शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य माणूस साहित्याचा केंद्रबिंदू हवा - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: January 28, 2017 21:16 IST

भूमिका कोणतीही असली तरी, सामान्य माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे प्रतिपादन श्रीपाल सबनीस यांनी केले.

 
चरण (सांगली), दि. २८ -  वेगवेगळ्या प्रकारचे जातीसमूह या देशात आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकेतून चळवळी सुरू आहेत. भूमिका कोणतीही असली तरी, सामान्य माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय 
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी केले. पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथे शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळाच्यावतीने आयोजित नवव्या डोंगरी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सबनीस म्हणाले की, अनेक प्रकारची संमेलने महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात होत आहेत. अशा क्षेत्रीय संमेलनांचा इतिहास लिहिण्याची गरज आहे. साहित्यिकांनी दलित, आदिवासी, डोंगरी अशा संमेलनांमधून समतेचा विचार प्रस्थापित केला पाहिजे. याचबरोबर आपल्या महापुरुषांना जातीय चौकटीत न मांडता अखिल मानवजातीच्या पातळीवर त्यांचे विचार पोहोचविले पाहिजेत. संमेलनाचे उद्घाटक माजी मंत्री आमदार जयंत पाटील म्हणाले की, साहित्यच माणसाला सुसंस्कृत बनविते. साहित्याच्या क्षेत्रातील माणसे आपल्या प्रतिभेने जगाच्या कानाकोपºयात पोहोचतात. साहित्यातून माणसाला विचार मिळतो, म्हणून साहित्यिकांना व साहित्य चळवळीला प्रतिष्ठा देण्याची गरज आहे. समाज सर्वार्थाने पुढे न्यायचा असेल, तर साहित्यिकांची नितांत गरज आहे. यावेळी साहित्य संमेलनाच्या आयोजक संस्थेस पन्नास हजार रुपये देणगी
देण्याचे पाटील यांनी जाहीर केले. माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, कवी प्रदीप पाटील यांनी मनोगत  व्यक्त केले. हणमंतराव पाटील यांनी स्वागत केले. शब्दरंग साहित्य मंडळाचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी प्रास्ताविक केले.
संमेलनास प्रा. शामराव पाटील, प्रा. डॉ. डी. जी. कणसे, पी. वाय. पाटील, सरपंच विजय विभुते, उपसरपंच अंकुश पाटील, मुख्याध्यापक अमृतकुमार पांढरे, शिवाजी पाटील, डी. वाय. ढेरे, मोहन पाटील, बाजीराव शेंडगे, मनोज चिंचोलकर, तानाजी पाटील उपस्थित होते. नारायण घोडे यांनी आभार मानले.
(वार्ताहर)