शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सांगली जिल्ह्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके

By अशोक डोंबाळे | Updated: June 7, 2023 16:43 IST

गावातून दिंडी काढून मुलांचे पुष्पगुच्छ देऊन होणार स्वागत

सांगली : जिल्ह्यात १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून, शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरू आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून, शाळांचा परिसर सजविण्यासोबत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी, दोन लाख ४१ हजार २५८ विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात येणार आहे.

पहिली ते आठवीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. सरकारच्या बालभारती विभागाकडे शिक्षण विभागाकडे पुस्तकांची मागणी केली आहे.

ही पुस्तके तालुक्याच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत केंद्रप्रमुख व केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांकडे सुपुर्द करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन लाख ४१ हजार २५८ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहेत. मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या दहा लाख २५ हजार ४४६ पुस्तकांच्या प्रती मागविल्या आहेत. त्यापैकी दहा लाख पाच हजार ७७७ प्रति मिळाल्या असून ९८ टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. आटपाडी ८३, जत, ९९ आणि शिराळा ९३ टक्के पुस्तके पुरवठा झाला असून उर्वरित तालुक्यात १०० टक्के पुस्तकांचा पुरवठा झाला आहे.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या

तालुका     विद्यार्थीआटपाडी १५७३८जत ४८९९४कडेगाव १३९७६खानापूर १७०४१क.महांकाळ १७२४३मिरज ३३५०१पलूस     १४३९५शिराळा १५९१५तासगाव २५२०१वाळवा ४००७६एकूण २४१२५८एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही

जिल्ह्यात एकही शाळाबाह्य विद्यार्थी राहणार नाही या दृष्टीने शिक्षण विभागामार्फत पावले उचलण्यात येत आहेत. १५ जूनला शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी ६ ते १४ वयोगटातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नये, यासाठी प्रवेशपात्र बालकांच्या याद्या ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत, असेही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.शाळांचा कायापालट

जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूप पूर्णपणे बदलून गेले आहे. डिजिटल क्लासरूम्स, कृतियुक्त अध्ययन, विविध खेळ, सहशालेय व अभ्यासपूरक ज्ञानरचनावादी उपक्रम राबविले जात आहेत. तसेच मूल्यशिक्षणावर विशेष भर प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जात आहे, असेही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

प्रभात फेरीत युवक, गावकरी, ज्येष्ठांनी सहभागी व्हावे

युवक, गावकरी, ज्येष्ठ नागरिकाना प्रभातफेरीमध्ये सहभागी होण्याची विनंती शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भेटीचे नियोजन शिक्षण विभाग करत आहे.