शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चारा छावण्या प्रस्तावांची तासगाव तालुक्यात वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:47 IST

तासगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. तालुक्यात तब्बल २ लाख ३८ हजार ८४६ पशुधन आहे. जनावरांना चारा मिळावा, अशी सातत्याने मागणी करूनदेखील अद्याप छावण्या सुरू झालेल्या नाहीत. शासनाने मागणी तिथे चारा छावणी देण्याचे धोरण जाहीर केले असले तरी

ठळक मुद्देजनावरांची उपासमार : सव्वादोन लाख पशुधनाची होतेय परवड

दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. तालुक्यात तब्बल २ लाख ३८ हजार ८४६ पशुधन आहे. जनावरांना चारा मिळावा, अशी सातत्याने मागणी करूनदेखील अद्याप छावण्या सुरू झालेल्या नाहीत. शासनाने मागणी तिथे चारा छावणी देण्याचे धोरण जाहीर केले असले तरी, जुन्या अनुभवामुळे, नव्याने चारा छावण्या सुरू करण्यासाठी संस्था पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे चारा छावण्यांचे धोरणच घातक ठरले असून जनावरांची उपासमार होत आहे.

गेल्यावर्षीचा अपुरा पाऊस, वाया गेलेला रब्बी हंगाम आणि जोडीला पाचवीला पूजलेली पाणीटंचाई यामुळे तासगाव तालुक्यात ओल्या आणि सुक्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. चाºयाअभावी जनावरांची उपासमार सुरू झाल्याने पशुधन धोक्यात आले आहे. चाराटंचाईची परिस्थिती या पुढेही अशीच राहिली, तर जनावरे कसायाला देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. यावर मात करण्यासाठी तातडीने चारा डेपो किंंवा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.

२०१२ च्या पशुगणनेनुसार तालुक्यात सुमारे २ लाख ३८ हजार ८४६ पशुधन आहे. यामध्ये लहान जनावरे, मोठी जनावरे, शेळ्या, मेंढ्या आणि कुक्कुटचा समावेश आहे. तालुक्यातील सुका चारा संपलेला आहे. पाणीटंचाईमुळे ओला चारा तयार होत नाही. जनावरांना एकवेळच्या चाºयासाठी शेतकºयांना धावाधाव करावी लागत आहे. दुष्काळाने शेतकरी भिकेकंगाल झाला आहे. जनावरांसाठी ओला चारा उपलब्ध नाही, तर सुका चारा संपला आहे.

शासनाने मागणी येईल तिथे चारा छावणी देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी संस्थांनी पुढाकार घेऊन चारा छावण्या सुरु करण्यासाठी प्रस्ताव देण्याचे आवाहनदेखील करण्यात आले. मात्र यापूर्वी छावण्या चालविलेल्या अनेक संस्थांवर अनियमिततेचा ठपका ठेवून गुन्हे दाखल झाले आहेत. या जुन्या अनुभवामुळे नव्याने छावण्या सुरू करण्यास संस्था पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे शासनाची मंजुरी, पशुपालक शेतकºयांची मागणी असूनदेखील छावण्या सुरू झालेल्या नाहीत. तालुक्यात दोन दिवसांपूर्वी डोंगरसोनी येथे एका विकास सोसायटीने पुढाकार घेऊन छावणी सुरू केली आहे. मात्र याव्यतिरिक्त एकही प्रस्ताव प्रशासनाकडे आलेला नाही. त्यामुळे जनावरांची उपासमार आणि चारा छावण्यांचे धोरणच निरूपयोगी, अशीच काहीशी अवस्था झाली आहे.छावणी नको : डेपो द्याचारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रशासनाची प्रक्रिया किचकट आहे. चारा छावण्या चालवणेदेखील जिकिरीचे काम आहे. त्यामुळे बहुतांश संस्थांनी प्रशासनाच्या आवाहनाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे चारा छावण्यांऐवजी तातडीने चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी होत आहे.तालुक्यातील पशुधनगाय ३२२८१म्हैस ६५३३३शेळी ३०४६०मेंढी ९२७६कुक्कुट १०१४९६एकूण २३८८४६

टॅग्स :Sangliसांगलीgovernment schemeसरकारी योजना