शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

...अखेर विठलापूरचा पाणीप्रश्न मिटला!

By admin | Updated: May 19, 2015 00:25 IST

विहिरीचे अधिग्रहण : आजपासून पाणीपुरवठा --लोकमतचा दणका

अविनाश बाड - आटपाडी -विठलापूर (ता. आटपाडी) येथील पाणीटंचाईने हैराण झालेल्या ग्रामस्थांना आज (सोमवारी) तातडीने प्रशासकीय हालचाली झाल्याने आता दिलासा मिळणार आहे. विठलापूरला तातडीने विहीर अधिग्रहण केली आहे. यामुळे मंगळवार दि. १९ पासून गावाला पाणी सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे टेंभूचे पाणी सोडलेल्या ओढ्याकाठावरील विहीर अधिग्रहण केल्याने येत्या काही दिवसांपर्यंत तरी गावाची पाणीटंचाईपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे.आटपाडीपासून केवळ ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या गावाला गेल्या २ महिन्यापासून तीव्र पाणीटंचाईने विळखा घातला होता. १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला गेल्याने ग्रामस्थांवर उन्हाळ्यात दाहीदिशा पाण्यासाठी फिरण्याची वेळ आली. ‘लोकमत’ने सोमवार दि. १८ मे च्या अंकात विठलापूरच्या पाणीटंचाईची वेदना प्रसिध्द केली.या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यु. एस. काळे, विस्तार अधिकारी एस. आर. पाटील, ग्रामसेवक एस. आर. वळवी, डी. बी. देशमुख यांनी विठलापूरला भेट दिली व प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली.दरम्यान, तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांनी त्यांच्याकडे प्रस्तावित असलेला विहीर अधिग्रहण करण्याचा आदेश काढला. मात्र त्या विहिरीस पाणी कमी असल्यामुळे सुरेश तुकाराम आटपाडकर यांची विहीर अधिग्रहण करण्याचे ठरले.दरम्यान, रामभाऊ युवा मंचचे सिध्देश्वर बाड, नवनाथ जावीर, शिवलिंंग बाड, साहेबराव चंदनशिवे, अनिल बाड, बालाजी बाड यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार कट्यारे यांना भेटून, येत्या दोन दिवसात पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात आली नाही, तर बुधवार दि. २० मे रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. विठलापूर गावच्या ओढ्यातील सर्व विहिरींची पाणी असलेल्या शेतकऱ्याची विहीर अधिग्रहण केली आहे. आम्ही १५ दिवसांपूर्वीच विहीर अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. उद्या तातडीने जलवाहिनी जोडून पाणीपुरवठा करण्यात येईल.- सौ. मीना साळुंखे, गटविकास अधिकारी, आटपाडी ‘लोकमत’चे अभिनंदनविठलापूरमध्ये दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांना अगदी सळो की पळो करून सोडले. प्रशासनाचे मात्र या पाणीटंचाईकडे दुर्लक्ष झाले. ‘लोकमत’मध्ये याचे वृत्त सोमवार दि. १८ रोजी प्रसिध्द झाल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. मंगळवारपासून गावाला पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे.