शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

राज्यातील बाजार समित्यांना आले कत्तलखान्याचे स्वरूप

By admin | Updated: September 28, 2015 23:47 IST

राजू शेट्टी : सांगलीतील चर्चासत्रात केली टीका

सांगली : बाजार समित्या या शेतकऱ्यांसाठी विकासाची मंदिरे बनायला हवी होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी या समित्या कत्तलखाने बनल्याचे दिसून आले, अशी टीका स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी सांगली बाजार समितीच्या चर्चासत्रात केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठीच बाजार समित्या स्थापन झाल्या आहेत, मात्र व्यापारी आणि दलालांच्या फायद्यात शेतकरीच दुर्लक्षित राहिला. नाशिकसारख्या ठिकाणी यंत्रणेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना रिंगण करून मारले जाते. विक्री व्यवस्थेतच आपण कमी पडल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये आणि व्यापारी-हमालांमध्ये भांडण सुरू झाले. बाजार समितीच्या संचालकांनी जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे की नाही, याची पाहणी केली पाहिजे. सांगली बाजार समितीमध्ये आम्ही आमचे प्रतिनिधी पाठविले आहेत. निश्चितच सांगलीची बाजार समिती राज्यातच नव्हे, तर देशात एक नवा आदर्श निर्माण करेल. बाजार समित्यांची व त्यातील व्यापारी, हमाल, तोलाईदार अशा सर्वच घटकांची वकिली आम्ही करायला तयार आहोत, पण शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय न करण्याची आमची अट असेल. सदाभाऊ खोत म्हणाले की, शेतकऱ्यांच्याच जिवावर सगळे अवलंबून आहेत. आजवर या शेतीमालावर अवलंबून असलेल्या सर्व लोकांच्या हाती पैसा आला, मात्र शेतीमालाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती एंडोसल्फानची बाटली आली. या घटकापैकी कुणीही आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही, मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या वारंवार घडताहेत. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, शंकरराव गायकवाड, गोपाळ मर्दा यांनीही चर्चासत्रात मार्गदर्शन केले. यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष पाटील यांनी स्वागत, तर प्रास्ताविक जीवन पाटील यांनी केले. पृथ्वीराज पवार, विक्रम सावंत, प्रकाश पाटील, कुमार पाटील, बाळू बंडगर, विकास मगदूम, जि. प. सदस्या संयोगीता कोळी, निगोंडा हुल्याळकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)चर्चासत्र बाजार समितीचे, चर्चा मंत्रीपदाची...बाजार समितीने विविध प्रश्नांवर चर्चासत्र आयोजित केले असले तरी, या चर्चासत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या मंत्रीपदाचीच अधिक चर्चा झाली. सदाभाऊ मंत्री झाल्याशिवाय बाजार समित्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. ते पणनमंत्रीच होतील, असे मत जीवन पाटील यांनी व्यक्त केले. त्यानंतर दिनकर पाटील यांनीही सदाभाऊंच्या मंत्रीपदाचा मुद्दा मांडला. सदाभाऊंना मंत्रीपद मिळाले, तर त्यांना पणन खातेच मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या सर्व गोष्टींची दखल घेत सदाभाऊंनी, आपण मंत्रिमंडळात असलो किंवा नसलो तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत राहू, असा निर्धार व्यक्त केला. खाटिकआणि बळीचे बकरेबाजार समित्या या शेतकऱ्यांसाठी कत्तलखाने बनल्या आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला, तर सदाभाऊ खोत यांनीही अशाच पद्धतीची टीका केली. खाटिकाच्या हातून बकरे सुटले, तर आनंद बकऱ्यालाच होणार आहे, खाटिकाला नाही. शेतकऱ्याला नेहमीच बळीचा बकरा बनविले जाते, असे मत खोत यांनी व्यक्त केले.