शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

कौल लावणारे पाच देवॠषी गजाआड

By admin | Updated: March 13, 2017 22:51 IST

सुरुरच्या दावजी पाटील मंदिरात ‘अंनिस’ची कारवाई : आई-वडिलांची मानसिक त्रासातून सुटका करण्यासाठी बारा हजारांची मागणी

कवठे : आई-वडिलांची मानसिक त्रासापासून सुटका करण्यासाठी देवाकडे कौल लावतो असे सांगून पैशांची मागणी केल्याची तक्रार आल्यानंतर पाच देवऋषींना भुर्इंज पोलिसांनी सुरुर येथून रविवारी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून अनेक आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या. रमेश बागल, अशोक बागल, भरत बागल, धनेश बागल, शंकर बागल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, सुरुर येथील सुप्रसिद्ध दावजी पाटील मंदिरात भानामती अन् करणीच्या नावाखाली बुवाबाजीचा बाजारच भरत असल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आली होती. त्याठिकाणी दर अमावस्या व पौर्णिमेला दरबार भरत होता. त्याठिकाणी येणाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी अंधश्रद्धा पसरवत देवाकडे कौल लावतो, असे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात होती, असेही तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार ‘अंनिस’तर्फे एक बनावट भक्त पाठविण्यात आला. त्याच्या आई-वडिलांची मानसिक त्रासातून मुक्तता व्हावी, अशी विनंती त्याने केल्यानंतर संबंधित पुजाऱ्यांनी पैशाची मागणी केली. तसेच आजार दूर करण्यासाठी देवास कौल लावतो, असेही सांगितले. याप्रकरणी भुर्इंज पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुरुवातीला तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर आणखी दोघे सापडले. त्यांच्याकडून काळ्या बाहुल्या, रोख रक्कम, लिंबू आदी वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी ‘अंनिस’चे राज्य सचिव प्रशांत पोतदार, बुवाबाजी संघर्ष सचिव भगवान रणदिवे, आरीफ मुल्ला, धर्मराज माने, सुनील रणदिवे आदी कार्यकर्त्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पद्माकर घनवट, त्यांचे सहकारी व भुर्इंज पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत रमेश बागल, अशोक बागल, भरत बागल, धनेश बागल, शंकर बागल यांना महाराष्ट्र नगरबळी व इतर अमानुष अनिष्ठ आणि अघोरी कृत्य याला प्रतिबंध व निर्मूलन कायदा २०१३ च्या परिच्छेद ३ व ५ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. (वार्ताहर)पौर्णिमेलाच निघाला मुहूर्तसुरुरच्या मंदिरात तीन ते चार अमावस्या, पौर्णिमेला भेट देऊन आल्यानंतर ‘अंनिस’तर्फे तेथील प्रकाराची पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पौर्णिमेची निवड करण्यात आली. त्यानुसार रविवार, दि. १२ रोजी ही कारवाई करून अटक केली.पुणे-मुंबईहून गाड्यांचा ताफाया ठिकाणी येणाऱ्यांमध्ये पुणे, मुंबईच्या झोपडपट्टीतील रहिवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे गाड्या लावण्यासाठीही जागा मिळत नाही. समस्या सोडविणारे दुकान‘संबंधित मंदिरात माणसे समस्या सोडविण्यासाठी बसलेली होती. त्यांच्या समोरच्या टेबलवर कौल लावण्यासाठी गहू ठेवलेले होते. अंनिस व पोलिसांनी छापा टाकल्याचे समजल्यावर त्यांना हालचाल करण्यासाठीही संधी मिळाली नाही. त्यामुळे सर्व साहित्यांनिशी त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी बिबे, काळ्या बाहुल्या, लिंबं तसेच सत्तर ते पंचाहत्तर रुपयांची रोकडही सापडली,’ अशी माहिती प्रशांत पोतदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.