शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अंकलखोपला रस्ते कामामुळे पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:25 IST

अंकलखोप : अंकलखोप (ता. पलुस) येथे भारती विद्यापीठ हुतात्मा भगतसिंग हायस्कूलमध्ये कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पूरग्रस्तांची भेट ...

अंकलखोप : अंकलखोप (ता. पलुस) येथे भारती विद्यापीठ हुतात्मा भगतसिंग हायस्कूलमध्ये कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी टोप-दिघंची महामार्गाच्या रूंदीकरण कामामुळे पुराचा फटका बसल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन कदम यांनी दिले.

अंकलखोपमधील ४०० नागरिक व ३५० जनावरे भगतसिंग हायस्कूल येथे स्थलांतरित झाली आहेत. मंत्री कदम यांनी यावेळी या नागरिकांच्या व जनावरांच्या व्यवस्थेबाबत माहिती घेतली. टोप-दिघंची महामार्गच्या रूंदीकरणामुळे अंकलखोप-भिलवडी रस्त्यावर ज्याठिकाणी पाणी येऊन रस्त्याची समस्या निर्माण झाली आहे, त्याठिकाणी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली. मंत्री कदम यांनी त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली व या रस्त्याच्या कामावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

महापुरामुळे बाधित लोकांना निवारा केंद्रात ठेवले आहे. त्याठिकाणाच्या सर्व लोकांची कोरोनासंबंधीची ॲन्टिजन चाचणी करून घ्या व कोणी पाॅझिटिव्ह सापडल्यास त्या व्यक्तीची वेगळ्या खोलीमध्ये सोय करा अथवा कोरोना केअर सेंटरला पाठवा. यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही. अन्यथा निवारा केंद्रातील सर्व लोक बाधित होतील.

यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार श्रीनिवास ढाणे, सरपंच अनिल विभुते, उपसरपंच स्वाती पाटील, विनय पाटील, अशोक चौगुले उपस्थित होते.