शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

अखेर ‘जलदूत’ पूर्णक्षमतेने रवाना

By admin | Updated: April 20, 2016 00:34 IST

प्रयोग यशस्वी : मिरजेतून लातूरसाठी एकाचवेळी २५ लाख लिटर पाणी

मिरज : लातूरकरांची तहान भागविण्यासाठी मिरजेतून एकाचवेळी ५० टॅँकरमधून २५ लाख लिटर पाणी घेऊन ‘जलदूत’ एक्स्प्रेस मंगळवारी रात्री रवाना झाली. प्रशासनाचे अथक प्रयत्न मार्गी लागल्याने ही रेल्वे आता पूर्णक्षमतेने पाणी घेऊन जाणार आहे. येथील रेल्वे यार्डात टॅँकर भरण्याची व्यवस्था झाल्याने दररोज २५ लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात येणार आहे. पाणीटंचाईमुळे मिरजेतून लातूरला पाणीपुरवठ्याचा निर्णय झाल्यानंतर रेल्वे जलशुद्धिकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत जलवाहिनी व उच्च क्षमतेच्या मोटारी बसविण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. या यंत्रणेद्वारे रेल्वे स्थानकातील हैदरखान विहिरीत नदीच्या पाण्याचा साठा करून ते पाणी रेल्वे टॅँकरमध्ये भरण्यास मंगळवारी सुरुवात झाली. गेले नऊ दिवस दररोज पाच लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात येत होते. आता उच्च दाबाने टॅँकर भरण्याची व्यवस्था झाल्याने व ५० टॅँकरच्या दोन रेल्वे (पान ११ वर)(पान १ वरून) उपलब्ध झाल्यामुळे लातूरकरांना दररोज २५ लाख लिटर पाण्याचा पुरवठा होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे जलशुद्धीकरण केंद्र ते रेल्वे यार्डापर्यंत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीद्वारे रेल्वे स्थानकाजवळील हैदरखान विहिरीत पाण्याचा साठा करून मंगळवारी सकाळी प्रत्येकी ५४ हजार लिटर क्षमतेचे ५० टॅँकर भरण्यास सुरुवात झाली. ७० मिनिटात सात टॅँकर, या गतीने आठ तासात ५० टॅँकर भरण्यात आले. रेल्वेच्या स्वतंत्र पाणी योजनेचे काम करणारे मिरजेतील शशांक जाधव व वाघेश जाधव यांनी दहा दिवसात अडीच किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण केले. १ कोटी ८४ लाख रुपये खर्चाच्या या कामास इतरवेळी आठ ते दहा महिन्यांची मुदत देण्यात येते. हे काम मात्र पाणीपुरवठा यंत्रणेचे दहा दिवसात पूर्ण केल्याने दररोज ५४ हजार लिटरचे ५० टॅँकर भरण्याची व्यवस्था झाली आहे. थेट रेल्वे बोर्डाकडून आदेश असल्याने पुणे विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकारी मिरजेत पाणीपुरवठा यंत्रणेच्या कामावर लक्ष ठेवून होते. गेले दहा दिवस रेल्वे स्थानकात तळ ठोकून असलेल्या जीवन प्राधिकरणच्या व रेल्वे अधिकाऱ्यांचा तणाव दूर झाला. मिरज रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेली यंत्रणा कायमस्वरूपी पाणी टॅँकर भरण्यासाठी वापरण्यात येणार आहे. (वार्ताहर)आमदार, जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडालातूरला जाणारी जलदूत एक्स्प्रेस मंगळवारी रात्री उशिरा मिरज रेल्वे स्थानकातून रवाना झाली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आमदार सुरेश खाडे यांनी तिला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी प्रांताधिकारी सुभाष बोरकर, भाजपचे नेते मकरंद देशपांडे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, गजेंद्र कुळ्ळोळी, ओंकार शुक्ल, शीतल पाटोळे, तानाजी घार्गे, मोहन व्हनखंडे, संदीप शिंदे, रोहित चिवटे, राजा देसाई, शशांक जाधव, वाघेश जाधव, स्थानक अधीक्षक व्ही. रमेश यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.‘जलदूत’ला एक्स्प्रेसचा दर्जामिरज रेल्वे स्थानकातून मंगळवारी सकाळी पाच लाख लिटर पाणी घेऊन दहा टॅँकरची नववी खेप लातूरला पाठविण्यात आली. रेल्वे यार्डात एकाचवेळी २५ लाख लिटर पाणी भरण्याची सोय झाल्याने आता दररोज ५० टॅँकर लातूरला जाणार आहेत. लातूरला पाणी घेऊन जाणाऱ्या रेल्वेला ‘जलदूत’ हे नाव देण्यात आले असून ‘जलदूत’ला एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे जलदूत कोणत्याही स्थानकावर क्रॉसिंगला न थांबता लातूरला रवाना होईल. मिरजेतून लातूरपर्यंत जाण्यासाठी आठ ते नऊ तास लागतात. मात्र जलदूत एक्स्प्रेस सात तासात लातूरला पोहोचणार आहे.उदगीरमधूनही पाण्याची मागणीलातूरजवळील उदगीर येथेही तीव्र पाणीटंचाई आहे. लातूरप्रमाणे उदगीर येथेही मिरजेतून रेल्वे टॅँकरने पाणी पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. मिरजेत पाणी उपलब्ध असले तरी, एकाचवेळी अनेक शहरांसाठी टॅँकर भरण्याची यंत्रणा नसल्याचे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.