शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बुधगावची स्वतंत्र मळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST

बुधगाव : बुधगावकरांचे स्वच्छ, शुध्द आणि पुरेशा नियमित पाणीपुरवठ्याचे स्वप्न अखेर साकार झाले. राष्ट्रीय पेयजल योजनेतून दोन टप्प्यात त्यासाठी ...

बुधगाव : बुधगावकरांचे स्वच्छ, शुध्द आणि पुरेशा नियमित पाणीपुरवठ्याचे स्वप्न अखेर साकार झाले. राष्ट्रीय पेयजल योजनेतून दोन टप्प्यात त्यासाठी ९ कोटी ५१ लाख रुपये खर्च करण्यात आले. ग्रामंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पद्माळे (ता. मिरज) येथील विद्युत पंपांचे बटण दाबून योजना सुरू केली. श्री सिद्धेश्वर नवभारत आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.

बुधगाव ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावविहिरीतून पाणीपुरवठा केला जात होता. युती शासनाच्या काळात माधवनगर प्रादेशिक योजना मंजूर झाली. सात गावांचा समावेश असणाऱ्या या प्रादेशिक योजनेतून १५ सप्टेंबर २००२ पासून पाणीपुरवठा होत होता. यामध्ये ब्रम्हनाळ येथून कृष्णा नदीतून पाणी उचलले जात होते. मात्र क्षारपड जमिनीमुळे अल्पावधीतच योजनेच्या जलवाहिन्यांना गळती सुरू झाली. वीज बिल, गळती आणि सात गावांच्या समितीचे घोंगडे यामुळे महिना-महिना योजना बंद असायची. याला वैतागूनच माधवनगर पहिल्यांदा या योजनेतून बाहेर पडले. आता बुधगावचीही स्वतंत्र योजना सुरू झाली आहे. बुधगावात २०१२ साली ग्रामपंचायतीत सत्तेत आलेल्या श्री सिध्देश्वर नवभारत विकास आघाडीने ४ कोटी ४८ लाखाची अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याची तसेच तीन नवीन जलकुंभ उभारणीची योजना मंजूर करुन आणली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५ कोटी ३ लाख खर्चाची योजना स्वतंत्र योजना मंजूर करून आणली. दुसऱ्या टप्प्यात पद्माळेतील उपसागृह ते बुधगावातील शुध्दिकरण केंद्रापर्यंतच्या कामांचा समावेश होता. पद्माळे येथील योजनेच्या उपसागृह व पंपगृहासाठी बुधगावच्याच श्री ज्योतिर्लिंग व श्री दत्त पाणीपुरवठा संस्थेने जागा मोफत दिली आहे. दोन एमएलडी क्षमतेची ही योजना असल्याने दररोज जरी शक्य नसले तरी दिवसाआड पाणीपुरवठा होण्यास अडचण नाही. त्यामुळे बुधगावकरांचा पाण्यासाठीची धावपळ आता संपुष्टात येणार आहे.

पत्रकार बैठकीस सरपंच सुरेश ओंकारे, उपसरपंच सुखदेव गोसावी, तंटामुक्तीचे आनंदराव पाटील, आघाडीचे प्रवीण पाटील, अनिल डुबल, राजेंद्र शिवकाळे आदी उपस्थित होते.

योजनेची वैशिष्ट्ये

१) २०११ च्या जनगणनेनुसार २ एमएलडी क्षमतेची योजना. मात्र भविष्यात ही योजना अपुरी ठरण्याचा धोका.

२) डी.आय.(डस्ट आयर्न) प्रकारच्या जलवाहिन्यांमुळे गळतीच्या त्रासापासून कायमची सुटका.

३) स्वतंत्र योजनेमुळे वीज बिल विलंबाचाही धोका कमी.

चौकट

श्रेयवाद नकाे

या स्वतंत्र योजनेसाठी नवभारत आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खस्ता खाल्ल्या आहेत. केवळ पत्रकबाजीने एखादा प्रश्न सुटत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे पत्रकबाजीची सवय असलेल्या कोणी उपऱ्यांनी श्रेयासाठी धडपडू नये, असा सल्लाही पत्रकार बैठकीत आघाडी सदस्यांनी दिला.