉन मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे. याठिकाणी पे अ‍ॅन्ड पार्किंगची सोय करून उत्पन्नवाढ केली. त्यातून गेल्या दोन वर्षांपासून सर्वांना मोफत अंत्यविधीचे साहित्य पुरवले जात आहे. अशाप्रकारचा उपक्रम राबवणारी आमची जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.-युवराज पाटील, माजी पं. स. सदस्य, आरवडेगावात एखाद्या गरीब कुटुंबावर दु:खद प्रसंग ओढावल्यानंतर अंत्यविधीचे साहित्य खरेदीसाठी पैसे नसल्याचे अनेकदा निदर्शनास आले. यासाठी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच अंत्यविधीचे साहित्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आला. त्यासाठी लोकसहभागातून ग्रामपंचायतीच्या खात्यावर ठराविक रक्कम एकरकमी ठेवण्यात आली. या रकमेच्या व्याजावर हा खर्च भागवला जात आहे. - मनोज पाटील, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत आळते