शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
13
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
14
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
15
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
16
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
17
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
18
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
19
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
20
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सांगली जिल्ह्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके

By अशोक डोंबाळे | Updated: June 7, 2023 16:43 IST

गावातून दिंडी काढून मुलांचे पुष्पगुच्छ देऊन होणार स्वागत

सांगली : जिल्ह्यात १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून, शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरू आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून, शाळांचा परिसर सजविण्यासोबत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी, दोन लाख ४१ हजार २५८ विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात येणार आहे.

पहिली ते आठवीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. सरकारच्या बालभारती विभागाकडे शिक्षण विभागाकडे पुस्तकांची मागणी केली आहे.

ही पुस्तके तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत केंद्रप्रमुख व केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांकडे सुपुर्द करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन लाख ४१ हजार २५८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहेत. मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या दहा लाख २५ हजार ४४६ पुस्तकांच्या प्रती मागविल्या आहेत. त्यापैकी दहा लाख पाच हजार ७७७ प्रति मिळाल्या असून ९८ टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. आटपाडी ८३, जत, ९९ आणि शिराळा ९३ टक्के पुस्तके पुरवठा झाला असून उर्वरित तालुक्यात १०० टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या

तालुका     विद्यार्थीआटपाडी १५७३८जत ४८९९४कडेगाव १३९७६खानापूर १७०४१क.महांकाळ १७२४३मिरज ३३५०१पलूस     १४३९५शिराळा १५९१५तासगाव २५२०१वाळवा ४००७६एकूण २४१२५८एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही

जिल्ह्यात एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही या दृष्टीने शिक्षण विभागामार्फत पावले उचलण्यात येत आहेत. १५ जूनला शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी ६ ते १४ वयोगटातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी प्रवेशपात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत, असेही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.शाळांचा कायापालट

जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूप पूर्णपणे बदलून गेले आहे. डिजिटल क्लासरूम्स, कृतियुक्त अध्ययन, विविध खेळ, सहशालेय व अभ्यासपूरक ज्ञानरचनावादी उपक्रम राबविले जात आहेत. तसेच मूल्यशिक्षणावर विशेष भर प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जात आहे, असेही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

प्रभात फेरीत युवक, गावकरी, ज्येष्ठांनी सहभागी व्हावे

युवक, गावकरी, ज्येष्ठ नागरिकाना प्रभातफेरीमध्ये सहभागी होण्याची विनंती शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भेटीचे नियोजन शिक्षण विभाग करत आहे.