शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
3
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
4
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
5
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
6
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
7
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
8
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
9
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
11
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
12
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
13
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
14
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
15
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
16
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
17
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
18
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
19
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
20
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं

ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्यात अकोला, वाशिम, गोंदिया, नागपूर, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसीचे ...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्यात अकोला, वाशिम, गोंदिया, नागपूर, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसीचे आरक्षण रद्द ठरविले आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगानेही ६ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील ओबीसींच्या जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा आदेश दिला आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील ओबीसीचे आरक्षणच संपुष्टात येण्याची भीती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात ओबीसी आरक्षणाची तरतूद असली तरी सर्वाेच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या त्रिसूत्रीनुसार राज्य शासनाने अद्याप कोणताही समर्पित व अभ्यासू लोकांचा आयोग नेमला नाही. ओबीसीची निश्चित लोकसंख्या शोधून, त्यांचा राजकीय मागासलेपणा सिध्द केला नाही. काही जिल्ह्यांत सर्वाेच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घालून दिलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. राज्य शासनाने वेळीच याची दखल घेऊन न्यायालयात भक्कमपणे ओबीसीची बाजू मांडली असती तर आरक्षण रद्द झाले नसते. याचे दूरगामी परिणाम सर्वच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणावर होणार आहेत. ओबीसीचे राजकीय आरक्षण वाचविण्यात महाराष्ट्र शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले. यास महाराष्ट्र शासनाचा व ओबीसी मंत्रालयाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याने शासनाचा निषेध केला आहे.

महाराष्ट्र शासनाने सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करून स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षण अबाधित ठेवावे. ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी निष्णात वकिलांची नियुक्ती करावी. राज्यात ओबीसीसह सर्व जाती-जमातीच्या जातनिहाय जनगणना ताबडतोब कराव्यात. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आयोगाची स्थापना करावी. ओबीसी भटक्या, विमुक्त बारा बलुतेदार व धनगर समाजासाठी समाजाच्या योजनांसाठी निधी वाढवून द्यावा. ओबीसीची वसतिगृह सुरू करावीत. बारा बलुतेदारांचे महामंडळ त्वरित जाहीर करावेत. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ताबडतोब द्यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची दखल न घेतल्यास राज्यातील ओबीसी/भटक्या विमुक्त व बाजारा बलुतेदार समाज आंदोलन करणार असल्याचे ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल खोत यांनी निवेदनात म्हटले आहे.