शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील चोवीस तास पाणी गेले कुठे?

By admin | Updated: September 24, 2015 00:09 IST

योजनेचा फियास्को : हवेवर फिरतात मीटर; महापालिकाच करते देखभाल-दुरुस्तीचे काम

 सांगली : सुमारे साडेआठ कोटी रुपये खर्चून विश्रामबाग परिसरातील साडेचार हजार नागरिकांना चोवीस तास पाणी देण्याचे महापालिकेचे स्वप्न भंगले आहे. चोवीस तास नव्हे, तर आता तास, दोन तासच पाणी नागरिकांना मिळत असून पाण्याचे बिल मात्र वारेमाप येत आहे. त्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी बिल भरण्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यात ठेकेदारानेही देखभाल-दुरुस्तीचे काम थांबविल्याने महापालिकेलाच गळती व इतर कामे करावी लागत आहेत. महापालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास महाआघाडीच्या सत्ताकाळात मोठा गाजावाजा करीत विश्रामबाग परिसरातील चार प्रभागात चोवीस तास पाणी देण्याची योजना आखण्यात आली. राज्य शासनाच्या सुजल निर्मल योजनेतील सुमारे साडेआठ कोटीचा निधी या प्रकल्पावर खर्च करण्यात आला. अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेचे पुनर्वसन, बल्क मीटर बसविणे यासह दैनंदिन देखभाल व दुरुस्तीचा ठेका एका कंपनीला देण्यात आला. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास संपूर्ण शहरात पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्याचा ठरावही महाआघाडीच्या काळात झाला होता. पण आता पाच वर्षानंतर या योजनेचा फियास्को झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विश्रामबाग परिसरातील साडेचार हजार ग्राहकांना चोवीस तासांपैकी सकाळी तास ते दोन तास पाणी मिळते. ठेकेदाराचे बिलही महापालिकेकडे अडकले आहे. त्यामुळे त्याने देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी झटकली असून आता महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडूनच देखभाल-दुरुस्ती केली जात आहे. पाण्याची गळती काढण्याच्या कामात ठेकेदाराने कुचराई केल्याचे प्रशासनाने सांगितले. त्याला वार्षिक फी दिली जात होती. त्यातही पालिकेने कपात केल्याचे सांगितले. या योजनेतून चोवीस तास पाणी मिळत नसल्याने नागरिकांनीही बिले भरण्यास नकार दिला आहे. त्यात पाण्याचे मीटर हवेवर फिरत असल्याने नागरिकांना अवाच्या सवा बिले मिळत होती. त्याबद्दल संतापही व्यक्त झाला होता. तरीही महापालिका प्रशासनाने हवेवर मीटर फिरते, ही बाब कधी गांभीर्याने घेतलीच नाही. अखेर नगरसेवक प्रदीप पाटील यांनी तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता सुनील पाटील यांच्यासह विश्रामबागमधील मीटर्सची समक्ष पाहणी केली, तेव्हा हवेवर मीटर फिरत असल्याचे अधिकाऱ्यांनी पाहिले होते. ही योजना यशस्वी होण्यासाठी पाण्याची टाकी सातत्याने भरलेली हवी; पण या योजनेवरील दोन्ही टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. दोन्ही टाक्यांना एक्स्प्रेस फिडरची आवश्यकता आहे. त्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नदीतून उचललेले पाणी, त्यानंतर जलशुद्धीकरण करून दिलेले पाणी यात मोठी तफावत आहे. जलशुद्धीकरणाचे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय नागरिकांना जादा पाणी देणे शक्य होणार आहे. अशा तांत्रिक अडचणीत ही योजना अडकली आहे. चोवीस तास पाण्याचा पुरता बोजवारा उडाला असून, किमान चार तास तरी पाणी मिळावे, अशी अपेक्षा विश्रामबागकर करीत आहेत. (प्रतिनिधी)प्रशासनाचे दुर्लक्षपाणी योजनेतून नागरिकांना चोवीस तास पाणी मिळत नाही. सकाळी तासभर पाणी येते. सायंकाळी पाणी मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. याबाबत प्रदीप पाटील यांनी ठेकेदार, अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती; पण त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. उलट पाटील यांच्या अनुपस्थितीत आयुक्तांनी बैठक घेतली. पुन्हा बैठकीचे नियोजन अद्यापपर्यंत झालेले नाही. ठेका रद्दची मागणीविश्रामबाग परिसरातील नगरसेवक प्रदीप पाटील यांनी पाणी योजनेचा ठेका रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. त्यात हवेवर मीटर फिरत असल्याने नागरिकांना नाहक भुर्दंड बसतो. ही बिलेही वेळेवर दुरुस्त करून दिली जात नाहीत. मीटर बदलण्याची मागणी करून वर्ष झाले, तरी प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही प्रदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.