शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

...अखेर विठलापूरचा पाणीप्रश्न मिटला!

By admin | Updated: May 19, 2015 00:25 IST

विहिरीचे अधिग्रहण : आजपासून पाणीपुरवठा --लोकमतचा दणका

अविनाश बाड - आटपाडी -विठलापूर (ता. आटपाडी) येथील पाणीटंचाईने हैराण झालेल्या ग्रामस्थांना आज (सोमवारी) तातडीने प्रशासकीय हालचाली झाल्याने आता दिलासा मिळणार आहे. विठलापूरला तातडीने विहीर अधिग्रहण केली आहे. यामुळे मंगळवार दि. १९ पासून गावाला पाणी सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे टेंभूचे पाणी सोडलेल्या ओढ्याकाठावरील विहीर अधिग्रहण केल्याने येत्या काही दिवसांपर्यंत तरी गावाची पाणीटंचाईपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे.आटपाडीपासून केवळ ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या गावाला गेल्या २ महिन्यापासून तीव्र पाणीटंचाईने विळखा घातला होता. १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला गेल्याने ग्रामस्थांवर उन्हाळ्यात दाहीदिशा पाण्यासाठी फिरण्याची वेळ आली. ‘लोकमत’ने सोमवार दि. १८ मे च्या अंकात विठलापूरच्या पाणीटंचाईची वेदना प्रसिध्द केली.या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यु. एस. काळे, विस्तार अधिकारी एस. आर. पाटील, ग्रामसेवक एस. आर. वळवी, डी. बी. देशमुख यांनी विठलापूरला भेट दिली व प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली.दरम्यान, तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांनी त्यांच्याकडे प्रस्तावित असलेला विहीर अधिग्रहण करण्याचा आदेश काढला. मात्र त्या विहिरीस पाणी कमी असल्यामुळे सुरेश तुकाराम आटपाडकर यांची विहीर अधिग्रहण करण्याचे ठरले.दरम्यान, रामभाऊ युवा मंचचे सिध्देश्वर बाड, नवनाथ जावीर, शिवलिंंग बाड, साहेबराव चंदनशिवे, अनिल बाड, बालाजी बाड यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार कट्यारे यांना भेटून, येत्या दोन दिवसात पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात आली नाही, तर बुधवार दि. २० मे रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. विठलापूर गावच्या ओढ्यातील सर्व विहिरींची पाणी असलेल्या शेतकऱ्याची विहीर अधिग्रहण केली आहे. आम्ही १५ दिवसांपूर्वीच विहीर अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. उद्या तातडीने जलवाहिनी जोडून पाणीपुरवठा करण्यात येईल.- सौ. मीना साळुंखे, गटविकास अधिकारी, आटपाडी ‘लोकमत’चे अभिनंदनविठलापूरमध्ये दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांना अगदी सळो की पळो करून सोडले. प्रशासनाचे मात्र या पाणीटंचाईकडे दुर्लक्ष झाले. ‘लोकमत’मध्ये याचे वृत्त सोमवार दि. १८ रोजी प्रसिध्द झाल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. मंगळवारपासून गावाला पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे.