शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ! कुटुंबीयांनी धानोरकरांवर केले गंभीर आरोप
2
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
3
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
4
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
5
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
6
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
7
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
8
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
9
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
10
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
11
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
12
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
13
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
14
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
15
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
16
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
17
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
18
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
19
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
20
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?

औषध बिल नागरिकांना सक्तीने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST

जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाची दुरवस्था सांगली : जिल्हा परिषद मुख्य इमारतीमध्ये मोठे विश्रामगृहाची इमारत बांधली आहे. मात्र, या विश्रामगृहाची दुरवस्था ...

जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाची दुरवस्था

सांगली : जिल्हा परिषद मुख्य इमारतीमध्ये मोठे विश्रामगृहाची इमारत बांधली आहे. मात्र, या विश्रामगृहाची दुरवस्था झाल्यामुळे त्याचा नागरिकांना फारसा उपयोग होत नाही. विश्रामगृहाच्या खोल्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर उग्र वास येतो. स्वच्छताही होत नाही. यामुळे विश्रामगृहावर वर्षाला लाखो रुपयांचा खर्च करूनही वापरात येत नाही. काही ठरावी व्यक्तीच येथे कायम मुक्कामाला असताना दिसत आहेत.

बांधकाम कामगारांची नोंदणीची गरज

सांगली : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचाय स्तरावर करण्याचे आदेश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. ग्रा.पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी ग्रामीण व दुर्गम भागातील बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. जवळपास सात ते आठ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी न झाल्यामुळे त्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.

मद्यप्राशन दुचाकी, चारचाकी चालकांवर कारवाई करा

सांगली : शहरात अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक मद्यप्राशन करून वाहने चालवितात. याकडे वाहतूक, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कारवाई हाेत नसल्याने युवा वाहन चालकांची हिंमत वाढत चालली आहे.

रोजगार हमी योजनेची कामे ठप्प

सांगली : जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांची मागील दोन वर्षांच्या तुलनेत संख्या घटली असून, त्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आदी तालुक्यातील मजुरांना घरीच बसण्याची वेळ आली आहे. या भागातील मजूर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात शेजारच्या कृष्णा नदीकाठाकडे स्थलांतरित होतात. गत वर्षापासून मजूर कोरोनामुळे आपल्या गावी परतले आहेत. या मजुरांना रोजगार हमी योजनेतून कामे मिळण्याची गरज आहे.

शासकीय कार्यालयातील गर्दी वाढली

सांगली : मागील दोन महिन्यांपासून कोरोनामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता, परंतु शासनाने सोमवारपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले आहे. यामुळे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारपासून कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती सुरू झाली आहे, तसेच नागरिकही कामानिमित्त शासकीय कार्यालयात गर्दी होत आहे. या गर्दीवर प्रशासनाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.