शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सांगलीत बँकांच्या इतिहासात ३१ मार्च प्रथमच वसुलीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 00:26 IST

सांगली : कोरोनामुळे बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच आर्थिक वर्षाचा शेवटचा म्हणजेच ३१ मार्चचा दिवस कोणत्याही मोठ्या उलाढालीशिवाय कोरडाच गेला. ...

ठळक मुद्दे कोरोनाचा फटका : लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबले, कर्जाची थकबाकी मोठी

सांगली : कोरोनामुळे बँकिंग क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच आर्थिक वर्षाचा शेवटचा म्हणजेच ३१ मार्चचा दिवस कोणत्याही मोठ्या उलाढालीशिवाय कोरडाच गेला. मोठ्या थकबाकींच्या वसुलीसह नफ्याची नोंद करून ताळेबंद सक्षम करण्याचा हा दिवस यंदा अनेक आर्थिक अडचणींची नोंद करून गेला.

बँकिंग व्यवसायात ३१ मार्च हा दिवस सर्वात महत्त्वाचा असतो. आर्थिक वर्ष संपताना ताळेबंद निश्चितीसाठी हा दिवस अखेरचा असल्याने या दिवशी जास्तीत जास्त कर्जवसुली करून नफ्याच्या माध्यमातून वित्तीय सक्षमता नोंदविण्यासाठी बँकांची धडपड सुरू असते. कृषी कर्जासह, वाहन, गृह, व्यावसायिक, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्राला कर्जपुरवठा केल्यानंतर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये याची जास्तीत जास्त वसुली करण्याकडे बँकांचा कल असतो. अगदी ३१ मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही कोट्यवधी रुपयांची वसुली बँकांकडे होत असते. यंदा बँकिंग क्षेत्राची ही परंपरा खंडित झाली आहे. अनेक अडचणी, थकीत कर्ज, एनपीएची वाढलेली टक्केवारी, कमी होत असलेला नफा अशा नोंदी करून आर्थिक सक्षमतेला हादरा देणाऱ्या गोष्टी बँकिंग क्षेत्राला नाईलाजास्तव पाहाव्या आणि कराव्या लागत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. सांगली जिल्ह्यातही सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रासाठी केलेला कर्जपुरवठा अडचणीत आला आहे. संबंधित क्षेत्रात उलाढालच नसल्याने कर्जवसुली करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बँका, पतसंस्था व अन्य वित्तीय संस्थांनी मंगळवारी ३१ मार्च रोजी अशा अनेक नकोशा गोष्टींच्या नोंदी ताळेबंदात करून आर्थिक वर्षाचा समारोप केला. बँकांचा हा ताळेबंद यंदा या क्षेत्राला हादरा देणारा आहे. पुढील आर्थिक वर्षात अनेक आव्हाने निर्माण करणारा आणि कामाचा भार वाढविणारा ठरणार आहे.

लिलाव प्रक्रियेलाही अडचणीजप्त केलेल्या संस्थांच्या मालमत्तांचा लिलावही मार्चपूर्वीच केला जातो. सेक्युरिटायझेशनअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १५ हून अधिक बँकांनी गेल्या तीन महिन्यांपासून थकबाकीदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. मार्चमध्ये अशा अनेक थकबाकीदार संस्थांचे लिलाव होणार होते. पण संचारबंदीमुळे ही प्रक्रिया प्रतिसादाविना पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे तितक्या प्रमाणावर थकबाकीची नोंद बँकांच्या ताळेबंदाला होणार आहे.

या गोष्टींनी घटणार नफाकृषी व अन्य क्षेत्रांच्या कर्जाची थकबाकी वाढलीसंचारबंदीमुळे कर्जवसुलीस अडचणीलिलाव प्रक्रियेला संचारबंदीमुळे अडचणी आल्याने वसुली थांबलीकर्जवसुलीसाठी प्रत्यक्ष बॅँकांना कर्जदाराच्या दारापर्यंत जाता आले नाहीगृह, वाहन कर्जाचे हप्ते तीन महिने लांबणीवर टाकलेनव्या कर्जाचे वाटप होऊ शकले नाही

टॅग्स :Sangliसांगली