शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

सांगलीतील चोवीस तास पाणी गेले कुठे?

By admin | Updated: September 24, 2015 00:09 IST

योजनेचा फियास्को : हवेवर फिरतात मीटर; महापालिकाच करते देखभाल-दुरुस्तीचे काम

 सांगली : सुमारे साडेआठ कोटी रुपये खर्चून विश्रामबाग परिसरातील साडेचार हजार नागरिकांना चोवीस तास पाणी देण्याचे महापालिकेचे स्वप्न भंगले आहे. चोवीस तास नव्हे, तर आता तास, दोन तासच पाणी नागरिकांना मिळत असून पाण्याचे बिल मात्र वारेमाप येत आहे. त्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी बिल भरण्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यात ठेकेदारानेही देखभाल-दुरुस्तीचे काम थांबविल्याने महापालिकेलाच गळती व इतर कामे करावी लागत आहेत. महापालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास महाआघाडीच्या सत्ताकाळात मोठा गाजावाजा करीत विश्रामबाग परिसरातील चार प्रभागात चोवीस तास पाणी देण्याची योजना आखण्यात आली. राज्य शासनाच्या सुजल निर्मल योजनेतील सुमारे साडेआठ कोटीचा निधी या प्रकल्पावर खर्च करण्यात आला. अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेचे पुनर्वसन, बल्क मीटर बसविणे यासह दैनंदिन देखभाल व दुरुस्तीचा ठेका एका कंपनीला देण्यात आला. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास संपूर्ण शहरात पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्याचा ठरावही महाआघाडीच्या काळात झाला होता. पण आता पाच वर्षानंतर या योजनेचा फियास्को झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विश्रामबाग परिसरातील साडेचार हजार ग्राहकांना चोवीस तासांपैकी सकाळी तास ते दोन तास पाणी मिळते. ठेकेदाराचे बिलही महापालिकेकडे अडकले आहे. त्यामुळे त्याने देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी झटकली असून आता महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडूनच देखभाल-दुरुस्ती केली जात आहे. पाण्याची गळती काढण्याच्या कामात ठेकेदाराने कुचराई केल्याचे प्रशासनाने सांगितले. त्याला वार्षिक फी दिली जात होती. त्यातही पालिकेने कपात केल्याचे सांगितले. या योजनेतून चोवीस तास पाणी मिळत नसल्याने नागरिकांनीही बिले भरण्यास नकार दिला आहे. त्यात पाण्याचे मीटर हवेवर फिरत असल्याने नागरिकांना अवाच्या सवा बिले मिळत होती. त्याबद्दल संतापही व्यक्त झाला होता. तरीही महापालिका प्रशासनाने हवेवर मीटर फिरते, ही बाब कधी गांभीर्याने घेतलीच नाही. अखेर नगरसेवक प्रदीप पाटील यांनी तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता सुनील पाटील यांच्यासह विश्रामबागमधील मीटर्सची समक्ष पाहणी केली, तेव्हा हवेवर मीटर फिरत असल्याचे अधिकाऱ्यांनी पाहिले होते. ही योजना यशस्वी होण्यासाठी पाण्याची टाकी सातत्याने भरलेली हवी; पण या योजनेवरील दोन्ही टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. दोन्ही टाक्यांना एक्स्प्रेस फिडरची आवश्यकता आहे. त्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नदीतून उचललेले पाणी, त्यानंतर जलशुद्धीकरण करून दिलेले पाणी यात मोठी तफावत आहे. जलशुद्धीकरणाचे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय नागरिकांना जादा पाणी देणे शक्य होणार आहे. अशा तांत्रिक अडचणीत ही योजना अडकली आहे. चोवीस तास पाण्याचा पुरता बोजवारा उडाला असून, किमान चार तास तरी पाणी मिळावे, अशी अपेक्षा विश्रामबागकर करीत आहेत. (प्रतिनिधी)प्रशासनाचे दुर्लक्षपाणी योजनेतून नागरिकांना चोवीस तास पाणी मिळत नाही. सकाळी तासभर पाणी येते. सायंकाळी पाणी मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. याबाबत प्रदीप पाटील यांनी ठेकेदार, अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती; पण त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. उलट पाटील यांच्या अनुपस्थितीत आयुक्तांनी बैठक घेतली. पुन्हा बैठकीचे नियोजन अद्यापपर्यंत झालेले नाही. ठेका रद्दची मागणीविश्रामबाग परिसरातील नगरसेवक प्रदीप पाटील यांनी पाणी योजनेचा ठेका रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. त्यात हवेवर मीटर फिरत असल्याने नागरिकांना नाहक भुर्दंड बसतो. ही बिलेही वेळेवर दुरुस्त करून दिली जात नाहीत. मीटर बदलण्याची मागणी करून वर्ष झाले, तरी प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही प्रदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.