शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सांगलीत स्टेट बँकेला आग

By admin | Updated: July 18, 2014 23:57 IST

कागदपत्रे जळाली : दीड लाखाचे नुकसान

सांगली : येथील मुख्य बसस्थानकाजवळील स्टेट बँकेला आग लागली. यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे फर्निचर, पंखे, कपाटे, खुर्च्या जळून खाक झाल्याने एक लाख ६३ हजाराचे नुकसान झाले आहे. आज (शुक्रवार) पहाटे तीन ते चार या दरम्यान ही घटना घडली. घटनेची रात्री उशिरा शहर पोलिसांत नोंद झाली. स्टेट बँकेचे दुमजली कार्यालय आहे. पहिल्या मजल्यावर बँकेचे दैनंदिन व्यवहार चालतात. दुसऱ्या मजल्यावर महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत. बँकेजवळ एटीएम सेवा आहे. पहाटे तीन वाजता दुसऱ्या मजल्यावरुन धुराचे लोट येत असल्याचे एटीएममधील रखवालदाराच्या निदर्शनास आले. त्याने आरडाओरड केल्याने परिसरातील लोक जमा झाले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस व महापालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली. एका तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे, फायली, संगणक, फॅक्स मशीन, दूरध्वनी, टेबल, खुर्चा, कपाटे जळून खाक होऊन एक लाख ६३ हजाराचे नुकसान झाले आहे. बँकेच्या व्यवस्थापिका आशा मोहन सोनवणे (रा. नेमीनाथनगर, सांगली) याही आगीचे वृत्त समजताच दाखल झाल्या होत्या. त्यांनी बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने आगीमध्ये काय नुकसान झाले आहे, याची माहिती घेतली. त्याची यादी तयार केली. शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी) बँकेत आग कशाने लागली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनाही आगीचे कारण समजू शकले नाही. एटीएममधील रखवालदाराच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार तातडीने उघडकीस आला. अन्यथा बँकेच्या पहिल्या मजल्यापर्यंत आग वाढली असती.