शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
6
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
7
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
8
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
9
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
10
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
11
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
12
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
13
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
14
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
15
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
16
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
18
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
19
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
20
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले

पूरग्रस्त व्यापाऱ्यांना करमाफी, सवलती द्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST

२९ दुपटे ०१ : व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने गुरुवारी देवेेंद्र फडणवीस यांना व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर निवेदन देण्यात आले. यावेळी, खासदार संजयकाका ...

२९ दुपटे ०१ : व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने गुरुवारी देवेेंद्र फडणवीस यांना व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर निवेदन देण्यात आले. यावेळी, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पूरग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाने भरीव मदत करून विविध कर माफ करावेत, अशी मागणी गुरुवारी व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. फडणवीस यांनी व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी दिली.

सांगलीतील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या फडणवीस यांची व्यापाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, भाजपचे नेते शेखर इनामदार उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, सांगली शहर सातत्याने महापुरामुळे अडचणीत आहे. यात सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही वर्षात व्यापाऱ्यांचा आर्थिक कणा या संकटांनी मोडला आहे. मुख्यमंत्री असताना भाजप सरकारने व्यापाऱ्यांना, नागरिकांना तातडीने मदत दिली होती. सध्या सलग ४ महिने सांगलीचे व्यापारी लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. लॉकडाऊन सुरू असताना, पुन्हा महापुराने येथील बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. व्यापारी आधीच लॉकडाऊनमध्ये कंगाल झाला असताना महापुराने नुकसानीत भर टाकली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना भरीव आणि ठोस मदत केल्याशिवाय तो पुन्हा उभारू शकणार नाही. सत्ताधारी सरकारकडून फडणवीस यांनी व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घ्याव्यात. कोणतेही जाचक पंचनामे न करता, ज्या दुकानात पाणी गेले आहे, अशांना तातडीने रु. १ लाखाची मदत मिळावी, किमान १ वर्षाचे स्थानिक कर माफ व्हावेत, लॉकडाऊन काळ आणि पूरस्थितीला अनुसरून ६ महिन्यांचे वीजबिल माफ व्हावे, सर्व व्यावसायिक कर्जाचे ६ महिन्यांचे व्याज विनाअट माफ करावे व सर्व हफ्ते भरण्यास बिनव्याजी ६ महिन्यांची मुदत मिळावी, विनातारण आणि माफक व्याजदरात तत्काळ या व्यापाऱ्यांना कर्ज वितरण व्हावे, राज्य सरकारने, केंद्रशासित सर्व कर ६ महिन्यांसाठी माफ करून आणावेत, तसा पाठपुरावा करावा, पूरग्रस्त बाजारपेठेत परत कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन करू नये व दुकानांची वेळ वाढवून द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.