शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

सांगलीतील चोवीस तास पाणी गेले कुठे?

By admin | Updated: September 24, 2015 00:09 IST

योजनेचा फियास्को : हवेवर फिरतात मीटर; महापालिकाच करते देखभाल-दुरुस्तीचे काम

 सांगली : सुमारे साडेआठ कोटी रुपये खर्चून विश्रामबाग परिसरातील साडेचार हजार नागरिकांना चोवीस तास पाणी देण्याचे महापालिकेचे स्वप्न भंगले आहे. चोवीस तास नव्हे, तर आता तास, दोन तासच पाणी नागरिकांना मिळत असून पाण्याचे बिल मात्र वारेमाप येत आहे. त्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी बिल भरण्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यात ठेकेदारानेही देखभाल-दुरुस्तीचे काम थांबविल्याने महापालिकेलाच गळती व इतर कामे करावी लागत आहेत. महापालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास महाआघाडीच्या सत्ताकाळात मोठा गाजावाजा करीत विश्रामबाग परिसरातील चार प्रभागात चोवीस तास पाणी देण्याची योजना आखण्यात आली. राज्य शासनाच्या सुजल निर्मल योजनेतील सुमारे साडेआठ कोटीचा निधी या प्रकल्पावर खर्च करण्यात आला. अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेचे पुनर्वसन, बल्क मीटर बसविणे यासह दैनंदिन देखभाल व दुरुस्तीचा ठेका एका कंपनीला देण्यात आला. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास संपूर्ण शहरात पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्याचा ठरावही महाआघाडीच्या काळात झाला होता. पण आता पाच वर्षानंतर या योजनेचा फियास्को झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विश्रामबाग परिसरातील साडेचार हजार ग्राहकांना चोवीस तासांपैकी सकाळी तास ते दोन तास पाणी मिळते. ठेकेदाराचे बिलही महापालिकेकडे अडकले आहे. त्यामुळे त्याने देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी झटकली असून आता महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडूनच देखभाल-दुरुस्ती केली जात आहे. पाण्याची गळती काढण्याच्या कामात ठेकेदाराने कुचराई केल्याचे प्रशासनाने सांगितले. त्याला वार्षिक फी दिली जात होती. त्यातही पालिकेने कपात केल्याचे सांगितले. या योजनेतून चोवीस तास पाणी मिळत नसल्याने नागरिकांनीही बिले भरण्यास नकार दिला आहे. त्यात पाण्याचे मीटर हवेवर फिरत असल्याने नागरिकांना अवाच्या सवा बिले मिळत होती. त्याबद्दल संतापही व्यक्त झाला होता. तरीही महापालिका प्रशासनाने हवेवर मीटर फिरते, ही बाब कधी गांभीर्याने घेतलीच नाही. अखेर नगरसेवक प्रदीप पाटील यांनी तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता सुनील पाटील यांच्यासह विश्रामबागमधील मीटर्सची समक्ष पाहणी केली, तेव्हा हवेवर मीटर फिरत असल्याचे अधिकाऱ्यांनी पाहिले होते. ही योजना यशस्वी होण्यासाठी पाण्याची टाकी सातत्याने भरलेली हवी; पण या योजनेवरील दोन्ही टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. दोन्ही टाक्यांना एक्स्प्रेस फिडरची आवश्यकता आहे. त्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नदीतून उचललेले पाणी, त्यानंतर जलशुद्धीकरण करून दिलेले पाणी यात मोठी तफावत आहे. जलशुद्धीकरणाचे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय नागरिकांना जादा पाणी देणे शक्य होणार आहे. अशा तांत्रिक अडचणीत ही योजना अडकली आहे. चोवीस तास पाण्याचा पुरता बोजवारा उडाला असून, किमान चार तास तरी पाणी मिळावे, अशी अपेक्षा विश्रामबागकर करीत आहेत. (प्रतिनिधी)प्रशासनाचे दुर्लक्षपाणी योजनेतून नागरिकांना चोवीस तास पाणी मिळत नाही. सकाळी तासभर पाणी येते. सायंकाळी पाणी मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. याबाबत प्रदीप पाटील यांनी ठेकेदार, अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती; पण त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. उलट पाटील यांच्या अनुपस्थितीत आयुक्तांनी बैठक घेतली. पुन्हा बैठकीचे नियोजन अद्यापपर्यंत झालेले नाही. ठेका रद्दची मागणीविश्रामबाग परिसरातील नगरसेवक प्रदीप पाटील यांनी पाणी योजनेचा ठेका रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. त्यात हवेवर मीटर फिरत असल्याने नागरिकांना नाहक भुर्दंड बसतो. ही बिलेही वेळेवर दुरुस्त करून दिली जात नाहीत. मीटर बदलण्याची मागणी करून वर्ष झाले, तरी प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही प्रदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.