शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

चार पाणी योजना पडल्या बंद

By admin | Updated: November 17, 2014 23:23 IST

नागरिकांचे हाल : साडेअकरा कोटींचे वीज बिल थकित

शिरढोण/विसापूर : कवठेमहांकाळ, विसापूर व मणेराजुरी, येळावी या पिण्याच्या पाण्याच्या प्रादेशिक योजनांचे ११ कोटी ५५ लाखांचे वीज बिल थकल्याने वीज पुरवठा बंद करण्यात आला असून, या योजनेतील गावांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.या वीज बिलामुळे शुक्रवार दि. १४ पासून गेले पाच दिवस सध्या पाणी पुरवठा बंद आहे. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण, मळणगाव, जायगव्हाण, लांडगेवाडी, कवठेमहांकाळ, जाधववाडी, शेळकेवाडी, विठुरायाचीवाडी, देशिंग, झुरेवाडी, जाखापूर, आगळगाव या प्रादेशिकमधील गावांचा समावेश असून, विसापूरमधील विसापूर, गोटेवाडी, तुरची, ढवळी तसेच अशी १५ गावे कवठेमहांकाळ विसापूर या योजनेमधील आहेत. मणेराजुरी - येळावीमधील मणेराजुरी, उपळावी, कुमठे, काकडवाडी, करोली (एम), सोनी, सावर्डे, नागाव, मतकुणकी, कौलगे, वाघापूर, खुसगाव, बस्तवडे, भैरववाडी, पुणदी, योगेवाडी, धुळगाव आदींसह २२ गावे या योजनेत समाविष्ट आहेत. तसेच येळावीमधील येळावीसह नेहरूनगर निमणी, नागाव, बेंद्री, हजारवाडी, जुळेवाडी व भिलवडी स्टेशन अशी प्रादेशिक योजनेमधील गावांची नावे आहेत.या पाणी पुरवठ्यावर महिन्याला २५ ते २७ लाख रुपये वीज बिल, तसेच या योजनेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार, लिकेज आदीवर खर्च होत आहे. तसेच या योजनेचे वार्षिक सुमारे एक कोटीचे डिमांड आहे. सध्या प्रादेशिक योजनेची ११ कोटी ५५ लाख वीज बिल थकबाकी आहे. या थकबाकीपैकी २७ लाख १० हजारांचा धनादेश तासगाव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने काढला आहे. परंतु वीज वितरण कंपनीने थकबाकी भरण्याचा तगादा लावला आहे. त्यामुळे सध्या या गावांतील ग्रामपंचायतीकडे या प्रादेशिक योजनेची बरीच रक्कम थकबाकीच्या स्वरुपात आहे. ती अद्याप वसूल नाही. त्यामुळे या योजनेला पैसे भरणे कठीण होत आहे.वीज कनेक्शन बंद केल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला असून, हे वीज कनेक्शन सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. या योजनेची थकबाकी वसूल झाले तरच ही योजना सुरू होईल, अन्यथा योजना बंद राहून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. (वार्ताहर)विहिरी, कूपनलिकांचा आश्रयसात दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. यामुळे विसापूर परिसरातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी सात दिवसांपासून भटकंती सुरू आहे. प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. ग्रामस्थांची पाण्यासाठी धावपळ सुरू आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका, आड तसेच खासगी विहिरींच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. आड व विहिरी यांना बरेच दिवस उपसा नसल्याने तसेच कूपनलिकांचेही पाणी दूषित असल्यामुळे अस्वच्छता व दूषित पाणी यामुळे विविध साथींचे रुग्ण वाढत आहेत. आड, विहिरी व कूपनलिकांचे दूषित पाणी नाईलाजाने प्यावे लागत असल्याने लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला विचारले असता, त्यांनी संपूर्ण रक्कम भरली असल्याचे सांगण्यात आले. परंतु कवठेमहांकाळ, मणेराजुरी, येळावी या योजनांची थकबाकी असल्याने महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला. विसापूर परिसराची थकबाकी नसून देखील प्रादेशिक योजनेच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी, पंचायत समितीने तोडगा काढून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.