शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

मत्स्यव्यवसाय विभागाच्या भरतीस स्थगिती देणार, जानकर यांनी दिले आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 12:55 IST

मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन तातडीने भरतीची प्रक्रिया बंद करुन नव्याने मरीन बायॉलॉजी पात्रतेचा समावेश करुन जाहिरात प्रसिध्द करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असे आश्वासन मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी तरुणांना दिले.

ठळक मुद्देमत्स्यव्यवसाय विभागाच्या भरतीस स्थगिती देणारमत्स्य व दुग्धविकासमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

सांगली : मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळल्याने पश्चिम महाराष्ट्रातील हजारो तरुणांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन तातडीने भरतीची प्रक्रिया बंद करुन नव्याने मरीन बायॉलॉजी पात्रतेचा समावेश करुन जाहिरात प्रसिध्द करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असे आश्वासन मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी तरुणांना दिले.लोकमतने दि. १६ जानेवारी २०१९ रोजी मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळली या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द केली होती. यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील तरुणांनी प्रा. डॉ. एन. डी. बिरनाळे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री जानकर यांची कऱ्हाड येथे भेट घेतली. यावेळी जानकर यांनी शिष्टमंडळाला भरतीतील बदल करण्याचे आश्वासन दिले.मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या ९० जागा भरणार असल्याचे जाहीर करुन तशी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानंतर क वर्गातील सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पद भरतीच्या ७९ जागा जाहीर केल्या आहेत. उर्वरित अ व ब वर्गाच्या ११ जागांची भरती जाहीर केली नाही. सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पदासाठी बी.एफ्.एस्सी. ही पदवी पात्र ठरविली आहे.

वास्तविक महाराष्ट्रात मत्स्यव्यवसाय विभागात १९८९-९० पासून एम्.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) पात्रताधारक उमेदवारांची भरती झाली आहे. आजही असे अधिकारी मत्स्यव्यवसाय विभागात सेवेत आहेत. असे असताना केवळ बी.एफ.एस्सी. ही पात्रता ठरविल्याने मत्स्यविभागात गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरणाऱ्या एम्.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) उमेदवारांवर शासनाने अन्याय केला असल्याचा इच्छुक उमेदवारांचा आरोप आहे.

मत्स्यव्यवसाय विभागात ब व क वर्गातील ७९ जागा जाहीर केल्या आहेत. ज्या ७९ जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी व उर्वरित ११ जागांसाठीही एम.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) ही शैक्षणिक पात्रता ग्राह्य धरून सुधारित ९० जागांची फेरजाहिरात द्यावी व अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मरीन बायॉलॉजी पात्रतेच्या उमेदवारांनी मंत्री जानकर यांच्याकडे केली.यावेळी जानकर यांनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मत्स्यव्यवसाय विभागाच्या भरतीमधील जाहिरातीमध्ये त्रुटी असल्याचे तरुणांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची सत्यता पडताळून भरतीला स्थगिती देवून सुधारीत जाहिरात काढण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना दिली आहे, अशी माहिती प्रा. डॉ. एन. डी. बिरनाळे यांनी दिली.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरSangliसांगली