शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त व्यापाऱ्यांना करमाफी, सवलती द्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST

२९ दुपटे ०१ : व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने गुरुवारी देवेेंद्र फडणवीस यांना व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर निवेदन देण्यात आले. यावेळी, खासदार संजयकाका ...

२९ दुपटे ०१ : व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने गुरुवारी देवेेंद्र फडणवीस यांना व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर निवेदन देण्यात आले. यावेळी, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पूरग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाने भरीव मदत करून विविध कर माफ करावेत, अशी मागणी गुरुवारी व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. फडणवीस यांनी व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी दिली.

सांगलीतील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या फडणवीस यांची व्यापाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, भाजपचे नेते शेखर इनामदार उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, सांगली शहर सातत्याने महापुरामुळे अडचणीत आहे. यात सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही वर्षात व्यापाऱ्यांचा आर्थिक कणा या संकटांनी मोडला आहे. मुख्यमंत्री असताना भाजप सरकारने व्यापाऱ्यांना, नागरिकांना तातडीने मदत दिली होती. सध्या सलग ४ महिने सांगलीचे व्यापारी लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. लॉकडाऊन सुरू असताना, पुन्हा महापुराने येथील बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. व्यापारी आधीच लॉकडाऊनमध्ये कंगाल झाला असताना महापुराने नुकसानीत भर टाकली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना भरीव आणि ठोस मदत केल्याशिवाय तो पुन्हा उभारू शकणार नाही. सत्ताधारी सरकारकडून फडणवीस यांनी व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य करून घ्याव्यात. कोणतेही जाचक पंचनामे न करता, ज्या दुकानात पाणी गेले आहे, अशांना तातडीने रु. १ लाखाची मदत मिळावी, किमान १ वर्षाचे स्थानिक कर माफ व्हावेत, लॉकडाऊन काळ आणि पूरस्थितीला अनुसरून ६ महिन्यांचे वीजबिल माफ व्हावे, सर्व व्यावसायिक कर्जाचे ६ महिन्यांचे व्याज विनाअट माफ करावे व सर्व हफ्ते भरण्यास बिनव्याजी ६ महिन्यांची मुदत मिळावी, विनातारण आणि माफक व्याजदरात तत्काळ या व्यापाऱ्यांना कर्ज वितरण व्हावे, राज्य सरकारने, केंद्रशासित सर्व कर ६ महिन्यांसाठी माफ करून आणावेत, तसा पाठपुरावा करावा, पूरग्रस्त बाजारपेठेत परत कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन करू नये व दुकानांची वेळ वाढवून द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.