शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पुराची मदत अडकली पंचनाम्यांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:25 IST

बोरगाव : एकीकडे कृष्णाकाठ महापुरामुळे हतबल झाला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये शेतीचे, घरांचे व जनावरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले ...

बोरगाव : एकीकडे कृष्णाकाठ महापुरामुळे हतबल झाला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये शेतीचे, घरांचे व जनावरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. महापुराला आठ दिवस उलटूनही अद्याप शासकीय मदत मात्र पंचनाम्यांमध्ये अडकली आहे. राज्यभरातील नेते व वरिष्ठ अधिकारी पूरबाधित परिसरात दौरे करीत आहेत. नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत; परंतु यानंतरही शासनस्तरावर पूरग्रस्तांच्या मदतीबाबत काेणतीही हालचाल दिसत नाही. यामुुळे संतप्त पूरबाधित जनता ‘आता भेटी नकोत, मदत द्या’ अशी आर्त हाक देत आहेत.

महापुरामुळे कृष्णा व वारणा काठावर होत्याचे नव्हते झाले आहे. शेती पाण्याखाली जाऊन हाता-तोंडाला आलेली पिके कुजून गेली आहेत. ऊस, सोयाबीन, भुईमूग, केळी, मका व कडधान्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

अनेकांच्या डोक्यावरील छप्पर उघडे पडले आहे. शेकडाे घरांची पडझड झाली आहे. कुटुंबे बेघर झाली आहेत. जनावरांचेही स्थलातंर करावे लागले. मंत्रिमहाेदय, वरिष्ठ अधिकारी हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहून जात आहेत. यानंतरही पंचनाम्याच्या नावाखाली पूरबाधितांची चेष्टा सुरू आहे. जनतेला किमान जगण्यासाठी तत्काळ स्वरूपाची मदत द्या, अशी मागणी होत आहे.

२०१९ च्या महापुरात शासनाकडून चौथ्या दिवशी मदत दिली गेली होती. मात्र, यंदा आठ दिवस उलटूनही मदत पंचनाम्यात व कागदातच अडकून राहिली आहे. पूरबाधित कुटुंबे आता पुरती हतबल झाली आहेत. अनेक जण जगण्यासाठी खासगी सावकार अथवा बँका-पतपेढ्यांचे उंबरठे झिजवू लागले आहेत.

मदतीचा फार्स न करता पूरबाधितांना प्राथमिक मदत तरी लवकरात लवकर द्या, अशी मागणी हाेत आहे.