शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

टेंभू पाणी योजनेच्या प्रतीक्षेत चौदा गावे

By admin | Updated: September 18, 2015 23:10 IST

कवठेमहांकाळची स्थिती : कामे अपूर्ण; केवळ घोषणाबाजी

लखन घोरपडे- देशिंग  कवठेमहांकाळ तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यापासून वंचित राहिलेल्या भागाला पाणी देण्यासाठी टेंभू योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मागे ही योजना पुरेशा निधीअभावी रखडली असून, या योजनेच्या लाभक्षेत्रातीन चौदा गावे अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्याचा कायमस्वरूपी दुष्काळ हटावा, यासाठी आर. आर. पाटील, अजितराव घोरपडे यांच्यासह नेत्यांनी ‘म्हैसाळ’पासून वंचित राहिलेल्या भागाला पाणी देण्यासाठी टेंभू योजनेचा प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत ७८७२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून ही योजना सुरू झाल्यास संपूर्ण कवठेमहांकाळ तालुका ‘म्हैसाळ’ व ‘टेंभू’च्या पाण्याने ओलिताखाली येणार आहेत.टेंभू योजनेअंतर्गत कुंडलापूर, तिसंगी, नागाव, चोरोची रायवाडी, गर्जेवाडी, तसेच नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आठ गावांचा समावेश असून ही योजना वरदान ठरणारी आहे.योजनेच्या प्रारंभापासून ते आजअखेरपर्यंत नेतेमंडळीं कडून केवळ घोषणाबाजी केली जात असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तासगावमधील कार्यक्रमासाठी आले असता, टेंभू योजनेच्या पाहणी दौऱ्यानिमित्तच्या सभेत त्यांनी ५० कोटी जाहीर केले. मात्र अद्याप यावर कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. या योजनेस २००१ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र २२ जानेवारी २००४ रोजी सुधारित प्रकल्प अहवालास २१०६.०९ कोटी रुपयांना शासनाने मान्यता दिली. यामध्ये तिसंगी घाटनांद्रे, कुंडलापूर उपसा सिंचन योजनेचाही समावेश करण्यात आला आहे. एकंदरीतच तालुक्यातील ‘म्हैसाळ’च्या पाण्याच्या ओलिताखाली येणारा भाग त्याचा लाभ घेत आहे, तर या पाण्यापासून वंचित राहिलेला परिसर योजना मंजूर असूनदेखील अर्धवट कामे, अपुरा निधी, तसेच प्रशासनाचा हलगर्जीपणा यामुळे या भागाला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. एकूणच या भागाला ‘टेंभू’चे पाणी मिळणार तरी केव्हा? असा सवाल आता येथील शेतकरी करू लागले आहेत. ही योजना त्वरित पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. ‘टेंभू’च्या लाभक्षेत्रातील गावे प्रतीक्षेततिसंगी, कुंडलापूर, नागज, ढालगाव, चोरीची, रायवाडी, घाटनांद्रे, गर्जेवाडी, वाघोली, दुधेभावी, ढोलेवाडी, जांभुळवाडी, चुडेखिंडी, कदमवाडी ही गावे लाभक्षेत्रात आहेत. याबाबत प्रगतशील शेतकरी सखाराम घोदे म्हणाले, ढालगावसह परिसराला पाणी देण्यासाठी युती शासनाच्या काळात टेंभू योजना सुरू झाली. त्यानंतर आर. आर. पाटील यांनीही पूर्ततेसाठी प्रयत्न केले. परंतु सध्या या योजनेचे काम थांबले आहे. शिवाय या भागातील दुष्काळ हटवायचा असेल, तर योजना पूर्ण होणे गरजेचे आहे.