शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

जिल्ह्यात नव्याने पाच नगरपंचायती

By admin | Updated: February 21, 2015 23:59 IST

अधिसूचना जारी : ६ मार्चपर्यंत हरकती घेणार

सांगली : जिल्ह्यामध्ये नव्याने खानापूर, कवठेमहांकाळ , आटपाडी, कडेगाव व शिराळा नगरपंचायती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, यासाठी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने अधिसूचना जारी केली आहे. यासाठी आता ६ मार्चपर्यंत हरकती मागवण्यात आल्या असून, त्याच्या सुनावणीनंतर नगरपंचायती अस्तित्वात येणार आहेत. राज्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नगरपंचायत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यानुसार सांगली जिल्ह्यातील खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव व शिराळा ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली. यासाठी ६ मार्चपर्यंत हरकती घेण्यात येणार असून, या हरकती शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यावर सुनावणी होणार आहे. यानंतर नगरपंचायती अस्तित्वात येणार आहेत. नगरपंचायतीमुळे स्वच्छता, आरोग्य, शिक्षणासाठी विशेष तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यासाठी नगरविकास खात्याकडून थेट विकास निधीही मिळणार असून, यामुळे विकासाला गती मिळणार आहे. ज्या ठिकाणी आता ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झालेल्या आहेत, तो निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांचा कार्यकाल रद्द होणार आहे. नगरपंचायती अस्तित्वात येण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. याबाबत नगरप्रशासन अधिकारी पंकज पाटील म्हणाले की, या पाच नगरपंचायतींसाठी कालच अधिसूचना जारी केल्या आहेत. पहिल्यांदाच जिल्ह्यात नगरपंचायती होत आहेत. यापूर्वी जिल्ह्यात पाच नगरपालिका झाल्या आहेत. हरकतींवर सुनावणी झाल्यानंतरच नगरविकास खाते निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल, त्यानुसार जिल्हा प्रशासन कार्यवाही करेल. (प्रतिनिंधी)