शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

टेंभू पाणी योजनेच्या प्रतीक्षेत चौदा गावे

By admin | Updated: September 18, 2015 23:10 IST

कवठेमहांकाळची स्थिती : कामे अपूर्ण; केवळ घोषणाबाजी

लखन घोरपडे- देशिंग  कवठेमहांकाळ तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यापासून वंचित राहिलेल्या भागाला पाणी देण्यासाठी टेंभू योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मागे ही योजना पुरेशा निधीअभावी रखडली असून, या योजनेच्या लाभक्षेत्रातीन चौदा गावे अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्याचा कायमस्वरूपी दुष्काळ हटावा, यासाठी आर. आर. पाटील, अजितराव घोरपडे यांच्यासह नेत्यांनी ‘म्हैसाळ’पासून वंचित राहिलेल्या भागाला पाणी देण्यासाठी टेंभू योजनेचा प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत ७८७२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून ही योजना सुरू झाल्यास संपूर्ण कवठेमहांकाळ तालुका ‘म्हैसाळ’ व ‘टेंभू’च्या पाण्याने ओलिताखाली येणार आहेत.टेंभू योजनेअंतर्गत कुंडलापूर, तिसंगी, नागाव, चोरोची रायवाडी, गर्जेवाडी, तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आठ गावांचा समावेश असून ही योजना वरदान ठरणारी आहे.योजनेच्या प्रारंभापासून ते आजअखेरपर्यंत नेतेमंडळीं कडून केवळ घोषणाबाजी केली जात असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तासगावमधील कार्यक्रमासाठी आले असता, टेंभू योजनेच्या पाहणी दौऱ्यानिमित्तच्या सभेत त्यांनी ५० कोटी जाहीर केले. मात्र अद्याप यावर कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. या योजनेस २००१ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र २२ जानेवारी २००४ रोजी सुधारित प्रकल्प अहवालास २१०६.०९ कोटी रुपयांना शासनाने मान्यता दिली. यामध्ये तिसंगी घाटनांद्रे, कुंडलापूर उपसा सिंचन योजनेचाही समावेश करण्यात आला आहे. एकंदरीतच तालुक्यातील ‘म्हैसाळ’च्या पाण्याच्या ओलिताखाली येणारा भाग त्याचा लाभ घेत आहे, तर या पाण्यापासून वंचित राहिलेला परिसर योजना मंजूर असूनदेखील अर्धवट कामे, अपुरा निधी, तसेच प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे या भागाला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. एकूणच या भागाला ‘टेंभू’चे पाणी मिळणार तरी केव्हा? असा सवाल आता येथील शेतकरी करू लागले आहेत. ही योजना त्वरित पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. ‘टेंभू’च्या लाभक्षेत्रातील गावे प्रतीक्षेततिसंगी, कुंडलापूर, नागज, ढालगाव, चोरीची, रायवाडी, घाटनांद्रे, गर्जेवाडी, वाघोली, दुधेभावी, ढोलेवाडी, जांभुळवाडी, चुडेखिंडी, कदमवाडी ही गावे लाभक्षेत्रात आहेत. याबाबत प्रगतशील शेतकरी सखाराम घोदे म्हणाले, ढालगावसह परिसराला पाणी देण्यासाठी युती शासनाच्या काळात टेंभू योजना सुरू झाली. त्यानंतर आर. आर. पाटील यांनीही पूर्ततेसाठी प्रयत्न केले. परंतु सध्या या योजनेचे काम थांबले आहे. शिवाय या भागातील दुष्काळ हटवायचा असेल, तर योजना पूर्ण होणे गरजेचे आहे.