शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सांगलीत बँकांच्या इतिहासात ३१ मार्च प्रथमच वसुलीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 00:26 IST

सांगली : कोरोनामुळे बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच आर्थिक वर्षाचा शेवटचा म्हणजेच ३१ मार्चचा दिवस कोणत्याही मोठ्या उलाढालीशिवाय कोरडाच गेला. ...

ठळक मुद्दे कोरोनाचा फटका : लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबले, कर्जाची थकबाकी मोठी

सांगली : कोरोनामुळे बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच आर्थिक वर्षाचा शेवटचा म्हणजेच ३१ मार्चचा दिवस कोणत्याही मोठ्या उलाढालीशिवाय कोरडाच गेला. मोठ्या थकबाकींच्या वसुलीसह नफ्याची नोंद करून ताळेबंद सक्षम करण्याचा हा दिवस यंदा अनेक आर्थिक अडचणींची नोंद करून गेला.

बँकिंग व्यवसायात ३१ मार्च हा दिवस सर्वात महत्त्वाचा असतो. आर्थिक वर्ष संपताना ताळेबंद निश्चितीसाठी हा दिवस अखेरचा असल्याने या दिवशी जास्तीत जास्त कर्जवसुली करून नफ्याच्या माध्यमातून वित्तीय सक्षमता नोंदविण्यासाठी बँकांची धडपड सुरू असते. कृषी कर्जासह, वाहन, गृह, व्यावसायिक, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्राला कर्जपुरवठा केल्यानंतर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये याची जास्तीत जास्त वसुली करण्याकडे बँकांचा कल असतो. अगदी ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही कोट्यवधी रुपयांची वसुली बँकांकडे होत असते. यंदा बँकिंग क्षेत्राची ही परंपरा खंडित झाली आहे. अनेक अडचणी, थकीत कर्ज, एनपीएची वाढलेली टक्केवारी, कमी होत असलेला नफा अशा नोंदी करून आर्थिक सक्षमतेला हादरा देणाऱ्या गोष्टी बँकिंग क्षेत्राला नाईलाजास्तव पाहाव्या आणि कराव्या लागत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. सांगली जिल्ह्यातही सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रासाठी केलेला कर्जपुरवठा अडचणीत आला आहे. संबंधित क्षेत्रात उलाढालच नसल्याने कर्जवसुली करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बँका, पतसंस्था व अन्य वित्तीय संस्थांनी मंगळवारी ३१ मार्च रोजी अशा अनेक नकोशा गोष्टींच्या नोंदी ताळेबंदात करून आर्थिक वर्षाचा समारोप केला. बँकांचा हा ताळेबंद यंदा या क्षेत्राला हादरा देणारा आहे. पुढील आर्थिक वर्षात अनेक आव्हाने निर्माण करणारा आणि कामाचा भार वाढविणारा ठरणार आहे.

लिलाव प्रक्रियेलाही अडचणीजप्त केलेल्या संस्थांच्या मालमत्तांचा लिलावही मार्चपूर्वीच केला जातो. सेक्युरिटायझेशनअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १५ हून अधिक बँकांनी गेल्या तीन महिन्यांपासून थकबाकीदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. मार्चमध्ये अशा अनेक थकबाकीदार संस्थांचे लिलाव होणार होते. पण संचारबंदीमुळे ही प्रक्रिया प्रतिसादाविना पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे तितक्या प्रमाणावर थकबाकीची नोंद बँकांच्या ताळेबंदाला होणार आहे.

या गोष्टींनी घटणार नफाकृषी व अन्य क्षेत्रांच्या कर्जाची थकबाकी वाढलीसंचारबंदीमुळे कर्जवसुलीस अडचणीलिलाव प्रक्रियेला संचारबंदीमुळे अडचणी आल्याने वसुली थांबलीकर्जवसुलीसाठी प्रत्यक्ष बॅँकांना कर्जदाराच्या दारापर्यंत जाता आले नाहीगृह, वाहन कर्जाचे हप्ते तीन महिने लांबणीवर टाकलेनव्या कर्जाचे वाटप होऊ शकले नाही

टॅग्स :Sangliसांगली