शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दुष्काळ निधीवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा - सुनील फराटे 

By अशोक डोंबाळे | Updated: May 25, 2024 18:22 IST

जिल्हा बँकेच्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनामत खात्यातून दुष्काळग्रस्तांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ बडतर्फची कारवाई झाली पाहिजे, तसेच दोन कोटींहून अधिकचा घोटाळा होत असताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांच्यावरही फौजदारी कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

स्वतंत्र भारत पक्षातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक ही अग्रगण्य बँक आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक यांचे सर्व व्यवहार व ठेवी या बँकेत आहेत. जिल्ह्यातील सहकारी संस्था म्हणजेच साखर कारखाने, सूत गिरण्या, प्रक्रिया संस्थेसह इतर सहकारी संस्थांना आर्थिक साहाय्य देते, म्हणूनच या बँकेला जिल्ह्याची अर्थवाहिनी संबोधली जाते. जिल्हा बँकेकडे दुष्काळ, अतिवृष्टी आणि पीकविमा भरपाईचा निधी शासनाने दिला आहे. हा निधी हा ज्या-त्यावेळी शेतकऱ्यांच्या खाती जमा न करता, तो अनामत खाती शिल्लक ठेवला आहे. या निधीवरती बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे. याबाबतची व्याप्ती पाहता अपहारीत रक्कम अंदाजे सहा ते सात कोटी असल्याचे दिसत आहे. अपहाराची व्याप्ती पाहता, रक्कम अंदाजापेक्षा कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता आहे. 

अपहाराबाबत बँकेच्या काही अधिकाऱ्यांची टीम बनवून चौकशीचा फार्स केला जात आहे. त्यामुळे चौकशी पारदर्शकपणे होऊन अपहारित रक्कम वसूल होणे गरजेची आहे. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारीची कारवाई होणे अपेक्षित आहे. शासनाचा निधी शेतकऱ्यांना वर्ग झाला नसेल, तर तो निधी शासनाकडे परत पाठविण्याची जबाबदारी ही बँकेची आहे. तथापि, बँकेने व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. अपहारित रक्कम ही शासनाचा निधी असल्यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. दोन अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. या बँकेकडे फार मोठ्या प्रमाणात अपहार, गैरव्यवहाराची प्रकरणे घडत आहेत. शासकीय निधी परत न केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Sangliसांगली