शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

सांगलीत बँकांच्या इतिहासात ३१ मार्च प्रथमच वसुलीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 00:26 IST

सांगली : कोरोनामुळे बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच आर्थिक वर्षाचा शेवटचा म्हणजेच ३१ मार्चचा दिवस कोणत्याही मोठ्या उलाढालीशिवाय कोरडाच गेला. ...

ठळक मुद्दे कोरोनाचा फटका : लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबले, कर्जाची थकबाकी मोठी

सांगली : कोरोनामुळे बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच आर्थिक वर्षाचा शेवटचा म्हणजेच ३१ मार्चचा दिवस कोणत्याही मोठ्या उलाढालीशिवाय कोरडाच गेला. मोठ्या थकबाकींच्या वसुलीसह नफ्याची नोंद करून ताळेबंद सक्षम करण्याचा हा दिवस यंदा अनेक आर्थिक अडचणींची नोंद करून गेला.

बँकिंग व्यवसायात ३१ मार्च हा दिवस सर्वात महत्त्वाचा असतो. आर्थिक वर्ष संपताना ताळेबंद निश्चितीसाठी हा दिवस अखेरचा असल्याने या दिवशी जास्तीत जास्त कर्जवसुली करून नफ्याच्या माध्यमातून वित्तीय सक्षमता नोंदविण्यासाठी बँकांची धडपड सुरू असते. कृषी कर्जासह, वाहन, गृह, व्यावसायिक, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्राला कर्जपुरवठा केल्यानंतर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये याची जास्तीत जास्त वसुली करण्याकडे बँकांचा कल असतो. अगदी ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही कोट्यवधी रुपयांची वसुली बँकांकडे होत असते. यंदा बँकिंग क्षेत्राची ही परंपरा खंडित झाली आहे. अनेक अडचणी, थकीत कर्ज, एनपीएची वाढलेली टक्केवारी, कमी होत असलेला नफा अशा नोंदी करून आर्थिक सक्षमतेला हादरा देणाऱ्या गोष्टी बँकिंग क्षेत्राला नाईलाजास्तव पाहाव्या आणि कराव्या लागत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. सांगली जिल्ह्यातही सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रासाठी केलेला कर्जपुरवठा अडचणीत आला आहे. संबंधित क्षेत्रात उलाढालच नसल्याने कर्जवसुली करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बँका, पतसंस्था व अन्य वित्तीय संस्थांनी मंगळवारी ३१ मार्च रोजी अशा अनेक नकोशा गोष्टींच्या नोंदी ताळेबंदात करून आर्थिक वर्षाचा समारोप केला. बँकांचा हा ताळेबंद यंदा या क्षेत्राला हादरा देणारा आहे. पुढील आर्थिक वर्षात अनेक आव्हाने निर्माण करणारा आणि कामाचा भार वाढविणारा ठरणार आहे.

लिलाव प्रक्रियेलाही अडचणीजप्त केलेल्या संस्थांच्या मालमत्तांचा लिलावही मार्चपूर्वीच केला जातो. सेक्युरिटायझेशनअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १५ हून अधिक बँकांनी गेल्या तीन महिन्यांपासून थकबाकीदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. मार्चमध्ये अशा अनेक थकबाकीदार संस्थांचे लिलाव होणार होते. पण संचारबंदीमुळे ही प्रक्रिया प्रतिसादाविना पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे तितक्या प्रमाणावर थकबाकीची नोंद बँकांच्या ताळेबंदाला होणार आहे.

या गोष्टींनी घटणार नफाकृषी व अन्य क्षेत्रांच्या कर्जाची थकबाकी वाढलीसंचारबंदीमुळे कर्जवसुलीस अडचणीलिलाव प्रक्रियेला संचारबंदीमुळे अडचणी आल्याने वसुली थांबलीकर्जवसुलीसाठी प्रत्यक्ष बॅँकांना कर्जदाराच्या दारापर्यंत जाता आले नाहीगृह, वाहन कर्जाचे हप्ते तीन महिने लांबणीवर टाकलेनव्या कर्जाचे वाटप होऊ शकले नाही

टॅग्स :Sangliसांगली