शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

माजी संचालकांचे लक्ष न्यायालयीन निर्णयाकडे

By admin | Updated: October 12, 2015 00:39 IST

जिल्हा बँक घोटाळा : आज सुनावणी

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १५७ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी संचालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी, १२ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी निकाल अपेक्षित असल्यामुळे, माजी संचालकांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी शंभरजणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयीन सुनावणीमुळे त्यांनी गत आठवड्यात सुनावणीचे कामकाज १६ आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या माजी संचालकांचे लक्ष गुरुवारी होणाऱ्या सुनावणीकडे लागले होते. न्यायालयाने पुन्हा १२ आॅक्टोबर ही तारीख दिली आहे. जवळचीच तारीख मिळाल्याने संचालकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी, सोमवारी होणाऱ्या सुनावणीला त्यांना निर्णयाची अपेक्षा आहे. जिल्हा बँकेच्या या घोटाळा प्रकरणात माजी संचालक, तत्कालीन अधिकारी, मृत संचालकांचे वारसदार अशा शंभरजणांचा समावेश आहे. याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी लेखी अथवा तोंडी म्हणणे पुराव्यासह सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्या सुनावणीवेळी तत्कालीन दोन संचालक, दोन वारसदार, एक कार्यकारी संचालक व दोन व्यवस्थापक अशा सातजणांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर म्हणणे सादर केले. नऊजण सुनावणीला गैरहजर राहिले. ८४ लोकांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, त्यावर सुनावणी होणार असल्याने सुनावणीनंतरची तारीख म्हणणे मांडण्यासाठी मिळावी, अशी मागणी यातील बहुतांश माजी संचालकांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार चौकशी अधिकाऱ्यांनी ६ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. चौकशी अधिकाऱ्यांची सुनावणी ६ आॅक्टोबरला असल्याने त्यापूर्वी न्यायालयाने याप्रकरणी निर्णय घ्यावा, अशी विनंती माजी संचालकांनी केली होती. याचिकेवरील निर्णय झाल्याशिवाय चौकशी अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी सूचना न्यायालयाने केली होती. न्यायालयीन आदेशाबाबत चौकशी अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असेही सांगितले. त्यामुळे आरोपपत्रासंदर्भातील सुनावणीही १६ आॅक्टोबरपर्यंत लांबणीवर गेली आहे. न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय चौकशी अधिकाऱ्यांना काहीच करता येणार नसल्याने, न्यायालयामार्फत याचिकेवर पुढील सुनावणीस निर्णय होण्याची चिन्हे दिसत आहेत. (प्रतिनिधी)चौकशी १६ रोजी...चौकशी अधिकाऱ्यांचीही चौकशी न्यायालयीन निर्णयावर अवलंबून आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे १६ आॅक्टोबर रोजी त्यांनी सुनावणीची तारीख दिली आहे. याप्रकरणात जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या दिग्गज राजकीय नेत्यांची नावे असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. माजी अधिकाऱ्यांचीही नावे या प्रकरणात आहेत.