शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्यात अकोला, वाशिम, गोंदिया, नागपूर, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसीचे ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्यात अकोला, वाशिम, गोंदिया, नागपूर, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसीचे आरक्षण रद्द ठरविले आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगानेही ६ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील ओबीसींच्या जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा आदेश दिला आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील ओबीसीचे आरक्षणच संपुष्टात येण्याची भीती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात ओबीसी आरक्षणाची तरतूद असली तरी सर्वाेच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या त्रिसूत्रीनुसार राज्य शासनाने अद्याप कोणताही समर्पित व अभ्यासू लोकांचा आयोग नेमला नाही. ओबीसीची निश्चित लोकसंख्या शोधून, त्यांचा राजकीय मागासलेपणा सिध्द केला नाही. काही जिल्ह्यांत सर्वाेच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घालून दिलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. राज्य शासनाने वेळीच याची दखल घेऊन न्यायालयात भक्कमपणे ओबीसीची बाजू मांडली असती तर आरक्षण रद्द झाले नसते. याचे दूरगामी परिणाम सर्वच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणावर होणार आहेत. ओबीसीचे राजकीय आरक्षण वाचविण्यात महाराष्ट्र शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले. यास महाराष्ट्र शासनाचा व ओबीसी मंत्रालयाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याने शासनाचा निषेध केला आहे.

महाराष्ट्र शासनाने सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करून स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षण अबाधित ठेवावे. ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी निष्णात वकिलांची नियुक्ती करावी. राज्यात ओबीसीसह सर्व जाती-जमातीच्या जातनिहाय जनगणना ताबडतोब कराव्यात. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आयोगाची स्थापना करावी. ओबीसी भटक्या, विमुक्त बारा बलुतेदार व धनगर समाजासाठी समाजाच्या योजनांसाठी निधी वाढवून द्यावा. ओबीसीची वसतिगृह सुरू करावीत. बारा बलुतेदारांचे महामंडळ त्वरित जाहीर करावेत. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ताबडतोब द्यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यातील ओबीसी/भटक्या विमुक्त व बाजारा बलुतेदार समाज आंदोलन करणार असल्याचे ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल खोत यांनी निवेदनात म्हटले आहे.