शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
3
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
4
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
5
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
6
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
7
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
8
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
9
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
10
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
11
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
12
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
13
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
14
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
15
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
16
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
17
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
18
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
19
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
20
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?

इस्लामपुरात मंगळवारपासून चार दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:21 IST

इस्लामपूर : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याचा प्रादुर्भाव शहरावर होत आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उद्या, ...

इस्लामपूर : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याचा प्रादुर्भाव शहरावर होत आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उद्या, मंगळवारपासून सलग चार दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी जाहीर केला.

सोमवारी तहसीलदारांसमवेत होणाऱ्या बैठकीत त्याचे स्वरूप ठरणार आहे. तसेच कोरोना मृतांवरील अंत्यसंस्काराच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय झाला.

येथील नगरपालिकेची ऑनलाईन सभा नगराध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या उपस्थितीत झाली. शहरातील कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी जनता कर्फ्यू लावण्याचा आग्रह बहुतांश सदस्यांनी धरला. त्यावर पाटील यांनी चार दिवस कर्फ्यू लावण्याचा निर्णय दिला. या चार दिवसांत औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. कोरोनाबाधित रुग्ण बाहेर फिरत असल्याची तक्रार विक्रम पाटील यांनी केली. त्यावर माळी यांनी, प्रशासन याबाबत दक्ष असून, अशी घटना आढळून आल्यास माहिती द्या, त्यांच्याविरुद्ध कारवाई करू, असे स्पष्ट केले. विश्वनाथ डांगे यांनी, जनता कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी महसूल विभागाची साथ आवश्यक आहे, याकडे लक्ष वेधले. कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी होणाऱ्या खर्चात कपात करण्याची मागणी संजय कोरे, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, विश्वनाथ डांगे यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार पूर्वी शहरातील मृतांसाठी २१०० रुपये, तर बाहेरील मृतांसाठी नऊ हजार रुपये घेतले जात होते. ते आता शहरासाठी एक हजार आणि बाहेरील मृतांसाठी तीन हजार रुपये अंत्यसंस्कारासाठी घेण्याचा निर्णय झाला. डॉ. संग्राम पाटील यांनी, सॅनिटायझेशन योग्य पद्धतीने होत आहे. तसेच बाधित नागरिकांनी घरावर लावलेली स्टिकर काढू नयेत अशी सूचना केली. शहरात सध्या सुरू असलेल्या भुयारी गटारीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्ते करता येत नाही असा शासन निर्णय असल्याने या कामात अडचणी येत असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. त्यावर माळी यांनी, अशी कामे करण्याची परवानगी मागण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवू असे सांगितले.

या सभेतील चर्चेत शहाजी पाटील, अमित ओसवाल, शकील सय्यद, वैभव पवार, प्रदीप लोहार, मनीषा पाटील, सुनीता सपकाळ, मंगल शिंगण, जयश्री माळी, कोमल बनसोडे यांनी भाग घेतला.

'लोकमत'ची मागणी वास्तववादी..!

शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. रस्त्यावर भरणाऱ्या भाजी बाजारात होणारी मोठी गर्दी प्रादुर्भाव वाढवत आहे. त्यामुळे किमान सात दिवसांचा लॉकडाऊन करावा याकडे ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. साेमवारी पालिकेच्या सभेत जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘लोकमत’ची मागणी ही जनतेच्या हितासाठी वास्तववादी होती, यावर शिक्कामोर्तब झाले.