शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

औषध बिल नागरिकांना सक्तीने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST

जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाची दुरवस्था सांगली : जिल्हा परिषद मुख्य इमारतीमध्ये मोठे विश्रामगृहाची इमारत बांधली आहे. मात्र, या विश्रामगृहाची दुरवस्था ...

जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाची दुरवस्था

सांगली : जिल्हा परिषद मुख्य इमारतीमध्ये मोठे विश्रामगृहाची इमारत बांधली आहे. मात्र, या विश्रामगृहाची दुरवस्था झाल्यामुळे त्याचा नागरिकांना फारसा उपयोग होत नाही. विश्रामगृहाच्या खोल्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर उग्र वास येतो. स्वच्छताही होत नाही. यामुळे विश्रामगृहावर वर्षाला लाखो रुपयांचा खर्च करूनही वापरात येत नाही. काही ठरावी व्यक्तीच येथे कायम मुक्कामाला असताना दिसत आहेत.

बांधकाम कामगारांची नोंदणीची गरज

सांगली : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचाय स्तरावर करण्याचे आदेश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. ग्रा.पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी ग्रामीण व दुर्गम भागातील बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. जवळपास सात ते आठ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी न झाल्यामुळे त्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.

मद्यप्राशन दुचाकी, चारचाकी चालकांवर कारवाई करा

सांगली : शहरात अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक मद्यप्राशन करून वाहने चालवितात. याकडे वाहतूक, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कारवाई हाेत नसल्याने युवा वाहन चालकांची हिंमत वाढत चालली आहे.

रोजगार हमी योजनेची कामे ठप्प

सांगली : जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांची मागील दोन वर्षांच्या तुलनेत संख्या घटली असून, त्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आदी तालुक्यातील मजुरांना घरीच बसण्याची वेळ आली आहे. या भागातील मजूर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात शेजारच्या कृष्णा नदीकाठाकडे स्थलांतरित होतात. गत वर्षापासून मजूर कोरोनामुळे आपल्या गावी परतले आहेत. या मजुरांना रोजगार हमी योजनेतून कामे मिळण्याची गरज आहे.

शासकीय कार्यालयातील गर्दी वाढली

सांगली : मागील दोन महिन्यांपासून कोरोनामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता, परंतु शासनाने सोमवारपासून लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले आहे. यामुळे जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारपासून कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती सुरू झाली आहे, तसेच नागरिकही कामानिमित्त शासकीय कार्यालयात गर्दी होत आहे. या गर्दीवर प्रशासनाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.