शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अखेर जलशुद्धीकरण प्रकल्प उद्घाटनावर पडदा : काँग्रेस करणार शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:27 IST

सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद््घाटनावरून निर्माण झालेल्या राजकीय वादावर गुरुवारी पडदा टाकण्यात आला. उद््घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेस,

ठळक मुद्देसर्वपक्षीयांना निमंत्रण

सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उद््घाटनावरून निर्माण झालेल्या राजकीय वादावर गुरुवारी पडदा टाकण्यात आला. उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांची नावे समाविष्ट करून कार्यक्रमाला सर्वपक्षीय स्वरुप देण्यात आले. तरीही या कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसने मात्र निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे.

सांगली व कुपवाड या दोन शहरांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ७० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. निवडणुकीआधी या प्रकल्पाचे उद््घाटन घेऊन श्रेय घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. येत्या रविवारी, २७ रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद््घाटन होणार आहे. त्यानंतर काँग्रेसचा मेळावा घेऊन निवडणुकीचे रणशिंगही फुंकले जाणार आहे. त्याची जय्यत तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.

पण या प्रकल्पासाठी शासनाचा निधी असल्याने सर्वपक्षीयांना निमंत्रित करावे, असा आग्रह शिवसेनेचे नगरसेवक शेखर माने यांनी आयुक्तांकडे धरला होता. त्यातून आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करीत भाजप खासदार, आमदारांचाही पत्रिकेवर समावेश करण्याचा आग्रह धरला. यातून काँग्रेस विरूद्ध आयुक्त असा नवा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे होती. अखेर सत्ताधाऱ्यांनी दोन पावले मागे घेत सर्वपक्षीय नेत्यांच्या नावांचा निमंत्रण पत्रिकेवर समावेश करून या वादावर पडदा टाकला.

आता रविवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा होत आहे.या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांची विशेष उपस्थिती असेल, तर खा. संजयकाका पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मोहनराव कदम, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विश्वजित कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही उपस्थित राहणार आहेत.काँग्रेस : जय्यत तयारी सुरूप्रकल्प लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने सत्ताधारी काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पासह गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकास कामांची जंत्रीही जनतेसमोर मांडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यात २४ कोटीचे रस्ते, नवीन उद्यानांना मंजुरी अशा कामांचा समावेश आहे. महापौर हारूण शिकलगार, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, गटनेते किशोर जामदार यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. 

जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद््घाटन व पक्षाचा मेळावा काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत करण्याची घोषणा महापौर व सत्ताधारी कारभाºयांनी केली होती. परंतु जलशुद्धीकरण योजनेमध्ये सर्वच पक्षांचे योगदान असल्याने त्याचे श्रेय फक्त काँग्रेसने लाटू नये व सर्वांना सोबत घेऊन उद््घाटन करावे, अशी मागणी केली होती. त्याला आयुक्तांनीही सहमती दर्शविली होती. परस्पर उद््घाटन करण्याचा प्रयत्न झाला तर शिवसेना या प्रकल्पाचे एक दिवस आधीच उद््घाटन करेल, असा इशाराही दिला होता. याचा धसका सत्ताधाºयांनी घेऊन कार्यक्रम सर्वपक्षीय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- शेखर माने, नगरसेवक, शिवसेना

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली