शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्यात अकोला, वाशिम, गोंदिया, नागपूर, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसीचे ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्यात अकोला, वाशिम, गोंदिया, नागपूर, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसीचे आरक्षण रद्द ठरविले आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगानेही ६ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील ओबीसींच्या जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा आदेश दिला आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील ओबीसीचे आरक्षणच संपुष्टात येण्याची भीती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात ओबीसी आरक्षणाची तरतूद असली तरी सर्वाेच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या त्रिसूत्रीनुसार राज्य शासनाने अद्याप कोणताही समर्पित व अभ्यासू लोकांचा आयोग नेमला नाही. ओबीसीची निश्चित लोकसंख्या शोधून, त्यांचा राजकीय मागासलेपणा सिध्द केला नाही. काही जिल्ह्यांत सर्वाेच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घालून दिलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. राज्य शासनाने वेळीच याची दखल घेऊन न्यायालयात भक्कमपणे ओबीसीची बाजू मांडली असती तर आरक्षण रद्द झाले नसते. याचे दूरगामी परिणाम सर्वच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणावर होणार आहेत. ओबीसीचे राजकीय आरक्षण वाचविण्यात महाराष्ट्र शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले. यास महाराष्ट्र शासनाचा व ओबीसी मंत्रालयाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याने शासनाचा निषेध केला आहे.

महाराष्ट्र शासनाने सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करून स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षण अबाधित ठेवावे. ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी निष्णात वकिलांची नियुक्ती करावी. राज्यात ओबीसीसह सर्व जाती-जमातीच्या जातनिहाय जनगणना ताबडतोब कराव्यात. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आयोगाची स्थापना करावी. ओबीसी भटक्या, विमुक्त बारा बलुतेदार व धनगर समाजासाठी समाजाच्या योजनांसाठी निधी वाढवून द्यावा. ओबीसीची वसतिगृह सुरू करावीत. बारा बलुतेदारांचे महामंडळ त्वरित जाहीर करावेत. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ताबडतोब द्यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यातील ओबीसी/भटक्या विमुक्त व बाजारा बलुतेदार समाज आंदोलन करणार असल्याचे ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल खोत यांनी निवेदनात म्हटले आहे.