शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

लोककला ही समाजप्रबोधन करणारी शक्ती

By admin | Updated: May 10, 2016 02:28 IST

मकरंद अनासपुरे : नाम संस्थेच्या माध्यमातून पावसाळ्यात ग्लोबलबरोबर एक लाख झाडे लावणार

चिपळूण : नाम ही आपल्या सर्वांची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून येत्या पावसाळ्यात ग्लोबलबरोबर आपण १ लाख झाडे लावणार आहोत. लावलेली झाडे दोन पावसाळे जगवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. जेथे पाणीटंचाई आहे त्या भागात लोकसहभागातून नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करण्याची तयारी आहे. येथे सादर झालेली कला पाहून आपण प्रभावित झालो आहोत. लोककला ही समाज प्रबोधन करणारी शक्ती आहे. जनजागृतीचे ते प्रभावी माध्यम आहे असे आघाडीचे विनोदी अभिनेते व नाम फाऊंडेशनचे संचालक मकरंद अनासपुरे यांनी केले. चिपळूण येथे रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६ सुरु आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळी या महोत्सवाला अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हजेरी लावली. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे, संयोजन समिती अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण, आमदार सुनील शिंदे, नामचे केशवराव आघाप, डॉ. प्रकाश खांडके, डॉ. गणेश चंदनशिवे, निरंजन भाकरे, ग्लोबलचे राम रेडीज आदी अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. नामने मराठवाड्यात जे काम केले आहे ते उच्च आहे. शासनापेक्षाही हे काम चांगले आहे. आम्ही आमच्या परीने मराठवाडा भागात दौरा करुन तेथील जनतेला आपापल्या परीने मदतीचा हात दिला आहे. अधिकारी व कर्मचारीवर्गाची बैठक घेऊन या जिल्ह्यातून सर्वांचे एक दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्तांना दिले जाणार आहे. राजापूर येथे ५० एकर जागेवर गवत वाढवण्यात आले आहे. हे गवतही मराठवाड्यात पाठवले जाईल, असे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले. नामचे केशवराव आघाप यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. वरळीचे आमदार सुनील शिंदे यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष गोलमडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदेश खेडेकर यांनी केले. (प्रतिनिधी)