शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

सांगलीत पाचशेवर कंत्राटी कर्मचारी बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST

सांगली : सांगली जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर ५५० आरोग्य कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात आले. १० ...

सांगली : सांगली जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर ५५० आरोग्य कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नेमण्यात आले. १० सप्टेंबर २०२१ पर्यंत सर्वच कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले.

हे कर्मचारी कमी केल्यामुळे रुग्णसेवेवर फारसा परिणाम झालेला नाही. जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या ३०० हून कमी झाली आहे, त्यामुळे कर्मचारी कमी झाल्याचा फटका बसलेला नाही. मिरज कोविड रुग्णालयातील नियमित कर्मचाऱ्यांवर तेथील अतिरिक्त कोविड केंद्राची जबाबदारी सोपविली आहे.

केस स्टडी

रवींद्र कांबळे हा मिरजेत खासगी रुग्णालयात काम करणारा परिचारक कंत्राटी स्वरुपात नियुक्तीस होता. त्याला मिरज कोविड रुग्णालयात सेवा देण्यात आली होती. पहिल्या लाटेत खासगीमधील नोकरी सोडून शासकीय कोविड रुग्णालयात गेला. पहिली लाट संपताच कार्यमुक्त केले. त्याला याची अपेक्षा नव्हती. नोकरी गेल्याने धक्का बसला. खासगी रुग्णालयातही पुन्हा संधी मिळाली नाही. सुदैवाने दुसऱ्या लाटेत पुन्हा कोविड रुग्णालयात घेतले होते. त्यामुळे सहा महिने रोजगार मिळाला. पण आता पुन्हा सेवा समाप्त केल्याने रस्त्यावर आला आहे. नोकरी पुन्हा-पुन्हा सोडण्याने खासगीमध्येही त्याला संधी मिळेना झाली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत शासनाने बोलाविले, तर जाणार नाही, अशी भूमिका त्याने व्यक्त केली. कमी केलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामाचे पूर्ण मानधन मिळाले आहे, पण त्यांना आता नव्या नोकऱ्या शोधण्यात अडचणी येत आहेत.

कोट

गेल्या दीड वर्षांपासून आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून कोरोना रुग्णांवर उपचार केले. यानिमित्ताने शासकीय कामकाजाचा व आरोग्यसेवेचा चांगला अनुभव आम्हाला आला आहे. नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कार्यक्षमतेने आम्ही काम केले. आता गरज संपल्याने काढून टाकले आहे. दीड वर्षांच्या खंडानंतर नोकरी कोठे मिळणार? असा प्रश्न आमच्यासमोर आहे. शासनाने सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे, त्यामध्ये आम्हाला प्राधान्य द्यावे.

- पुष्कराज कोळी, कंत्राटी परिचारक, मिरज

कोट

शासनाने निधी थांबवल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करावे लागले. जिल्ह्यात कोरोना रुग्ण अद्याप कायम असल्याने आम्हाला मनुष्यबळाची गरज आहे, त्यामुळे कंत्राटींना पुन्हा नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शासन निर्णय घेईल त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी