शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:19 IST

वारणावती : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक १३,६८३ क्युसेक असल्याने धरणाचे चारही वक्राकार दरवाजे रविवारी सकाळी १० वाजता ०.५० मीटरने खुले करण्यात आले असून त्यातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू केला होता. सायंकाळी चार वाजता एक मीटरने दरवाजे उचलण्यात आले. त्यावेळी ...

वारणावती : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक १३,६८३ क्युसेक असल्याने धरणाचे चारही वक्राकार दरवाजे रविवारी सकाळी १० वाजता ०.५० मीटरने खुले करण्यात आले असून त्यातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू केला होता. सायंकाळी चार वाजता एक मीटरने दरवाजे उचलण्यात आले. त्यावेळी ४२०० क्युसेक व वीज निर्मितीकडून ५९२ व उच्चस्तर द्वारातून ८०० क्युसेक असा एकूण ३४९२ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत.सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे राज्यातील मातीचे सर्वात मोठे धरण आहे. चांदोली धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाण्याने शनिवारी सांडवा पातळी ओलांडली होती. त्यामुळे रविवारी सकाळी दहा वाजता धरणाचे चारही दरवाजे ०.५० मीटर उचलून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला. वीजनिर्मिती केंद्रातून ५९२ व उच्चस्तर द्वारातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दीड महिना अगोदरच धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षी आजच्या तारखेला ८१० मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा त्याचे प्रमाण १३२४ मिलिमीटर इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५१४ मिलिमीटर पाऊस अधिक बरसला आहे. १७.९५ टीएमसी पाणीसाठा होता, तर यंदा २७.७७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी ८०.७१ आहे.सतर्कतेचा इशारावारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर गेले आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.