शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जिल्ह्यात नव्याने पाच नगरपंचायती

By admin | Updated: February 21, 2015 23:59 IST

अधिसूचना जारी : ६ मार्चपर्यंत हरकती घेणार

सांगली : जिल्ह्यामध्ये नव्याने खानापूर, कवठेमहांकाळ , आटपाडी, कडेगाव व शिराळा नगरपंचायती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, यासाठी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने अधिसूचना जारी केली आहे. यासाठी आता ६ मार्चपर्यंत हरकती मागवण्यात आल्या असून, त्याच्या सुनावणीनंतर नगरपंचायती अस्तित्वात येणार आहेत. राज्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यानुसार सांगली जिल्ह्यातील खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव व शिराळा ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली. यासाठी ६ मार्चपर्यंत हरकती घेण्यात येणार असून, या हरकती शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यावर सुनावणी होणार आहे. यानंतर नगरपंचायती अस्तित्वात येणार आहेत. नगरपंचायतीमुळे स्वच्छता, आरोग्य, शिक्षणासाठी विशेष तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यासाठी नगरविकास खात्याकडून थेट विकास निधीही मिळणार असून, यामुळे विकासाला गती मिळणार आहे. ज्या ठिकाणी आता ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झालेल्या आहेत, तो निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांचा कार्यकाल रद्द होणार आहे. नगरपंचायती अस्तित्वात येण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. याबाबत नगरप्रशासन अधिकारी पंकज पाटील म्हणाले की, या पाच नगरपंचायतींसाठी कालच अधिसूचना जारी केल्या आहेत. पहिल्यांदाच जिल्ह्यात नगरपंचायती होत आहेत. यापूर्वी जिल्ह्यात पाच नगरपालिका झाल्या आहेत. हरकतींवर सुनावणी झाल्यानंतरच नगरविकास खाते निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल, त्यानुसार जिल्हा प्रशासन कार्यवाही करेल. (प्रतिनिंधी)